AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईकर कष्टाळू! सुट्टी न घेता काम करण्यात नंबर वन

मुंबई : दिवस-रात्र धावणाऱ्या शहरांमध्ये मुंबई शहराचं नाव आवर्जून घेतलं जातं. आता याच धावत्या मुंबईचं आणखी एक वैशिष्ट्य समोर आलं आहे. विशेष म्हणजे, मुंबईकर कामात इतके व्यस्त असतात की, वर्षभरात फार कमी वेळा सुट्टीवर जातात. त्यामुळे मुंबई कधीही थांबत नाही, ती घड्याळाच्या काट्यानुसार चालते. एका सर्वेक्षणातून ही बाब समोर आली आहे. एका ट्रॅव्हल वेबसाईटने केलेल्या […]

मुंबईकर कष्टाळू! सुट्टी न घेता काम करण्यात नंबर वन
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 5:00 PM
Share

मुंबई : दिवस-रात्र धावणाऱ्या शहरांमध्ये मुंबई शहराचं नाव आवर्जून घेतलं जातं. आता याच धावत्या मुंबईचं आणखी एक वैशिष्ट्य समोर आलं आहे. विशेष म्हणजे, मुंबईकर कामात इतके व्यस्त असतात की, वर्षभरात फार कमी वेळा सुट्टीवर जातात. त्यामुळे मुंबई कधीही थांबत नाही, ती घड्याळाच्या काट्यानुसार चालते. एका सर्वेक्षणातून ही बाब समोर आली आहे.

एका ट्रॅव्हल वेबसाईटने केलेल्या सर्वेक्षणानुसार, मुंबईतील 51 टक्के लोक कामातून सुट्टीच घेत नाही. कारण त्यांना ऑफिसच्या कामातून वेळ मिळत नसल्याचं कारण समोर आलं आहे. तर 40 टक्के मुंबईकरांना सुट्ट्या मिळत असतानाही ते सुट्ट्या घेत नाहीत. कारण सुट्ट्यांच्या बदल्यात त्यांना पैसे कमावण्यात अधिक रस आहे. तर 27 टक्के मुंबईकर असे आहेत की, ज्यांनी गेल्या वर्षी (2017) ऑफिसला दांडीच मारलेली नाही.

या वेबसाईटने पुढे दिलेल्या सर्वेक्षणानुसार, 44 टक्के मुंबईकर असे आहेत, ज्यांनी गेल्यावर्षी 10 दिवसांपेक्षा कमी सुट्ट्या घेतल्या आहेत. तसेच मुंबईनंतर वर्षभरात 10 दिवसांपेक्षा कमी सुट्ट्या घेणाऱ्यांमध्ये दिल्लीचा क्रमांक लागतो. गेल्या वर्षी 43 टक्के दिल्लीकर दहापेक्षा कमी दिवस सुट्टीवर गेले होते.

मुंबईत काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला यशस्वी व्हायचे असते. त्यामुळे वारंवार सुट्टया घेतल्याने आपण अपयशी ठरु, अशीही भावना मुंबईकरांच्या मनात असल्याचे या सर्वेक्षणाच्या निरीक्षणात मांडण्यात आली आहे. एकंदरीत मेट्रो सिटी म्हणून जगभर प्रसिद्ध असलेल्या आणि कधीही न थांबा केवळ धावत राहणाऱ्या मुंबईत अविरत काम करणाऱ्यांची संख्याही काही कमी नाही, हेच या ट्रॅव्हल वेबसाईटच्या सर्वेक्षणातून समोर आले आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.