AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MPSC : आधी परीक्षा पुढे ढकलली, आता परीक्षार्थींना इशारा? महाराष्ट्र लोकसेवा आयोगावर टीका का होतेय?

परीक्षा पुढे ढकलण्यात आल्यामुळे परीक्षार्थींकडून संताप व्यक्त केला जात आहे. तसंच काही जणांकडून आयोगावर टीकाही केली जातेय. या पार्श्वभूमीवर आयोगाने एक पत्रक काढून कारवाईचा इशारा दिलाय.

MPSC : आधी परीक्षा पुढे ढकलली, आता परीक्षार्थींना इशारा? महाराष्ट्र लोकसेवा आयोगावर टीका का होतेय?
एमपीएससीची मोठी भरतीImage Credit source: mpsc website
| Edited By: | Updated on: Dec 30, 2021 | 5:01 PM
Share

मुंबई : एमपीएससी (MPSC) अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (Maharashtra Public Service Commission) 2 जानेवारी रोजी होणारी पूर्वपरीक्षा (MPSC Exam) पुढे ढकलण्यात आली आहे. तसा निर्णय आयोगाकडून मंगळवारी जाहीर करण्यात आला आहे. महत्वाची बाब म्हणजे या निर्णयावेळी ही परीक्षा पुढे कधी घेतली जाणार, याची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. परीक्षा पुढे ढकलण्यात आल्यामुळे परीक्षार्थींकडून संताप व्यक्त केला जात आहे. तसंच काही जणांकडून आयोगावर टीकाही केली जातेय. या पार्श्वभूमीवर आयोगाने एक पत्रक काढून कारवाईचा इशारा दिलाय.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या प्रसिद्धीपत्रकात काय?

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित भरती प्रक्रियेसंदर्भात एखाद्या विशिष्ट पद्धतीने निर्णय घेण्याबाबत अथवा निर्णय न घेण्याबाबत कोणत्याही प्रकारे प्रयत्न केल्यास अशी कृती आयोगावर दबाव आणण्याचा प्रयत्न समजण्यात येईल व अशा प्रकरणाबाबत आयोगाकडून गंभीर दखल घेण्यात येईल. असे आयोगाच्या दि. 30 सप्टेंबर, 2021 रोजीच्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे आयोगाच्या संकेतस्थळावर सुचित करण्यात आले आहे.

आयोगाच्या कार्यपद्धतीविषयी आणि/अथवा काही निर्णयांविषयी नाराजी असणाऱ्या, तसेच आयोगाच्या काही निर्णयांमुळे प्रभावित होणाऱ्या उमेदवारांकडून आयोगाच्या कार्यपद्धती आणि/अथवा निर्णयांवर जाहीर टीका-टिप्पणी करण्यात येते. तथापि, आयोगावर टीका-टिप्पणी करत असताना शासकीय सेवेत येऊ इच्छिणाऱ्या भावी लोकसेवकांकडून सार्वजनिक सभ्यतेचे भान ठेवून संसदीय व सुसंस्कृत भाषा शैलीचा वापर केला जाणे अपेक्षित आहे. परंतू, काही उमेदवार/व्यक्ती यांच्याकडून विविध प्रसारमाध्यमे/समाजमाध्यमे यावर मत/अभिप्राय व्यक्त करताना किंवा दूरध्वनीवरुन संवाद साधताना असभ्य, असंस्कृत, असंसदीय व अश्लील भाषेचा वापर करण्यात येत असल्याची बाब आयोगाच्या प्रकर्षाने लक्षात आली आहे.

आयोगास निदर्शनास आलेल्या उपरोक्त बाबींची आयोगाच्या कार्यालयाकडून गंभीर दखल घेण्यात येत असून अशा उमेदवार/व्यक्ती यांच्यावर संबंधित कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल. तसेच, आयोगाच्या स्वेच्छाधिकारानुसार आयोगामार्फत आयोजित सर्वच परीक्षा व निवडीपासून संबंधिताला कायमस्वरुपी अथवा काही विशिष्ट कालावधीसाठी प्रतिरोधित करण्याची कारवाई करण्यात येईल.

आयोगाच्या प्रसिद्धीपत्रकावर आक्षेप

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या या प्रसिद्धीपत्रकानंतर आयोगावर जोरदार टीका करण्यात येत आहे. एमपीएससीने आधी परीक्षा वेळेवर घेऊन त्याचे निकाल नीट लावायला शिकावं. ते करायचं सोडून परीक्षार्थींना धमकी देणारी पत्रं लिहिण्यात वेळ, शक्ती खर्च केली जात आहे. असभ्य, अश्लील टीकेचं समर्थन नाही. पण या व्याख्येच्या आडून विरोधात बोलूच नये अशी योजना दिसत आहे. मुळात अशी टीका होणार नाही, असा कारभार एमपीएससीने करावा, असा सल्लाही आयोगाला दिला जात आहे.

इतर बातम्या :

‘लॉकडाऊन आणि नाईट कर्फ्यू हा बोगसपणा’, खासदार सुजय विखे-पाटलांची भूमिका

भाजप नेते हर्षवर्धन पाटील कोरोनाबाधित, दोन दिवसांपूर्वीच मुलीचा लग्न सोहळा, नेत्यांची चिंता वाढली!

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.