AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘धर्म म्हणजे स्वयंपाकघर नाही’, सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले?

"पुरुष जी कामं करु शकतात, ती महिला करु शकतात आणि पुरुष जी कामं करु शकत नाही ती कामंही महिला करु शकते. महिलांना मोकळीक दिली तर सर्वांचा उद्धार करु शकते. सगळ्यांचं चांगलं होईल याचा विचार करुन महिला काम करते", असं मत सरसंघचालक मोहन भागवत यांनी मांडलं.

'धर्म म्हणजे स्वयंपाकघर नाही', सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले?
सरसंघचालक मोहन भागवत
| Edited By: | Updated on: Sep 10, 2024 | 8:06 PM
Share

नागपुरात धरमपेठ महिला बॅंकेत गोळवलकर गुरुजी यांच्या तैलचित्राचं अनावरण करण्यात आलं. या कार्यक्रमाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी उपस्थिती लावली. यावेळी मोहन भागवत यांनी भूमिका मांडताना धर्माबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलं. ‘धर्म म्हणजे स्वयंपाकघर नाही तर धर्म म्हणजे समाजाचं काम करणं होय, असं मोहन भागवत आपल्या भाषणात म्हणाले. “पुरुष जी कामं करु शकतात, ती महिला करु शकतात आणि पुरुष जी कामं करु शकत नाही ती कामंही महिला करु शकते. महिलांना मोकळीक दिली तर सर्वांचा उद्धार करु शकते. सगळ्यांचं चांगलं होईल याचा विचार करुन महिला काम करते. अवघ्या 30 वर्षांत ही संस्था मोठी झालीय. कारण या संस्थेत मातृशक्तीचा वाटा आहे. गोळवलकर गुरुजींच्या तैलचीत्राचं अनावरण एक चांगली गोष्ट आहे”, अशी भूमिका मोहन भागवत यांनी मांडली.

“विद्यार्थी असताना दत्तोपंत ठेंगडी हे गोळवलकर गुरुजींच्या घरी राहायचे. मी द्वितीय वर्षे करत होतो. तेव्हा गोळवलकर गुरुजींचं शिक्षण बौद्धीक असायचं. तेव्हा वर्गात पंखा नसायचा. पहिल्या बंदीनंतर गोळवलकर गुरुजी यांनी संघाचं काम शुन्यातून उभं केलं भारतातलं शिक्षण तीन ट्रिलियन डॅालर्स. काही लोकं शिक्षण उद्योग म्हणून करतात. पण शिक्षण म्हणजे ज्ञान द्यायचं असतं”, असं मोहन भागवत म्हणाले.

“पूर्वी लोक म्हणायचे शेती आमचा धर्म. धर्म म्हणजे स्वयंपाकघर नाही. धर्म म्हणजे समाजाचं काम करणं”, असं मोहन भागवत म्हणाले. “संघ चालतो. कारण संघाला काही मिळवायचं नाही. संघाला प्रभावी गट निर्माण करायचा आहे. संघाला समाज संघटित करायचा आहे. समाज संघटित असायला हवा”, असं देखील मत मोहन भागवत यांनी यावेळी मांडलं.

मोहन भागवत आणखी काय म्हणाले?

“एक व्यक्ती लेखकाला घरांची योजना सांगत होता. लेखकांच्या घरांची कॅालनी बांधायची योजना करोडोंची. खिशात रिक्षाला पैसे नाहीत. लेखकांसाठी करोडोच्या घरांची योजना सांगणारा घरी जाताना रिक्षासाठी दोन रुपये मागतो”, असं मोहन भागवत यावेळी म्हणाले.

“नियमाचं पालन केलं पाहिजे. सरसंघचालकांना वैधानिक अधिकार नाही. पण त्यांचा शब्द कोणी खाली पडू देत नाही. पण गोळवलकर गुरुजी स्थानिक संघचालकांना विचारायचे. संघाचं कार्यालय सरसंघचालक असेपर्यंत असते, त्यानंतर दुसऱ्या संरसंघचालकाच्या नावावर. आणीबाणीत आम्ही भूमिगत होतो. धर्म आचारामुळे वाढतो. उपदेशानं नाही”, असंही मोहन भागवत म्हणाले.

कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?.
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?.
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?.
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला.
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्..
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्...
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे.