AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मराठा समाजाला आरक्षण द्यायचं आहे की नाही?; चंद्रकांत पाटील यांचा सरकारला सवाल

मराठा आरक्षणावरून राज्य सरकारचा गोंधळ सुरू आहे. त्यांच्या वकिलांमध्येही एकवाक्यता नाही हे आजच्या प्रकारातून दिसून आलं आहे, असं सांगतानाच सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यायचं आहे की नाही?, असा संतप्त सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला.

मराठा समाजाला आरक्षण द्यायचं आहे की नाही?; चंद्रकांत पाटील यांचा सरकारला सवाल
| Updated on: Oct 27, 2020 | 3:43 PM
Share

कोल्हापूर : मराठा आरक्षणावरून राज्य सरकारचा गोंधळ सुरू आहे. त्यांच्या वकिलांमध्येही एकवाक्यता नाही हे आजच्या प्रकारातून दिसून आलं आहे, असं सांगतानाच सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यायचं आहे की नाही?, असा संतप्त सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला. (chandrakant patil slams maharashtra government over maratha reservation)

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाची सुनावणी चार आठवड्यासाठी पुढे ढकलल्याने चंद्रकांत पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेऊन सरकारच्या नियोजन शून्यतेवर टीका केली. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार गंभीर नाही. त्यांना मराठा समाजाला आरक्षण देण्यात रस नाही. ही बेपर्वाई असून आजच्या घडामोडीतून हे अधोरेखित होत असल्याचं पाटील म्हणाले. मराठा समाजाला आरक्षण देण्याचे सरकारचे प्रयत्न संशायस्पद आहेत. त्यांना मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही. त्यांच्या वकिलांना कोर्टात वेळेवरही जाता येत नाही. शिवाय सरकारच्या दोन्ही वकिलांमध्ये एक वाक्यता नाही. खरे तर आज सुनावणी होणार होती तर संबंधित मंत्र्याने दिल्लीत जाऊन वकिलांशी आधीच संवाद साधायला हवा होता. पण सरकारकडून कोणतीही पावलं उचलली गेली नाही. त्यामुळे सरकारला आरक्षण द्यायचं आहे की नाही? असा सवाल त्यांनी केला.

आता एक महिन्यानंतर या प्रकरणावर सुनावणी होणार आहे. म्हणजे आता महिनाभर सर्व शांत असणार आहे. अजूनपर्यंत अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली नाही. आरक्षणामुळे ही प्रक्रिया ठप्प आहे. कोणाला किती टक्के आरक्षण द्यायचं हे ठरवावं लागतं, त्यामुळे ही प्रक्रिया ठप्प आहे. आता महिनाभर काहीच होणार नसल्याने शैक्षणिक क्षेत्रात गोंधल निर्माण होणार असून मराठा समाज अनिश्चततेच्या वातावरणातून जात आहे, असं ते म्हणाले.

बैठकीचं नाटक

मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी विरोधी पक्षासोबत एकदाच बैठक झाली. बैठकीचं नाटक केलं गेलं. त्यानंतर विरोधी पक्षाला विचारलंही नाही. किमान विरोधी पक्ष आणि इतर तज्ज्ञांना बोलावून दोन अडीच तास चर्चा केली असती तर त्यातून काही तरी मार्ग निघाला असता, असंही ते म्हणाले. (chandrakant patil slams maharashtra government over maratha reservation)

संबंधित बातम्या:

Maratha Reservation: सरकारने न्यायालयात योग्यरित्या बाजू मांडली, आज आमची मागणीही मान्य झाली- अशोक चव्हाण

गरजू विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणासाठी मोफत मोबाईल वाटप

आज काहीच करू शकत नाही, अर्जदारांनी घटनापीठापुढे जावे: सर्वोच्च न्यायालय

(chandrakant patil slams maharashtra government over maratha reservation)

पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ.
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम.
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन.
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.