AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Eknath Shinde PC: “रक्ताच्या शेवटचा थेंब असेपर्यंत…”, एकनाथ शिंदे यांनी सरळ स्पष्टपणे सांगितले

Eknath Shinde press conference: गेल्या अडीच वर्षांत राज्याच्या प्रगतीचा वेग मोठा होता. यापूर्वी महाविकास आघाडीने बंद केलेली कामे आम्ही सुरु केली. आम्ही राज्य एक नंबरला नेण्यासाठी दिवसरात्र मेहनत केली. माझ्यासोबत देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह आमच्या सर्व आमदारांनी कामे केली. या सर्वांच्या मेहनतीमुळे राज्य एक नंबरला गेले.

Eknath Shinde PC: रक्ताच्या शेवटचा थेंब असेपर्यंत..., एकनाथ शिंदे यांनी सरळ स्पष्टपणे सांगितले
एकनाथ शिंदे
| Updated on: Nov 28, 2024 | 7:39 AM
Share

महायुती सरकारच्या प्रचंड विजयानंतर शिवसेना नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी प्रथमच पत्रकार परिषद घेतले. यावेळी त्यांनी सरकार स्थापनपासून जनतेच्या मिळालेल्या प्रेमापर्यंत सर्व मोकळ्यापणाने सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना फोन करुन त्यांच्याशी संवाद साधल्याचे सांगितले. महायुतीचे सर्व निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

एकनाथ शिंदे नेमके काय म्हणाले?

अडीच वर्षांत मी जी कामे केली त्यावर मी समाधानी आहे. आम्ही नाराज होऊन रडणारे नाही. लढणारे लोक आहोत. आम्हाला इतका मोठा विजय मिळाला आहे. हा ऐतिहासिक विजय आहे. कारण आम्ही जीव तोडून मेहनत केली. आम्ही लोकांमध्ये गेलो. घरी बसलो नाही. आम्ही जे केले ते लोकांसाठी केले. रक्ताच्या शेवटचा थेंब असेपर्यंत मी जनतेसाठी काम करेल. मला काय मिळाले, त्या पेक्षा जनतेला काय मिळाले हा आमचा उद्देश होता. लाडक्या बहिणी आणि लाडक्या भावांना फायदा झाला हे महत्त्वाचे आहे. त्यांनी मला लाडका भाऊ ही पदवी दिली, तेच महत्वाचे आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

‘कॉमन मॅन’ म्हणून काम केले

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, मी कधी स्वत:ला मुख्यमंत्री समजलो नाही. ‘कॉमन मॅन’ म्हणून काम केले. मी नेहमी तसाच राहिला. त्यामुळे मला प्रोटोकॉलचा अडथळा आला नाही. मला नेहमी केंद्रातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचा पाठिंबा मिळाला. त्यामुळेच आम्हाला अनेक योजना आणता आल्या. महिला आणि लाडक्या भावांसाठी आम्ही योजना आणली. शेतकऱ्यांसाठी योजना आणली. कुटुंबातील प्रत्येक सदस्याला काही ना काही देण्याचा प्रयत्न आमच्या महायुतीच्या सरकारने केला. आम्ही अडीच वर्षांत राज्यातील जनतेसाठी प्रचंड काम केले.

गेल्या अडीच वर्षांत राज्याच्या प्रगतीचा वेग मोठा होता. यापूर्वी महाविकास आघाडीने बंद केलेली कामे आम्ही सुरु केली. आम्ही राज्य एक नंबरला नेण्यासाठी दिवसरात्र मेहनत केली. माझ्यासोबत देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह आमच्या सर्व आमदारांनी कामे केली. या सर्वांच्या मेहनतीमुळे राज्य एक नंबरला गेले. महाविकास आघाडीच्या काळात तिसऱ्या क्रमांकावर असलेले राज्य आम्ही सहा महिन्यात नंबर एकवर आणले, असे एकनाथ शिंदे यांनी माध्यमांसमोर सांगितले.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.