AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आधी राज्यपालांची भेट, नंतर राजभवनावरच आंदोलन, महाराष्ट्रातील काँग्रेस नेते आक्रमक, नेमकं प्रकरण काय?

काँग्रेस नेत्यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेत त्यांना निवेदन दिलं. त्यानंतर राजभवनातच आंदोलन केलं.

आधी राज्यपालांची भेट, नंतर राजभवनावरच आंदोलन, महाराष्ट्रातील काँग्रेस नेते आक्रमक, नेमकं प्रकरण काय?
| Updated on: Oct 31, 2022 | 10:48 PM
Share

मुंबई : महाराष्ट्रातील मोठमोठे प्रस्तावित उद्योग प्रकल्प गुजरातला स्थलांतरीत झाल्याने विरोधकांकडून राज्याच्या शिंदे-भाजप सरकारवर निशाणा साधला जातोय. भाजपकडून या आरोपांवर प्रत्युत्तर देण्यात येत असलं तरी विरोधक चांगलेच आक्रमक झालेले बघायला मिळत आहेत. महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला जाण्यावरुन शिवसेना आणि भाजप यांच्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैऱ्या झडताना दिसत आहेत. विशेष म्हणजे या लढाईत आता काँग्रेसही तितक्याच ताकदीने उतरली आहे. महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला गेले म्हणून काँग्रेस नेत्यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेत त्यांना निवेदन दिलं. या निवदेनात त्यांनी राज्यपालांना शिंदे-भाजप सरकार बरखास्त करण्याची मागणी केली. त्यानंतर काँग्रेसच्या शिष्टमंडळाने राजभवन परिसरातच राज्य सरकार विरोधात आंदोलन केलं.

यावेळी काँग्रेस नेत्यांनी राजभवनाबाहेर फलक घेऊन शिंदे-भाजप सरकारवर टीका केली. उद्योगाप्रमाणे शिंदे-फडणवीसांना सुद्धा गुजरातला घेऊन जा. महाराष्ट्र सुखी होईल, अशा आशयाचे फलक त्यांनी आपल्या हाती धरले होते.

“हे सरकार गुजरातधार्जीन आहे. म्हणून उद्योगधंदेच काय शिंदे-फडणवीस तुम्ही पण गुजरातला चालले जा. राज्यपाल महोदयांनी तात्काळ हे सरकार बरखास्त करावं, अशी मागणी आम्ही निवेदनाच्या माध्यमातून केली आहे”, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.

“ईडीचं सरकार महाराष्ट्रात आल्यापासून राज्यातील उद्योग मोठ्या प्रमाणात गुजरातला चालले आहेत. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी औरंगाबादमध्ये जाहीरपणे सांगितलं की, आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हस्तक आहोत. त्याचदिवशी जनतेचा धडधडीत अपमान करण्याचं काम महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी केलं. ते महाराष्ट्राच्या जनतेचे हस्तक आहेत. त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेचं रक्षण करायला हवं. पण त्यांनी जाहीरपणे सांगितलं की मोदी-शाहचे हस्तक आहोत”, अशी टीका नाना पटोले यांनी केली.

“हे सरकार शेतकरी विरोधी आहे, तरुणांच्या विरोधात आणि गरिबांच्या विरोधात आहेत. राज्यपालांनी हे सरकार तात्काळ बरखास्त करावं”, अशी मागणी नाना पटोले यांनी केली.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.