AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सांगलीच्या गणेश खिंडीत धोका, संकट येण्याआधी प्रशासनाला जाग येईल का?

गणेश खिंड या घाटातून कडेगाव तालुक्यातील सोनहिरा परिसरातील नागरिक वाळवा तालुक्यातील भवानीनगर, ताकारी, इस्लामपूर, कराड या गावाकडे जाण्यासाठी मोठ्या प्रमाणावर ये-जा करत असतात. हा रहदारीचा घाट असल्यामुळे या घाटाची सुरक्षा महत्त्वाची आहे.

सांगलीच्या गणेश खिंडीत धोका, संकट येण्याआधी प्रशासनाला जाग येईल का?
| Edited By: | Updated on: Jun 14, 2024 | 3:38 PM
Share

सांगलीच्या गणेश खिंडीत दरड कोसळण्याच्या घटना सुरु आहेत. मात्र प्रशासनाचं याकडे दुर्लक्ष आहे. त्यामुळे प्रवाशांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे गणेश खिंडीत कालच दरड कोसळणल्याची घटना घडली. त्यामुळे प्रवाशांच्या जीवितला धोका निर्माण झाला आहे. सांगलीच्या कडेगाव आणि वाळवा तालुक्याला जोडणाऱ्या गणेश खिंड या अतिवळणाच्या घाटात गेल्या 15 दिवसात तीन वेळा दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरीही प्रवाशांसाठी हा धोक्याचा घाट बनला आहे. दरड कोसळणाऱ्या घटनेकडे प्रशासनाने पूर्णत्व दुर्लक्ष केल्याची दिसून येत आहे.

गणेश खिंड या घाटातून कडेगाव तालुक्यातील सोनहिरा परिसरातील नागरिक वाळवा तालुक्यातील भवानीनगर, ताकारी, इस्लामपूर, कराड या गावाकडे जाण्यासाठी मोठ्या प्रमाणावर ये-जा करत असतात. हा रहदारीचा घाट असल्यामुळे या घाटाची सुरक्षा महत्त्वाची आहे. या घाटात अतिउंच दगडाच्या कडा आहेत. उन्हाळा संपून पावसाळा सुरू झाला की या कडांना पडलेल्या भेगांमध्ये पावसाचे पाणी साठते आणि भल्या मोठ्या दगडाच्या शिळा वेगाने रस्त्यावर येतात.

15 दिवसात घाटात तीन वेळा दगडाच्या शिळा कोसळल्या

या घटना नेहमीच घडत असतात. मात्र पावसाळ्यापूर्वी या धोकादायक दगडाच्या कडा प्रशासनाने काढून घेणे महत्त्वाचे असते. मात्र प्रशासन याकडे नेहमी दुर्लक्ष करीत आहे. गेल्या पंधरा दिवसात या घाटात तीन वेळा दगडाच्या शिळा रस्त्यावर आले आहेत. यामध्ये कोणत्या प्रकारची जीवितहानी अथवा नुकसान झाले नसले तरी नागरिकांच्या आणि प्रवाशांच्या जीवितास धोका आहे. तरी जिल्हा प्रशासनाने याबाबत गांभीर्याने दखल घेऊन या घाटातील धोकादायक दगड काढून घ्यावे, अशी मागणी होत आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.