AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘राजकारण हे असंतुष्ट आत्म्यांचा सागर, मुख्यमंत्री झाल्यावर पक्षश्रेष्ठी कधी बाजूला करतील…’; गडकरींच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

"राजकारण हे असंतुष्ट आत्म्यांचा सागर", असं नितीन गडकरी म्हणाले आहेत. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील सध्या सुरु असलेल्या राजकीय घडामोडी आणि नितीन गडकरी यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे.

'राजकारण हे असंतुष्ट आत्म्यांचा सागर, मुख्यमंत्री झाल्यावर पक्षश्रेष्ठी कधी बाजूला करतील...'; गडकरींच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
नितीन गडकरी
| Updated on: Dec 02, 2024 | 4:58 PM
Share

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन आतापर्यंत 9 दिवस पूर्ण झाले आहेत. पण महाराष्ट्रात सत्ता स्थापन झालेलं नाही. राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. पण तरीही सरकार स्थापन होण्यास विलंब होताना दिसत आहे. भाजप नेत्यांकडून येत्या 5 डिसेंबरला नव्या सरकारचा शपथविधीचा कार्यक्रम पार पडेल, असं जाहीर करण्यात आलं आहे. त्यानुसार तयारीदेखील सुरु झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते अजित पवार हे आज दिल्लीच्या दिशेला रवाना झाले आहेत. ते दिल्लीत जावून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खातेवाटपाबाबत चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. दुसरीकडे राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आजारी आहेत. एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या होणाऱ्या मुख्यमंत्र्यांना आधीच पाठिंबा जाहीर केला आहे. पण त्यांना गृह खातं हवं आहे. याशिवाय एकनाथ शिंदे हे सध्या आजारी असल्यामुळे ते दिल्लीला चर्चेसाठी गेले नसल्याची माहिती आहे.

भाजपकडून देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री बनतील, असे संकेत देण्यात येत आहेत. पण तरीदेखील अधिकृतपणे त्यांचं नाव जाहीर करण्यात आलेलं नाही. भाजपचे दोन निरीक्षक उद्या राज्यात येणार आहेत. हे निरीक्षक उद्या भाजपचा विधीमंडळ नेता आणि गटनेता ठरवणार आहे. यावेळी कोण मुख्यमंत्री होणार? याबाबतच्या सस्पेन्सवर पडदा पडणार आहे. एकीकडे या सगळ्या घडामोडी सुरु असताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलेल्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे.

‘राजकारण हे असंतुष्ट आत्म्यांचा सागर’

“राजकारण हे असंतुष्ट आत्म्यांचा सागर”, असं नितीन गडकरी म्हणाले आहेत. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील सध्या सुरु असलेल्या राजकीय घडामोडी आणि नितीन गडकरी यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. “नगरसेवकाला, आमदारकीची आशा, तर आमदाराला मंत्रिपदाची अपेक्षा, मुख्यमंत्री झाल्यानंतर पक्षश्रेष्ठी कधी बाजूला करतील, याची भीती”, असं वक्तव्य नितीन गडकरी यांनी केलं आहे.

नितीन गडकरी नेमकं काय म्हणाले?

“राजकार हे अंतुष्ट आत्म्यांचं महासागर आहे. इथे सर्वच जण दु:खी आहे. नगरसेवक यासाठी दु:खी आहे की, त्याला आमदारकी मिळाली नाही. आमदार यासाठी दु:खी आहे की त्याला मंत्रिपद मिळालं नाही. जो मंत्री बनलाय तो त्याला चांगलं खातं मिळालं नाही यासाठी दु:खी आहे, त्यानंतर तो यासाठी दु:खी आहे की, त्याला मंत्रिपद मिळालं नाही. मुख्यमंत्री यासाठी टेन्शनमध्ये आहे की, हायकमांड कधी ठेवणार आणि कधी काढून टाकणार? याचा भरोसा नाही”, असं नितीन गडकरी म्हणाले.

3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं..
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं...
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?.
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!.
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ.
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम.
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन.
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.