AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कल्याणमध्ये काँग्रेसचे देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागतासाठी बॅनर

Congress, BJP and ShivSena : राज्यातील बॅनरवरमध्ये कल्याणमधील पोस्टर चांगलेच चर्चेत आले आहे. कारण या ठिकाणी काँग्रेसने भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत केले आहे. परंतु त्यामागील कारणही वेगळेच आहे.

कल्याणमध्ये काँग्रेसचे देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागतासाठी बॅनर
Image Credit source: tv9
| Updated on: Jun 18, 2023 | 4:26 PM
Share

सुनील जाधव, डोंबिवली : बँनरवार राज्यातील राजकारणात सुरुच आहे. आता कल्याणमधील एक बॅनर चांगलेच चर्चेत आले आहे. कल्याणमध्ये चक्क काँग्रेसने भारतीय जनता पक्षाचे नेते अन् राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत केले आहे. यामुळे हे बॅनर चर्चेत आले आहे. परंतु फडणवीस यांचे स्वागत काँग्रेसने करण्यामागे कारणही तसेच आहे. ‘कही पे निगाहे कहीपे निशाना’, असा हा प्रकार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. यामुळे येणारे-जाणारे लोकही या बॅनरची चर्चा करत असतात.

काँग्रेसने केल फडणवीस यांचे स्वागत

कल्याणमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लवकरच आगमन होणार आहे. फडणवीस यांच्या स्वागताचे बॅनर काँग्रेसकडून लाववण्यात आले आहे. मात्र यावर येताना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनाही घेऊन या… असा संदेश लिहिण्यात आला आहे. काँग्रेसने या माध्यमातून बाळासाहेबांच्या सेनेला आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री देसाई यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केलाय.

आमदार भोईर यांनी घेतला काँग्रेसचा समाचार

कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी काँग्रेसचा चांगलाच समाचार घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना गुपचूप कोण कोण भेटायला येत? यासंदर्भात थेट भाष्य केलं आहे. त्यांनी म्हटले आहे की, पालकमंत्री हरवले नाहीत. त्यांच्याकडे दोन चार्ज आहेत. एक ठाणे जिल्हा आणि दुसरा सातारा. त्यामुळे ठाणे जिल्ह्याला वेळ कमी दिला गेला असेल पण हरवले अस बोलणं योग्य नाही असे विश्वनाथ भोईर यांनी स्पष्ट केलंय.

मुख्यमंत्र्यांकडे काँग्रेसचे लोकही येतात

मंत्री आहेत ते…कुठे जाणार आहेत? नियोजन समितीची बैठक असते तेव्हा ते भेटतच असतात. दोन चार्ज असल्यामुळे त्यांच्याकडून वेळ कमी दिला जातो हे मान्य आहे, असेही ते म्हणाले. जे लोक काम करतात त्यांच्यात उगाच लुडबुड करू नको, असा टोलाही विश्वनाथ भोईर यांनी काँग्रेसला लगावला आहे. ज्या लोकांचं ध्येय राज्याचा, मतदारसंघाचा विकास करणे आहे, अशा लोकांना डिवचून उपयोग नाही. उलट अशा लोकांकडून कामे करुन घ्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कामाचे माणूस आहेत. मी नेहमी बघतो मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे काँग्रेस राष्ट्रवादी पक्षाची माणसेही गुपचूप येत असतात अन् कामे करून घेतात. मग हा दुटप्पीपणा कशाला? असा सवालही भोईर यांनी उपस्थित केलाय.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.