Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गुगली नेमकी कुणी टाकली? शरद पवार यांच्या स्पष्टीकरणावर देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया

शरद पवार यांनी दिलेल्या स्पष्टीकरणावर आता देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आपण शरद पवार यांच्या तोंडी सत्य आणू शकलो याचा आपल्याला आनंद आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.

गुगली नेमकी कुणी टाकली? शरद पवार यांच्या स्पष्टीकरणावर देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया
Follow us
| Updated on: Jun 29, 2023 | 6:23 PM

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या दाव्यावर स्पष्टीकरण दिलंय. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्यावर डबलगेम केल्याचा आरोप केला होता. 2019च्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर शरद पवार यांनी भाजपसोबत सत्ता स्थापन करण्यासाठी पुढाकार घेतला. पण नंतर त्यांनी माघार घेतली, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. त्यावर शरद पवार यांनी स्पष्टीकर दिलं आहे. देवेंद्र फडणवीस आणि भाजप हे सत्तेसाठी कोणत्या स्तरावर जाऊ शकतात हे दाखवण्यासाठी आमच्या भेटीगाठी झाल्या. आम्ही गुगली टाकली आणि त्यावर देवेंद्र फडणवीस यांची विकेट पडली, असं शरद पवार म्हणाले. शरद पवार यांच्या या भूमिकेवर आता देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका मांडली.

देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?

“मला खूप आनंद आहे की, कमीतकमी नेमकं खरं काय होतं ते मी शरद पवार यांच्या तोंडावर मी आणू शकलो. पण हे सुद्धा अर्धसत्य आहे. उरलेलं सत्य देखील मी फार लवकर घेऊन येईन. मी सुद्धा गुगली फेकणार आणि उरलेलं सत्य बाहेर येईल. माझ्या एका गुगलीने हे सत्य तर बाहेर आणलंच. आता उरलेलं सत्यदेखील बाहेर येईलच. मी हळूहळू त्यांच्याकडूनच ते सत्य बोलून दाखवेल”, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

हे सुद्धा वाचा

शरद पवार नेमकं काय म्हणाले?

“देवेंद्र फडणवीस यांना बाहेर पाठिंबा देण्याची भूमिका ही ज्यावेळेला ते मुख्यमंत्री होती त्यावेळेला जाहीर केली होती. तो त्या काळचा प्रश्न आहे. यानंतरच्या काळात जे त्यांनी सांगितलं की, ते भेटले ही गोष्ट खरी आहे. त्यावेळी त्यांनी अनेक गोष्टींची चर्चा केली ही गोष्टही खरीय”, असं शरद पवार यांनी स्पष्ट सांगितलं.

“त्यांनी स्वत: सांगितलंय की, यासंबंधीचं धोरण मी दोन दिवसांनी बदललं. मी दोन दिवसांत धोरण बदललं तर सोबत यायचं काय कारण होतं? त्यानंतरच्या दोन दिवसांनी त्यांनी शपथ घ्यायचं काय कारण होतं? शपथ घ्यायची होती तर ती अशी चोरुन पहाटे का घेतली?”, असा सवाल शरद पवार यांनी केला.

“आमचा त्यांना पाठींबा होता तर ते सरकार दोन दिवसांत राहिलं का? दोन दिवसात त्यांची सत्ता गेली. त्यांना त्यांचा राजीनामा द्यावा लागला. याचा स्वच्छ अर्थ आहे, सत्तेसाठी आम्ही कुठेही जाऊ शकतो, ही जी त्यांची पावलं होती ती पावलं एकदा समाजासमोर यायला हवेत या दृष्टीने काही गोष्टी केल्या होत्या”, असा स्पष्टीकरण शरद पवार यांनी दिलं.

“देवेंद्र फडणवीस आणि हे सत्तेसाठी काय करु शकतात, कुठे जाऊ शकतात, हे सगळं समजण्याची ही स्थिती आहे, असंही पवार यावेळी म्हणाले.

“हा डाव होता का ते मला माहिती नव्हतं. पण कदाचित लोकांना तुम्हाला माहिती असेल की नसेल ते मला माहिती नव्हतं. पण माझे एक सासरे होते. त्यांचं नाव सधू शिंदे असं होतं. ते देशातले उत्तम गुगली बॉलर होते. या गुगलीवरुन त्यांनी मोठमोठ्या लोकांचे विकेट घेतले होते. मी जगाच्या क्रिकेटचा अध्यक्ष होतो. त्यामुळे मला गुगली कसा टाकायचा आणि कुठं टाकायचा? मी जरी खेळलो नसलो तरी माहिती होतं. यापेक्षा जास्त मला काही विचारु नका. विकेट दिली तर करायचं काय? विकेट घेतलीच पाहिजे”, असं शरद पवार मिश्किलपणे म्हणाले.

महाराष्ट्रात विमानाने यायचा, रेल्वेने सोलापूर गाठायचा अन् मग..
महाराष्ट्रात विमानाने यायचा, रेल्वेने सोलापूर गाठायचा अन् मग...
गोरेंच्या सुपुत्राचा प्रताप! भैय्या पाटलांनी ट्विट केला व्हिडिओ
गोरेंच्या सुपुत्राचा प्रताप! भैय्या पाटलांनी ट्विट केला व्हिडिओ.
कराडने अनेक छोटे-मोठे गुंड जेलमध्ये बोलावून घेतलेत; आव्हाडांचं ट्विट
कराडने अनेक छोटे-मोठे गुंड जेलमध्ये बोलावून घेतलेत; आव्हाडांचं ट्विट.
वाल्मिक कराडने जेलरच्या ऑफिसमध्ये बसून सगळं प्लॅनिंग केलं - मीरा गीते
वाल्मिक कराडने जेलरच्या ऑफिसमध्ये बसून सगळं प्लॅनिंग केलं - मीरा गीते.
कराडला, घुलेला मारहाण होत असताना, बबन गीतेने शेअर केली पोस्ट
कराडला, घुलेला मारहाण होत असताना, बबन गीतेने शेअर केली पोस्ट.
मारहाण घटनेनंतर महादेव गीतेसह चौघांची हर्सुल कारागृहात रवानगी
मारहाण घटनेनंतर महादेव गीतेसह चौघांची हर्सुल कारागृहात रवानगी.
'...अन् देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी एकमेकांना संपवतील' - मनोज जरांगे
'...अन् देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी एकमेकांना संपवतील' - मनोज जरांगे.
मारामारी थापड थुपडीची झाली, पण..; धस नेमकं काय म्हणाले
मारामारी थापड थुपडीची झाली, पण..; धस नेमकं काय म्हणाले.
लाडकी बहीणबंद होणार?सरकारकडे पैसे नाहीत?सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली
लाडकी बहीणबंद होणार?सरकारकडे पैसे नाहीत?सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली.
घरात वडील आजारी अन् काढणीला आलेलं पीक; चिमुकला करतोय शेताची राखण
घरात वडील आजारी अन् काढणीला आलेलं पीक; चिमुकला करतोय शेताची राखण.