Mumbai Fire | मुंबईत गिरगावमध्ये भीषण आग, दोघांचा होरपळून मृत्यू, ९ जणांना रेस्क्यू करुन वाचवले

Mumbai Girgaon Building Fire : मुंबईतील गिरगाव चौपाटीवर शनिवारी रात्री एका रहिवाशी बिल्डींगमध्ये भीषण आग लागली. या आगीत दोन जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. चार मजली इमारतींच्या तिसऱ्या मजल्यावर शनिवारी रात्री ही आग लागली.

Mumbai Fire | मुंबईत गिरगावमध्ये भीषण आग, दोघांचा होरपळून मृत्यू, ९ जणांना रेस्क्यू करुन वाचवले
massive fire broke out in a ground-plus-three-storey building at Girgaon
Follow us
| Updated on: Dec 03, 2023 | 11:45 AM

मुंबई | 3 डिसेंबर 2023 : मुंबईतील गिरगाव चौपाटी भागातून आगीची मोठी दुर्घटना समोर आली आहे. गिरगावमधील एका चार मजली इमारतीला आग लागली. या आगीत दोन जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तीन मजली इमारतींच्या तिसऱ्या मजल्यावर शनिवारी रात्री ही आग लागली. या आगीच्या घटनेची माहिती मिळल्यावर अग्निशमनदलाच्या १५ गाड्या दाखल झाल्या. अग्नीशमन दलाने दोन तास प्रयत्न केल्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवले. यावेळी नऊ जणांना रेस्क्यू करुन वाचवण्यात अग्निशमन दलाला यश आले. मात्र या घटनेत हिरेन शाह (वय, ६०) आणि नलिनी शाह (८२) या दोघांचा मृत्यू झाला. दरम्यान रेस्क्यू करुन काढलेल्या नऊ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आगीचे कारण काय

गिरगावमध्ये ही आग कशामुळे लागली, याबाबत अधिकृत माहिती मिळाली नाही. परंतु पोलिसांनी या प्रकरणाची नोंद केली आहे. पोलीस आणि अग्निशमनदलाचे जवान ही आग कशामुळे लागली, याचे कारण शोधत आहेत. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आगीच्या घटनेमुळे परिसरातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली पाहणी

गिरगाव चौपाटीमध्ये काल आग लागली होती, त्या ठिकाणी जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी केली. तसेच नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत करण्याचे आदेश दिले. ज्यांची घर जळालेले आहे त्यांना पाच लाखांची मदत तत्काळ जाहीर केलेली आहे.

हे सुद्धा वाचा

वसईत स्कारपीओ गाडीला आग

वसईत उभ्या असलेल्या स्कारपीओ गाडीला भीषण आग लागून ती पूर्णपणे जळून खाक झाली आहे. वसई विरार महापालिकेच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळावर पोहचून आग विझवली आहे. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवित हानी झाली नाही. वसई पश्चिम सनसिटी शंभर फुटी रोडवरील टेम्पो स्टॅण्डवर शनिवारी ही घटना घडली आहे. स्कारपीओ मागच्या एक वर्षांपासून एकाच ठिकाणी उभी होती. अज्ञात गर्दुळ्यांनी ही आग लावली असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.