Vande Bharat Express : मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेस कधी सुरु होणार? आली तारीख

Vande Bharat Express : महाराष्ट्रातून ३ जूनपासून चौथी वंदे भारत एक्स्प्रेस धावणार होती. परंतु ओडिशामधील रेल्वे अपघातानंतर रेल्वेचा हा उद्घाटन सोहळा लांब पडला. आता हा सोहळा कधी होणार? यासंदर्भात रेल्वेकडून माहिती दिली आहे.

Vande Bharat Express : मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेस कधी सुरु होणार? आली तारीख
five Vande Bharat Express lauch at one time 26 june
Follow us
| Updated on: Jun 18, 2023 | 5:06 PM

नवी दिल्ली, मुंबई : ओडीशामध्ये 3 ट्रेनचा भीषण अपघात झाला होता. या अपघातामुळे मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेसचा 3 जून रोजी होणारा लोकार्पणाचा कार्यक्रम रद्द करण्यात आला होता. कोकणातून जाणाऱ्या वंदे भारतचे उद्घाटन मडगाव येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हि़डिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणार होते. मात्र, ओडिशामधील अपघातानंतर हा कार्यक्रम रद्द झाला अन् त्याच दिवशी रिकामी गाडी मुंबईला परत आली. ओडिशात येथील अपघातामुळे रेड सिग्नल मिळालेल्या या गाडीला आता ग्रीन सिग्नल मिळाला आहे. वंदे भारत एक्स्प्रेस कधी धावणार त्याची घोषणा रेल्वे मंत्रालयाने केली आहे.

कधी सुरु होणार वंदे भारत

कोकणवासीय ज्या बहुचर्चित रेल्वेची प्रतिक्षा करत होते, ती आता संपली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 27 जून रोजी एकाच वेळी पाच वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवतील. रेल्वे मंत्रालयाच्या अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गोवा-मुंबई, पाटणा-रांची, भोपाळ-इंदूर, भोपाळ-जबलपूर आणि बेंगळुरू-हुबळी-धारवाड या पाच रेल्वे 27 जूनपासून धावणार आहे. या नवीन गाड्या सुरू झाल्यानंतर देशातील रेल्वे नेटवर्कवर धावणाऱ्या वंदे भारत गाड्यांची एकूण संख्या 23 होईल. या गाड्यांच्या समावेशामुळे या शहरांतील रहिवाशांना अधिक सोयीसुविधा उपलब्ध होतील, त्यांना आरामदायी आणि आधुनिक वाहतुकीचे साधन मिळेल.

वेळ काय असणार?

रेल्वेच्या म्हणण्यानुसार, ही ट्रेन आठवड्यातून 6 दिवस धावेल, तिची सेवा शुक्रवारी बंद असेल. जर तुम्हाला मुंबईहून गोव्याला जायचे असेल तर ही गाडी पहाटे ५.२५ वाजता सुटेल. दुपारी १.१५ वाजता गोव्याला पोहोचेल. ही गाडी गोव्याहून दुपारी २.३५ वाजता सुटून रात्री १०.२५ वाजता पोहोचेल. दादर, ठाणे, पनवेल, खेड, रत्नागिरी, कणकवली या स्थानकावरही ती थांबणार आहे.

हे सुद्धा वाचा

8 डबे अन् भाडे किती

या ट्रेनमध्ये एससी चेअरकार आणि एक्झिक्युटिव्ह क्लास असे एकूण 8 डबे आहेत. जर तुम्ही चेअर कारने प्रवास करत असाल तर तुमचे भाडे 1100 ते 1600 दरम्यान असेल, तर एक्झिक्युटिव्ह क्लासचे भाडे 2200-2800 च्या दरम्यान असण्याची शक्यता आहे.

राज्यातील इतर वंदे भारत एक्स्प्रेसचे वेळापत्रक

मुंबई ते गांधीनगर ट्रेन

  • मुंबई सेंट्रेलवरुन सकाळी 6:00 वाजता सुटेल आणि गांधीनगरला 12:25 वाजता पोहचणार आहे.
  • गांधीनगरवरुन दुपारी 2:05 वाजता सुटेल तर मुंबईत रात्री 8:25 ला पोहचणार आहे.
  • मुंबई ते गांधीनगर अंतर : 522 km

मुंबई ते गांधीनगर भाडे

  • AC Chair car (CC) : 1255
  • Exec. Chair Car (EC) : 2435
  • गांधीनगर ते मुंबई भाडे
  • AC Chair car (CC) : 1420
  • Exec. Chair Car (EC) : 2630

मुंबई ते सोलापूर वंदे भारत

  • मुंबईवरुन दुपारी 4.05 वाजता सुटते तर सोलापूरला रात्री 10.40 वाजता पोहचते. पुण्यात ही गाडी संध्याकाळी 7.10 मिनिटांनी पोहचते.
  • सोलापूरवरुन सकाळी 6:05 वाजता सुटते तर मुंबईत दुपारी 12:35 वाजता पोहचते. पुण्यात ही गाडी सकाळी 9:15 वाजता येते.
  • मुंबई ते सोलापूर अंतर 455

मुंबई ते सोलापूर भाडे

  • AC Chair car (CC) : 1255
  • Exec. Chair Car (EC) : 2435
  • सोलापूर ते मुंबई भाडे
  • AC Chair car (CC) : 1150
  • Exec. Chair Car (EC) : 2185

मुंबई ते साईनगर (शिर्डी)

  • मुंबईवरुन सकाळी 6:20 वाजता सुटते, शिर्डीला 11:40 वाजता पोहचते.
  • शिर्डीवरुन संध्याकाळी 5:25 वाजता सुटते आणि मुंबईला रात्री 10:50 वाजता पोहचते.
  • मुंबई ते शिर्डी अंतर 343
  • मुंबई ते शिर्डी भाडे
  • AC Chair car (CC) : 975
  • Exec. Chair Car (EC) : 1840
  • शिर्डी ते मुंबई भाडे
  • AC Chair car (CC) : 1130
  • Exec. Chair Car (EC) : 2020
Non Stop LIVE Update
रायगडाच्या सर्व वाटा बंद, पायऱ्यांवरुन पाण्याचे लोट, सरकारचा निर्णय
रायगडाच्या सर्व वाटा बंद, पायऱ्यांवरुन पाण्याचे लोट, सरकारचा निर्णय.
जरांगेंनी केली चंद्रकांतदादांची नक्कल,'म्हणाले फडणवीस साहेब त्यांना...
जरांगेंनी केली चंद्रकांतदादांची नक्कल,'म्हणाले फडणवीस साहेब त्यांना....
विधान परिषद निवडणूकीत दगाफटका होण्याची भीती, आमदारांची हॉटेलवारी
विधान परिषद निवडणूकीत दगाफटका होण्याची भीती, आमदारांची हॉटेलवारी.
'शिवप्रेमींची फसवणूक...खरी वाघनखं येथे आहेत - इतिहास अभ्यासक इंद्रजीत
'शिवप्रेमींची फसवणूक...खरी वाघनखं येथे आहेत - इतिहास अभ्यासक इंद्रजीत.
परब म्हणाले तुम्हाला असं म्हटलं तर ?, उपसभापतींची मग अखेर दीलगिरी....
परब म्हणाले तुम्हाला असं म्हटलं तर ?, उपसभापतींची मग अखेर दीलगिरी.....
'मुंबईकरांनी आपली काळजी घ्यावी, कारण...,' काय म्हणाले होसाळीकर
'मुंबईकरांनी आपली काळजी घ्यावी, कारण...,' काय म्हणाले होसाळीकर.
म्हणून मुंबई तुंबली, काय म्हणाले अजित पवार, ग्लोबल वार्मिंग..आणि काय
म्हणून मुंबई तुंबली, काय म्हणाले अजित पवार, ग्लोबल वार्मिंग..आणि काय.
राजापूरात पुरात अडकलेल्या नागरिकांची सुटका, पोलीसांचे रेस्क्यू ऑपरेशन
राजापूरात पुरात अडकलेल्या नागरिकांची सुटका, पोलीसांचे रेस्क्यू ऑपरेशन.
मुंबईची झाली तुंबई, मुख्यमंत्र्यांनी घेतला कंट्रोल रुमचा ताबा
मुंबईची झाली तुंबई, मुख्यमंत्र्यांनी घेतला कंट्रोल रुमचा ताबा.
पुण्यात पुन्हा 'हिट एण्ड रन',रात्री दोघा बिट मार्शलना धडक, एकाचा बळी
पुण्यात पुन्हा 'हिट एण्ड रन',रात्री दोघा बिट मार्शलना धडक, एकाचा बळी.