AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर कारवाई कधी? आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले उत्तर

चौकशी समितीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला असेल तर त्यावर योग्य ते आदेश तिन्ही अहवाल आल्यानंतरच दिले जाईल. सगळ्यांचा आग्रह हा ज्या पद्धतीने रुग्णाला त्रास झाला आहे, दिरंगाई झाली असेल त्यांच्यावर कारवाई व्हावी, असा आहे. परंतु वास्तुस्थिती बघूनच कारवाई होईल.

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर कारवाई कधी? आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले उत्तर
आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर
| Updated on: Apr 18, 2025 | 12:33 PM
Share

पुणे येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयच्या अडचणीमुळे गर्भवती महिला तनिषा भिसे यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात विविध समित्यांकडून रुग्णालयाची चौकशी सुरु आहे. यामुळे मंगेशकर रुग्णालय प्रशासन अडचणीत आले आहे. या घटनेनंतर राजकीय पक्ष, सामाजिक संस्थांकडून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाबद्दल संताप व्यक्त केला जात आहे. या रुग्णालयावर कारवाई कधी होणार? याबाबत आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी प्रथमच भाष्य केले आहे.

तिन्ही अहवाल आल्यावर कारवाई

आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले, मंगेशकर रुग्णालयाची चौकशी तीन विभागाकडून करण्यात येत आहे. हे रुग्णालय धर्मदाय कायद्यातील तरतुदीनुसार सुरु झाले आहे. यामुळे राज्याच्या कायदा विभागाकडूनही चौकशी करण्यात येत आहे. दुसरी चौकशी राज्याच्या आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे. तिसरी चौकशी पुण्यातील ससून रुग्णालयाकडून होत आहे. या तिन्ही विभागाचा अहवाल आल्यावर रुग्णालयावर कारवाई केली जाईल. मंगेशकर रुग्णालय असो की इतर कुठलेही रुग्णालय असो त्या ठिकाणी अनियमता होऊ नये किंवा रुग्णास त्रास होऊ नये, हे पाहिले जाईल.

प्रकाश आबिटकर यांनी चौकशी समितीसंदर्भातील विचारलेल्या प्रश्नावर बोलताना सांगितले की, चौकशी समितीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला असेल तर त्यावर योग्य ते आदेश तिन्ही अहवाल आल्यानंतरच दिले जाईल. सगळ्यांचा आग्रह हा ज्या पद्धतीने रुग्णाला त्रास झाला आहे, दिरंगाई झाली असेल त्यांच्यावर कारवाई व्हावी, असा आहे. परंतु वास्तुस्थिती बघूनच कारवाई होईल. तिन्ही अहवालातून सत्यता समोर येईल. पुढील दोन ते तीन दिवसात अहवाल येईल. त्यावर कारवाई संदर्भात सूचना मिळतील. त्यानंतरच कारवाई होईल, असे त्यांनी सांगितले.

विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला दणदणीत विजय मिळालेल्या आहे. त्यापेक्षा मोठे प्रमाणपत्राची गरज नाही. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जनतेने विश्वास ठेवलेला आहे. शिवसेनेचे संघटन अतिशय मजबूत आहे. त्यांच्या पाठीमागे लाखो कार्यकर्ते आहेत. महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात काय आहे, हे सुद्धा या निवडणुकीत आपण पाहिले आहे. शिवसेनेत रोज पक्षप्रवेश होत आहे. संघटनेची शक्ती वाढत आहे, असे मंत्री प्रकाश आबिटकर यांनी नाशिकमधील शिवसेना उबाठाच्या मेळाव्यातील प्रश्नावर बोलताना सांगितले.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.