AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लोकसभेतील यशानंतरही महाराष्ट्रात काँग्रेसमध्ये बंडाचे निशाण, १६ बड्या नेत्यांनी राष्ट्रीय अध्यक्षांना लिहिले पत्र

Mumbai Congress leaders letter: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची 25 जूनला बैठक होणार आहे. आगामी चार राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या बैठकांना सुरूवात झाली आहे. सोमवारी झारखंड विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक पार पडली.

लोकसभेतील यशानंतरही महाराष्ट्रात काँग्रेसमध्ये बंडाचे निशाण, १६ बड्या नेत्यांनी राष्ट्रीय अध्यक्षांना लिहिले पत्र
congressImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 25, 2024 | 9:07 AM
Share

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला महाराष्ट्रात चांगले यश मिळाले. परंतु आता विधानसभा निवडणुकीपूर्वी मुंबई काँग्रेसमधील वाद समोर आला आहे. मुंबई काँग्रेसमधील वाद आता थेट दिल्ली दरबारी पोहचला आहे. मुंबई काँग्रेसच्या १६ बड्या नेत्यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र लिहिले आहे. वर्षा गायकवाड यांच्या विरोधात हे नेते सक्रीय झाले आहे. त्यांनी मुंबई काँग्रेस अध्यक्षपदावरुन वर्षा गायकवाड यांना हटवण्याची मागणी केली आहे. या नेत्यांनी वर्षा गायकवाड यांच्या कामकाजाच्या शैलीवर आपेक्ष नोंदवला आहे. तसेच पक्षात काही संघटनात्मक बदलाची मागणी केली आहे.

मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निर्णयाकडे लक्ष

मुंबई काँग्रेसमधील १६ बड्या नेत्यांनी राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र लिहिले आहे. यात पक्षातील अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांचाही समावेश असल्याने याप्रकरणी मल्लिकार्जुन खर्गे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, वरिष्ठ नेता केसी वेणुगोपाल आणि राहुल गांधी यांची भेट घेण्यासाठी यातील अनेक नेते दिल्लीत दाखल झाले आहे.

कोणी लिहिले पत्र

विधानसभा निवडणुका आणि मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील संघटनेत बदलाची मागणी काँग्रेस नेत्यांनी 16 जून रोजी लिहिलेल्या पत्रात केली आहे. या नेत्यांमध्ये राज्यसभा सदस्य आणि काँग्रेस कार्यकारिणी सदस्य चंद्रकांत हंडोरे, माजी शहर पक्षप्रमुख जनार्दन चांदूरकर आणि भाई जगताप, ज्येष्ठ नेते नसीम खान, सुरेश शेट्टी, मधु चव्हाण, चरणसिंग सप्रा, झाकीर अहमद आणि महाराष्ट्र काँग्रेसचे कोषाध्यक्ष तसेच अमरजीत मन्हास यांचा समावेश आहे. राष्ट्रीय अध्यक्षांनी लवकरच मुंबई भेटीवर येण्याची मागणीही यावेळी या निवेदनात केली आहे. मुंबईतील काँग्रेस नेत्यांचे हे पत्र चर्चेचा विषय ठरला होता.

दिल्लीत काँग्रेस नेत्यांची बैठक

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची 25 जूनला बैठक होणार आहे. आगामी चार राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या बैठकांना सुरूवात झाली आहे. सोमवारी झारखंड विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक पार पडली. त्यानंतर आज मंगळवारी महाराष्ट्रातील नेत्यांची केंद्रीय काँग्रेस नेत्यांसोबत बैठक होत आहे. या बैठकीला राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे उपस्थित राहणार आहेत.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.