AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिक्षकांना दिलेला पगार आणि त्यांच्या कामाचं मूल्यमापन करा, भाजप नेते विनय नातूंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

लॉकडाऊनच्या काळात शिक्षकांचा पगाराचा आणि कामाचं मूल्यमापन करावे, अशी मागणी विनय नातू यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या पत्रात केली आहे (BJP Leader Vinay Natu send letter to CM Uddhac Thackeray).

शिक्षकांना दिलेला पगार आणि त्यांच्या कामाचं मूल्यमापन करा, भाजप नेते विनय नातूंचे मुख्यमंत्र्यांना पत्र
| Updated on: Oct 30, 2020 | 9:49 PM
Share

रत्नागिरी : शिक्षण उपसंचालक कोल्हापूर विभागाकडून शिक्षण संस्थांना शिक्षकांना शाळेत बोलवू नये, असा आदेश पत्राद्वारे देण्यात आहे. या आदेशावर गुहागरचे माजी आमदार आणि भाजपचे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष विनय नातू यांनी आक्षेप घेतला आहे. नातू यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. त्याचबरोबर शिक्षण मंत्र्यांचे डोके ठिकाणावर आहे का? असा खोचक सवाल त्यांनी केला आहे (BJP Leader Vinay Natu send letter to CM Uddhac Thackeray).

लॉकडाऊनच्या काळात शिक्षकांचा पगाराचा आणि कामाचं मूल्यमापन करावे, अशी मागणी विनय नातू यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या पत्रात केली आहे (BJP Leader Vinay Natu send letter to CM Uddhac Thackeray).

“सर्वात जास्त पगारावरील खर्च असलेल्या शिक्षण विभागाचा कोविडच्या काळात वापर करायाचा सोडून शासन संघटनांच्या पत्राप्रमाणे निर्णय जारी करत आहे”, अशी टीका विनय नातू यांनी केली.

“2020 हे वर्ष संपत आलं, मात्र तरीही शिक्षण विभागाचे शिक्षणाविषयी धोरण अद्याप ठरत नाही. आर्थिक परिस्थिती नसतानाही ग्रामीण भागातील पालकांनी मुलं शिक्षणापासून वंचित राहू नयेत, म्हणून नवे अँड्रॉइड फोन घेतले आहेत. मुलांचे ऑनलाइन क्लास झालेत. पण अद्याप तिमाई, सहामाही परीक्षांचा पत्ता नाही”, असा टोला नातू यांनी लगावला.

“कोरोना संकट काळात अल्प मानधन घेणारे आरोग्य सेवक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर आदी जर 100 टक्के उपस्थितीत काम करत असतील तर मुलांची शिक्षणाची सवय मोडू नये, यासाठी शालेय शिक्षकांनी शाळेत उपस्थित का राहू नये?”, असा सवालही विनय नातू यांनी केला.

हेही वाचा : उर्मिला मातोंडकरकडून शिवसेनेच्या प्रस्तावाला होकार; सूत्रांची माहिती

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.