Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Temperature : तापमानातून दिलासा, पण चार दिवस गारपीट अन् अवकाळीचे संकट

Maharashtra City-Wise Temperature : राज्यातील तापमान ४० अंशाच्या आत आहे. परंतु राज्यात चार दिवस पावसाचे आहे. पुणे आणि विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. राज्यातील अनेक ठिकाणी यलो अलर्ट जारी केलाय.

Maharashtra Temperature : तापमानातून दिलासा, पण चार दिवस गारपीट अन् अवकाळीचे संकट
राज्यात अवकाळीचे संकटImage Credit source: tv9 network
Follow us
| Updated on: Apr 29, 2023 | 10:09 AM

पुणे : राज्यात एप्रिल महिन्याच्या सुरुवातील उन्हाचा चांगलाच फटका बसला. परंतु एप्रिल संपत असताना तापमान ४० च्या आत स्थिर राहिले. आता मे महिन्यातही उष्णता जाणवणार नाही, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या पूर्व, ईशान्य आणि वायव्य भारत या भागात मे महिन्यातील तापमान ४० अंशांच्या पुढे असणार आहे. परंतु इतर भागात तापमान ४० अंशाच्या पुढे जाणार नाही, असा अंदाज हवामान खात्याने (आयएमडी) वर्तवला आहे. परंतु एप्रिल महिना संपत असताना अवकाळी पावसाचा फटका बसणार आहे. राज्यातील अनेक ठिकाणी गारपिटीसह पाऊस पडणार आहे. यामुळे शेतकऱ्यांनी हवामान विभागाचा अंदाज बघूनच शेती कामे हाती घ्यावी, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.

सध्या तापमान ४० अंशांच्या आत का?

हे सुद्धा वाचा

सध्या देशभरातच कमी उष्णतेचा अंदाज व्यक्त केला आहे. परंतु, अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून हवेत जास्त आर्द्रता जास्त आहे. यामुळे ढगांच्या गडगडाटासह आणि वादळी वाऱ्यासह पाऊस होऊ शकतो. त्यामुळे तापमान सध्या ४० अंशांच्या आत आहे.

Maharashtra temperature
शहर तापमान
जळगाव ३७.७
अकोला ३५.८
मुंबई ३३.२
पुणे ३५-६
नागपूर ३३.६
नाशिक

सोलापूर

३५.८

३९

राज्यात पुन्हा अवकाळीचे संकट

राज्यात पुढील चार दिवस अवकाळी पावसाचे संकट कायम आहे. २९ व ३० एप्रिल रोजी तसेच १ व २ मे रोजी अवकाळी पाऊस पडणार आहे. गारपिटीसह हा पाऊस राज्यातील अनेक भागांत असणार आहे. त्यासाठी काही जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी केला आहे.

जळगाव जिल्ह्यात वादळी पाऊस

जळगाव जिल्ह्यात भुसावळसह अनेक तालुक्यात गुरुवार आणि शुक्रवार सलग दोन दिवस गारपीटसह वादळी वाऱ्याने झोडपले. गुरुवारी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांची पडझड झाली. भुसावळच्या साकेगावात जिल्हापरिषदेच्या शाळेचे पूर्ण छतच उडून गेले. तसेच इतरही नुकसान झाले. चोपडा तालुक्यातील काही परिसरामध्ये गारपीट झाली.

नाशिकमध्ये 77 कोटीचा निधी देण्याची मागणी

एप्रिल महिन्यात जिल्ह्यात झालेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीने शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले. या अस्मानी संकटामुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतकर्‍यांना दिलासा देण्याकरिता राज्य सरकारने नुकसान भरपाईपोटी 77 कोटीचा निधी देण्याची मागणी जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाकडे केली आहे. जिल्ह्यात 7 ते 16 एप्रिल दरम्यान झालेल्या अवकाळी पावसाने 43 हजार 400 हेक्टरवरील शेती पिकांचे नुकसान झाले. त्यात सर्वाधिक 35 हजार हेक्टरवरील कांदा पिकाचे नुकसान झाले.

कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?.
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप.
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला.
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप.
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले.
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद.
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची.
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी.
देशमुख कुटुंबाच्या भेटीनंतर अभिनेते सायाजी शिंदेंनी सांगितल्या भावना
देशमुख कुटुंबाच्या भेटीनंतर अभिनेते सायाजी शिंदेंनी सांगितल्या भावना.
'उबाठाचा पोपट अन् रडत राऊत...', चित्रा वाघ यांची राऊतांवर जहरी टीका
'उबाठाचा पोपट अन् रडत राऊत...', चित्रा वाघ यांची राऊतांवर जहरी टीका.