AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यात पुन्हा भूकंप? एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्रीपद जाणार… संजय राऊत यांचा मोठा दावा; दिल्लीत काय घडतंय?

ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा सरकार जाण्याचं भाकीत केलं आहे. येत्या 15 ते 20 दिवसात राज्यातील सरकार जाणार आहे. मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली सुरू आहेत, असं राऊत म्हणाले.

राज्यात पुन्हा भूकंप? एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्रीपद जाणार... संजय राऊत यांचा मोठा दावा; दिल्लीत काय घडतंय?
sanjay rautImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Apr 24, 2023 | 11:02 AM
Share

मुंबई : राज्यातील सरकार येत्या 15 ते 20 दिवसात कोसळणार असल्याचा दावा ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी काल केला होता. आजही त्यांनी त्याचा पुनरुच्चार केला. राज्यातील मुख्यमंत्री बदलण्यासाठी दिल्लीत हालचाली सुरू आहेत, असा दावाच संजय राऊत यांनी केला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदावरून पायउतार होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन हा दावा केला. तसेच पाकिस्तानचा मुद्दा वगळून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुका जिंकूनच दाखवाव्यात, असं आव्हानच राऊत यांनी दिलं आहे.

राज्यातील सरकारला धोका नाही. पण मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली सुरू आहेत, असं राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ म्हणाले होते. त्यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. छगन भुजबळ जे बोलतात ते सत्य आहे. त्यांच्या मताशी सहमत आहे. मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली दिल्लीत सुरू आहेत. पडद्यामागे सुरू आहेत. त्याची कारणं काय आहेत हे सर्वांना माहीत आहे. भुजबळांकडे जास्त माहिती असेल तर त्यांनी सांगावं. पण मला माहिती आहे की मुख्यमंत्री बदलण्याच्या हालचाली सुरू आहेत, असं संजय राऊत म्हणाले.

भाजपही रसातळाला

हे मुख्यमंत्री झाल्यापासून भाजपला जे हवं ते साध्य करण्यात ते अपयशी ठरले आहेत. त्यांना आमचं सरकार पाडायचं होतं, त्यासाठी त्यांचा वापर केला. ते काम पूर्ण झालं. पण महाराष्ट्रात जे राजकीय साध्य करायचं होतं ते भाजपला करता आलं नाही. भाजपला ताकद देण्यात मुख्यमंत्री अपयशी ठरले आहेत. हे भाजपच्या लक्षात आलं आहे. मिंधे आल्यापासून भाजपही रसातळाला जात आहे, त्यामुळेच मुख्यमंत्री बदलण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत, असं राऊत म्हणाले.

मोदींना आव्हान

शिवसेना कुणाची हे पाकिस्तानला विचारलं तरी ते सांगतील शिवसेना ठाकऱ्यांची आहे. हे उद्धव ठाकरे म्हणाले. ते बरोबर आहे. पण निवडणूक आयोगाला कळत नाही. त्यात चुकीचं काय? असं बोलणारे निवडणुका जिंकण्यासाठी वारंवार पाकिस्तानचाच जप करतात. पाकिस्तानशिवाय मोदींनी निवडणुका जिंकून दाखवाव्यात, असं आव्हानच राऊत यांनी दिलं.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.