AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यपाल- ठाकरे सरकार वादाचा नवा अंक, भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरु निवडीची प्रक्रिया सुरु

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) आणि ठाकरे सरकार (Uddhav Thackeray Government) यांच्यातील वादाचा नवा अंक मुंबई विद्यापीठ कुलगुरु निवडीवरुन सुरु झालाय.

राज्यपाल- ठाकरे सरकार वादाचा नवा अंक, भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरु निवडीची प्रक्रिया सुरु
उदय सामंत. भगतसिंह कोश्यारी, उद्धव ठाकरेImage Credit source: tv9
| Edited By: | Updated on: Apr 05, 2022 | 12:38 PM
Share

मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) आणि ठाकरे सरकार (Uddhav Thackeray Government) यांच्यातील वादाचा नवा अंक सुरु झालाय. ठाकरे सरकारनं विधिमंडळात महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा, 2016 मध्ये ( Maharashtra Public Universities Act 2016 ) सुधारणा करणारं विधेयक मंजूर केलं होतं. या विधेकयकाला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अद्याप मंजुरी दिलेली नाही. हे विधेयक मंजूर होऊन तीन महिने पूर्ण झालेले आहेत. राज्यपालांनी हे विधेयक बाजूला ठेवत मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरु निवडीसाठी प्रक्रिया सुरु केली आहे. मुंबई विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेला आणि अकॅडकमीक परिषधेला संयुक्त बैठक घेण्याची सूचना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केली आहे. या संयुक्त बैठकीत कुलगुरु शोध समिती स्थापन करण्यासाठी नावांची शिफारस करण्याचं सूचवण्यात आलं आहे.

राज्यपालांनी विद्यापीठ कायद्यातील बदल स्वीकारल्यास कुलगुरु निवड कशी

डिसेंबर 2021 मध्ये राज्य सरकारनं महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा 2016 मध्ये सुधारणा केली होती. विद्यापीठ कायद्यातील सुधारणेद्वारे राज्य सरकारनं कुलगुरु निवड प्रक्रिया बदल केला होता. नव्या कायद्यानुसार राज्य सरकारनं शिफारस केलेल्या नावाला राज्यपालांनामंजुरी द्यावी लागेल. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री हे प्र कुलगुरु असतील. राज्य सरकारनं स्थापन केलेली समिती पाच नावांची शिफारस करेल. राज्य सरकार दोन नावांची शिफारस राज्यपालांकडे करेल, त्यापैकी एका नावाला राज्यपालांना मंजुरी द्यावी लागेल.

कुलगुरु निवडीची सध्याची प्रक्रिया

सध्याच्या कायद्यानुसार राज्यपाल हे कुलगुरुंची निवड करतात. कुलगुरुंची निवड करण्यासाठी उच्च किंवा सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती, प्राचार्य, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे सचिव, संचालक आणि संसदेच्या कायद्याद्वारे स्थापित नामांकित संस्थांचे प्रतिनिधी त्या समितीत असतात.

राज्य सरकारकडून डिसेंबरमध्ये विद्यापीठ कायद्यात सुधारणा

डिसेंबर 2021 मध्ये महाराष्ट्र सरकारनं राज्यपाल निवडीची प्रक्रिया बदलली. राज्य सरकारनं महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा 2016 मध्ये बदल केला. या बदलाला भाजप आणि इतर संघटनांनी राज्यपालांना या कायद्याला मंजुरी देऊ नये, अशा प्रकारची निवेदनं दिली होती. या पार्श्वभूमीवर राज्यपालांनी महाराष्ट्रातील ठाकरे सरकारचा निर्णय बाजूला ठेवत मुंबई विद्यापीठातील कुलगुरु निवडीच्या प्रक्रियेला सुरुवात केली आहे.

इतर बातम्या:

Girish Bapat on metro : पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यास मंजुरी द्यावी, गिरीष बापट यांची मागणी

Amravati : राज्यात ऊन-पावासाचा खेळ, पावसामुळे आंबा गळती तर ऊन्हामुळे मोसंबी होरपळली

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.