Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एकतर आरक्षण येईल नाही तर माझं मरणच… मनोज जरांगे पाटील यांचा निर्वाणीचा इशारा

मराठा आरक्षण आंदोलनाचं लोण पुन्हा एकदा पसरण्याची शक्यता आहे. मनोज जरांगे पाटील यांनी येत्या 20 जानेवारी रोजी मुंबईत मोठं आंदोलन करण्याचं जाहीर केलं आहे. जरांगे पाटील यांनी शिवाजी पार्कवर उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. या आंदोलनात खेड्यापाड्यातील आणि गावगाड्यातील प्रत्येक मराठा बांधवांनी सहभागी व्हावं, असं आवाहन मनोज जरांगे यांनी केलं आहे. त्यामुळे या आंदोलनाकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.

एकतर आरक्षण येईल नाही तर माझं मरणच... मनोज जरांगे पाटील यांचा निर्वाणीचा इशारा
manoj jarange patilImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Dec 28, 2023 | 2:53 PM

मुंबई | 28 डिसेंबर 2023 : मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आंदोलनाची पूर्ण तयारी केली आहे. मनोज जरांगे मुंबईत आमरण उपोषण करणार आहेत. यावेळी त्यांनी मराठा समाजातील लाखो बांधावांना मुंबईत बोलावलं आहे. मिळेल त्या वाहनाने या, येताना आपलं रेशनपाणी सोबत आणा. कुणाच्याही भरवश्यावर बसू नका, अशा सूचना देतानाच आता ही शेवटची लढाई आहे. आता एक तर आरक्षण मिळेल नाही तर माझा मृतदेहच येईल, असा निर्वाणीचा इशाराच मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी टीव्ही9 मराठीशी विशेष संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. ही शेवटची लढाई आहे. मुंबईत इतक्या ताकदीने धडक द्या, इतक्या ताकदीने धडक द्या की मुंग्यांसारखे मराठे धडकले पाहिजे. मुंगीलाही जायला जागा राहणार नाही, इतकी प्रचंड गर्दी करा. पण शांततेत या. कोणीही शब्द मोडायचा नाही. शांततेत करोडोच्या संख्येने या. हे शेवटचं आंदोलन आहे. एक तर आरक्षण घेऊ, नाही तर माझं मरणच होईल, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

तर लेकरांचे हाल होतील

आरक्षण मिळेल नाही तर मरण पत्करेल. त्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही. आपल्यासाठी कोणी नाही. आपल्या बापजाद्यांनी अनेकांना मोठं केलं. पण आम्हाला मोठं करण्यासाठी कोणीच पुढे येत नाही. मग ते कशाचे आपले नेते? आपण आपल्याच लेकरासाठी लढायचं आहे. नाही तर आपल्या लेकरांचे खूप हाल होतील, असं मनोज जरांगे म्हणाले.

नोंदी मिळाल्या, कायदा पारीत का नाही?

या आधीही आम्ही सरकारला तीन महिन्याचा वेळ दिला. नंतर चाळीस दिवस नंतर दोन महिने. त्याही वेळेत सरकारने आरक्षण दिलं नाही. नोंदी मिळाल्या. आम्ही आधी चार दिवसाचा वेळ दिला होता. कायदा पारित करण्यासाठी वेळ दिला पाहिजे असं मुख्यमंत्री म्हणाले. आम्ही वेळ दिला. आता 54 लाखांच्या नोंदी सापडल्या आहेत. मग कायदा पारीत करून आरक्षण देण्यात अडचण काय आहे? हेच आमचं म्हणणं आहे. 54 लाख लोकांच्या नोंदी सापडल्याने त्यांचं कल्याण झालं. त्यांना आरक्षण मिळालं. मराठ्यांच्या एकजुटीचा हा विजय आहे. पण आम्हा सर्वांना आरक्षण पाहिजे. त्यावर आम्ही ठाम आहोत, असं त्यांनी स्पष्ट केलं.

राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान.
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?.
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप.
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला.
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप.
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले.
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद.
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची.
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी.
देशमुख कुटुंबाच्या भेटीनंतर अभिनेते सायाजी शिंदेंनी सांगितल्या भावना
देशमुख कुटुंबाच्या भेटीनंतर अभिनेते सायाजी शिंदेंनी सांगितल्या भावना.