AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एकनाथ शिंदे समर्थक आमदार म्हणतात, मी मुख्यमंत्र्यांना घाम फोडतो…तर माझेच 100 आमदार असते

maharashtra assembly election 2024: गरिबांचे शिक्षण वेगळे झाले आणि शेतकऱ्यांचे पोर वेगळे झाले. या भागात पाणी पडते पण त्याचे पाणी दुसऱ्याकडे जाते. आतापर्यंत बोरसे यांच्यासारख्या लोकांना निवडणूक दिले. पण त्याचा काही फायदा नाही.

एकनाथ शिंदे समर्थक आमदार म्हणतात, मी मुख्यमंत्र्यांना घाम फोडतो...तर माझेच 100 आमदार असते
एकनाथ शिंदे
| Updated on: Nov 16, 2024 | 4:53 PM
Share

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या मतदानास अवघे काही दिवस राहिले आहे. २० नोव्हेंबर रोजी मतदान आणि २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीपूर्वी कधी एकत्र असलेले पक्ष आणि आमदार आता एकमेकांच्या विरोधात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक आमदार आणि प्रहार पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी राजकीय परिस्थितीवर भाष्य केले आहे. सटाणा येथील प्रचारसभेत बोलताना बच्चू कडू मुख्यमंत्र्याला घाम फोडून टाकतो, असे वक्तव्य त्यांनी केले आहे. तसेच मी जर जातीचे राजकारण केले असते तर माझेच १०० आमदार निवडून आणले असते. परंतु मी शेतकरीच राजकारण करतो, असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे.

बच्चू कडू म्हणाले, आताची राजकीय अवस्था अशी आहे की कुठल्याही पक्षाची सत्ता येणार नाही. माझ्या विरोधात काँग्रेसने भाजपाला पाठिंबा दिला आहे. परंतु आता आमचे शिवाय सरकार बनणार नाही. आमचा पक्ष लहान असला तरी काम त्या मोठ्या पक्षांपेक्षा मोठे आहे.

कांद्याने दिला झटका

बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांना उद्देशून बच्चू कडू म्हणाले, येथे धमक्या दिल्या जातात. परंतु त्यांना माहीत नाही, आमच्या पक्षाचे नावच प्रहार आहे. त्यामुळे किमान धमक्या देऊ नका. खरं पाहिलं तर शेतकरी संकटात आहे. देशात सर्वात जास्त आत्महत्या शेतकरी आणि तरुण करत आहेत. स्वामिनाथन आयोग आम्ही स्वीकारला तेव्हा शरद पवार कृषिमंत्री होते. तेव्हापासून आतापर्यंत मोदींनी देखील शेतकऱ्यांच्या शेत पिकाला भाव दिला नाही. कुणीही हमीभाव दिला नाही. कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी निर्यात बंदी केली गेली होती. कांद्याविषयी कोणीही लोकसभेत बोलले नाहीत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत कांदा उत्पादकांनी दणका दिला आणि भाजपचा खासदार पडला. आताही कांद्याला भाव नाही तर मत नाही अशी पाटी घरावर लावा.

गरिबांचे शिक्षण वेगळे झाले आणि शेतकऱ्यांचे पोर वेगळे झाले. या भागात पाणी पडते पण त्याचे पाणी दुसऱ्याकडे जाते. आतापर्यंत बोरसे यांच्यासारख्या लोकांना निवडणूक दिले. पण त्याचा काही फायदा नाही. शेतकरी म्हणून कोणीही नेता पुढे नेत नाहीत, असे बच्चू कडू यांनी सांगितले.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.