AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुण्यातील कोयता हल्ला प्रकरणावर राज ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, बाकीचे लोक बघ्याच्या…

पुण्यात दिवसाढवळ्या एका तरुणीवर कोयता घेऊन हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. एका तरुणाच्या प्रसंगावधानामुळे या तरुणीचे प्राण वाचले आहेत. मनसे अध्यक्षव राज ठाकरे यांनी या तरुणाचे कौतुक केले आहे.

पुण्यातील कोयता हल्ला प्रकरणावर राज ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, बाकीचे लोक बघ्याच्या...
Raj ThackerayImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Jun 28, 2023 | 11:45 AM
Share

मुंबई : पुण्यातील दर्शना पवार हत्याकांडाचे प्रकरण ताजे असतानाच काल एक धक्कादायक प्रकार घडला. एका तरुणीवर भररस्त्यात कोयत्याने हल्ला करण्यात येत होता. पण लेशपाल जवळगे या तरुणाने जीव धोक्यात घालून या तरुणीला वाचवलं. त्यामुळे या तरुणीचे प्राण वाचले. त्यामुळे लेशपालचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. त्याचं कौतुक होत असतानाच मनसे अध्यक्षङ राज ठाकरे यांनी या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ही प्रतिक्रिया व्यक्त करताना राज ठाकरे यांनी बघ्यांना आणि राज्य सरकारलाही फटकारले आहे.

राज ठाकरे यांनी ट्विट करत कालच्या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. काल पुण्यात एका तरुणीवर हल्ल्याची दुर्दैवी घटना घडली. भररस्त्यात बाकीचे लोकं बघत असताना लेशपाल जवळगे नावाचा तरुण तिथे होता म्हणून ती तरुणी बचावली. लेशपालने जे धाडस दाखवलं त्याबद्दल त्याचं मनापासून कौतुक, पण आसपास इतकी लोकं बघ्याच्या भूमिकेत का गेली किंवा जातात ह्याचं आश्चर्य वाटतं. अर्थात पुढे कशाला चौकशीचा ससेमिरा असा विचार लोकांच्या मनात येत असेलही कदाचित. पण यासाठी पोलिसांनी लोकांना आश्वस्त करायला हवं, असं आवाहन राज ठाकरे यांनी केलं आहे.

असे प्रकार तुमच्या आसपास घडत नाही ना?

दर्शना पवारच्या हत्येची दुर्दैवी घटना नुकतीच घडलेली असताना, तसाच काहीसा प्रकार परत घडणं हे गंभीर आहे. सुशोभीकरणातून लोकांचे डोळे पुरेसे दिपलेत, त्यामुळे प्रशासनाकडून कायद्याचा धाक निर्माण होईल हे देखील बघायला सरकारची हरकत नसावी, असा राज्य सरकारला टोला लगावतानाच माझ्या महाराष्ट्र सैनिकांना सांगायला नको की असे प्रकार तुमच्या आसपास घडत नाहीत ना? याकडे डोळसपणे लक्ष ठेवा. आणि वेळीच धावून जा, असं आवाहनही त्यांनी मनसैनिकांना केले.

काय घडलं नेमकं?

पुण्यातील सदाशिव पेठेत पेरू गेट पोलीस चौकीच्या जवळच काल सकाळी एक तरुण आणि तरुणी गाडीवरून जात असताना आरोपीने ही गाडी अडवली. तसेच तरुणीच्या जवळ येऊन मला तुझ्याशी बोलायचे आहे. तू बोलत का नाहीस? असा सवाल त्याने केला. या तरुणीने आरोपीशी बोलण्यास नकार दिला. त्यामुळे या तरुणाचा राग अनावर झाला आणि त्याने बॅगेतून आणलेला कोयता बाहेर काढून थेट तरुणीवर उगारला. त्यामुळे ही तरुणी भयभीत झाली आणि जीव वाचवण्यासाठी ती सैरावैरा धावू लागली. या ठिकाणी असंख्य लोक होते. पण तिला वाचवण्यासाठी कोणीही पुढे आले नाही.

लेशपालने मात्र जीव धोक्यात घालून या तरुणीला वाचवले. आरोपीला गच्च पकडून त्याने बाजूलाच असलेल्या पेरू गेट पोलीस चौकीत गेला आणि आरोपीला पोलिसांच्या स्वाधीन केलं. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दाखल झाला आहे. आता विश्राम बाग पोलिसांनी आरोपीचा ताबा घेतला असून त्याच्यावर गुन्हा दाकल केला आहे. आरोपीचे नाव शंतनु लक्ष्मण जाधव आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.