AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नीतीश कुमार यांना महाराष्ट्रात मोठा धक्का; कपिल पाटील नवा पक्ष स्थापन करणार

ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर जेडीयू नेते आणि बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी इंडिया आघाडीची साथ सोडली आहे. इंडिया आघाडीसाठी पुढाकार घेणारे नीतीश कुमारच एनडीएसोबत गेल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. नीतीश कुमार यांचा निर्णय इंडिया आघाडीतील नेत्यांना पटला नाही. तसाच जेडीयूतील नेत्यांनाही नीतीश कुमार यांना आवडला नाही.

नीतीश कुमार यांना महाराष्ट्रात मोठा धक्का; कपिल पाटील नवा पक्ष स्थापन करणार
kapil patilImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 03, 2024 | 2:12 PM
Share

मुंबई | 3 मार्च 2024 : जेडीयूचे नेते आणि बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी इंडिया आघाडीला सोडून एनडीएचा हात हाती घेतला आहे. त्यामुळे इंडिया आघाडीला मोठा धक्का बसला आहे. नीतीश कुमार यांच्या या निर्णयाने इंडिया आघाडी कमकुवतही झाली आहे. मात्र, नीतीश कुमार यांच्या आघाडी सोडण्याने केवळ इंडिया आघातील नेतेच नाराज झालेले नाहीत तर जेडीयूचे नेतेही नाराज झाले आहेत. नीतीश कुमार यांच्या या निर्णयाचे महाराष्ट्र जेडीयूमध्ये पडसाद उमटले आहेत. महाराष्ट्र जेडीयूचे नेते आणि आमदार कपिल पाटील यांनी पक्षाला रामराम करणार असून नव्या पक्षाची स्थापना करणार असल्याची घोषणा केली आहे.

आमदार कपिल पाटील हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे नेते आहेत. ते जनता दल यूनायटेडचे राष्ट्रीय महासचिव आहेत. मात्र, नीतीश कुमार यांनी घेतलेल्या निर्णयावर कपिल पाटील नाराज आहेत. पुरोगामी शक्तींनी भाजपसोबत जायला नकोय, असं त्याचं मत आहे. त्यामुळेच त्यांनी जेडीयूला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला आहे. कपिल पाटील आज नव्या राजकीय पक्षाची स्थापना करणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

उद्धव ठाकरेंच्या उपस्थित नवा शुभारंभ

कपिल पाटील यांनी आज धारावीत एका सभेचं आयोजन केलं आहे. या सभेला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीतच कपिल पाटील नव्या पक्षाची घोषणा करणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. कपिल पाटील यांच्या या निर्णयामुळे राज्यातील जेडीयूचं अस्तित्वच संपुष्टात येणार आहे. आज हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत कपिल पाटील नवीन राजकीय इनिंग सुरू करणार आहेत. तसेच इंडिया आघाडीसोबतच आपण राहणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय.

आम्ही पवार-ठाकरेंसोबतच

कपिल पाटील यांनी काल या संदर्भात प्रतिक्रिया दिली होती. रविवारी एक सभा आयोजित केली आहे. नीतीश कुमार यांनी भूमिका बदलली. त्यानंतर मी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. स्वतः शरद पवार साहेबांनी देखील मला भेटायला बोलवलं होतं. नीतीश कुमार हे भाजपसोबत गेले असले तरी आम्ही उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यासोबतच आहोत. आमच्या अनेक बैठका पार पडल्या आहेत. धारावीत आम्ही मोठी सभा घेऊन आमची भूमिका स्पष्ट करणार आहोत. या सभेला उद्धव ठाकरेही उपस्थित असतील. जे भाजपविरोधक आहेत, ते आम्हाला पाठिंबा देतील, असं कपिल पाटील यांनी स्पष्ट केलं.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.