AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘मराठा आरक्षणाच्या विरोधात कुणी बोललं तर सोडणार नाही’, मनोज जरांगे यांचा मोठा इशारा

"मी गोरगरीब लेकरांसाठी लढतोय. माझा समाज गोरगरीब लेकरांसाठीच लढतोय. आम्ही काही वाईट करत नाहीत. आमचा समाज आतापर्यंत कोणाच्याही विरोधात वाईट बोलत नाही. मराठा आरक्षणाच्या विरोधात कुणी बोललं तर मग आम्ही सोडणार नाहीत", असा इशारा मनोज जरांगे यांनी दिलाय.

'मराठा आरक्षणाच्या विरोधात कुणी बोललं तर सोडणार नाही', मनोज जरांगे यांचा मोठा इशारा
Manoj Jarange PatilImage Credit source: tv9 Marathi
| Updated on: Nov 16, 2023 | 7:29 PM
Share

संजय सरोदे, Tv9 मराठी, जालना | 16 नोव्हेंबर 2023 : “आम्ही समाजाचा आशीर्वाद घेऊन पुढे चालतोय. समाजाची 10 माणसं असली तरी आम्ही थांबतो किंवा 50 हजारांचा जनसमुदाय असला तरी थांबतो. आज दौंडमध्ये आणि वरगड गावात प्रचंड लोकं होती. मैदानात उभं राहायला जागा नव्हती, इतकी गर्दी होती. मराठा समाजाच्या नागरिकांची भूमिका योग्य आहे. नागरिकांना वाटतंय की, आपल्या लेकरांना आता आरक्षण मिळणार आहे. अर्थात आता शंभर टक्के आरक्षण मिळणार आहे. मराठा समाज ताकदीने एकत्र यायला लागला आहे. कोणत्याही नेत्याने कितीही संभ्रम निर्माण केला की, आरक्षण मिळणार नाही. पण शंभर टक्के मराठ्यांना आरक्षण मिळणार आहे. मला याची पूर्ण खात्री आहे”, असं मराठा नेते मनोज जरांगे पाटील म्हणाले. मनोज जरांगे यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली.

ओबीसी नेत्यांकडून भव्य सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. अनेक बडे नेते या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. याबाबत मनोज जरांगे यांना प्रश्न विचारण्यात आला. “मी गोरगरीब लेकरांसाठी लढतोय. माझा समाज गोरगरीब लेकरांसाठीच लढतोय. आम्ही काही वाईट करत नाहीत. आमचा समाज आतापर्यंत कोणाच्याही विरोधात वाईट बोलत नाही. मराठा आरक्षणाच्या विरोधात कुणी बोललं तर मग आम्ही सोडणार नाहीत”, असा इशारा यावेळी मनोज जरांगे यांनी दिला.

‘आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण हवं’

“ओबीसी समाजाचा आरक्षणासाठी अधिकार आहे. त्यांचा त्यांच्या आरक्षणावर अधिकार आहे. लोकशाही आहे. आम्हाला काहीच दु:ख नाही. त्यांनी बिंधास सभा घ्याव्यात. फक्त गोरगरीब मराठा लेकरांचा विचार करा, एवढंच आमचं म्हणणं आहे. आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण हवं आहे. आम्ही नोकरी आणि शिक्षणात आरक्षण हवं आहे”, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

साताऱ्यात मनोज जरांगेंच्या सभेला विरोध का?

मनोज जरांगे राज्यातील विविध जिल्ह्यांचा दौरा करत आहेत. या दरम्यान त्यांच्या सातारा जिल्ह्यातील सभेवरुन वाद निर्माण झाला होता. साताऱ्यातील शिवतीर्थ मैदानावर मनोज जरांगे यांची सभा भरवण्यात येऊ नये, अशी मागणी मराठा नेते तेजस्वी चव्हाण यांनी केली होती. विशेष म्हणजे त्यांनी त्यासाठी उपोषणाचादेखील इशारा दिला होता. त्यानंतर साताऱ्यातील गांधी मैदानात मनोज जरांगे यांची सभा होईल, असं जाहीर करण्यात आलं आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.