Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईकर कष्टाळू! सुट्टी न घेता काम करण्यात नंबर वन

मुंबई : दिवस-रात्र धावणाऱ्या शहरांमध्ये मुंबई शहराचं नाव आवर्जून घेतलं जातं. आता याच धावत्या मुंबईचं आणखी एक वैशिष्ट्य समोर आलं आहे. विशेष म्हणजे, मुंबईकर कामात इतके व्यस्त असतात की, वर्षभरात फार कमी वेळा सुट्टीवर जातात. त्यामुळे मुंबई कधीही थांबत नाही, ती घड्याळाच्या काट्यानुसार चालते. एका सर्वेक्षणातून ही बाब समोर आली आहे. एका ट्रॅव्हल वेबसाईटने केलेल्या […]

मुंबईकर कष्टाळू! सुट्टी न घेता काम करण्यात नंबर वन
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 5:00 PM

मुंबई : दिवस-रात्र धावणाऱ्या शहरांमध्ये मुंबई शहराचं नाव आवर्जून घेतलं जातं. आता याच धावत्या मुंबईचं आणखी एक वैशिष्ट्य समोर आलं आहे. विशेष म्हणजे, मुंबईकर कामात इतके व्यस्त असतात की, वर्षभरात फार कमी वेळा सुट्टीवर जातात. त्यामुळे मुंबई कधीही थांबत नाही, ती घड्याळाच्या काट्यानुसार चालते. एका सर्वेक्षणातून ही बाब समोर आली आहे.

एका ट्रॅव्हल वेबसाईटने केलेल्या सर्वेक्षणानुसार, मुंबईतील 51 टक्के लोक कामातून सुट्टीच घेत नाही. कारण त्यांना ऑफिसच्या कामातून वेळ मिळत नसल्याचं कारण समोर आलं आहे. तर 40 टक्के मुंबईकरांना सुट्ट्या मिळत असतानाही ते सुट्ट्या घेत नाहीत. कारण सुट्ट्यांच्या बदल्यात त्यांना पैसे कमावण्यात अधिक रस आहे. तर 27 टक्के मुंबईकर असे आहेत की, ज्यांनी गेल्या वर्षी (2017) ऑफिसला दांडीच मारलेली नाही.

या वेबसाईटने पुढे दिलेल्या सर्वेक्षणानुसार, 44 टक्के मुंबईकर असे आहेत, ज्यांनी गेल्यावर्षी 10 दिवसांपेक्षा कमी सुट्ट्या घेतल्या आहेत. तसेच मुंबईनंतर वर्षभरात 10 दिवसांपेक्षा कमी सुट्ट्या घेणाऱ्यांमध्ये दिल्लीचा क्रमांक लागतो. गेल्या वर्षी 43 टक्के दिल्लीकर दहापेक्षा कमी दिवस सुट्टीवर गेले होते.

मुंबईत काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला यशस्वी व्हायचे असते. त्यामुळे वारंवार सुट्टया घेतल्याने आपण अपयशी ठरु, अशीही भावना मुंबईकरांच्या मनात असल्याचे या सर्वेक्षणाच्या निरीक्षणात मांडण्यात आली आहे. एकंदरीत मेट्रो सिटी म्हणून जगभर प्रसिद्ध असलेल्या आणि कधीही न थांबा केवळ धावत राहणाऱ्या मुंबईत अविरत काम करणाऱ्यांची संख्याही काही कमी नाही, हेच या ट्रॅव्हल वेबसाईटच्या सर्वेक्षणातून समोर आले आहे.

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी.
देशमुख कुटुंबाच्या भेटीनंतर अभिनेते सायाजी शिंदेंनी सांगितल्या भावना
देशमुख कुटुंबाच्या भेटीनंतर अभिनेते सायाजी शिंदेंनी सांगितल्या भावना.
'उबाठाचा पोपट अन् रडत राऊत...', चित्रा वाघ यांची राऊतांवर जहरी टीका
'उबाठाचा पोपट अन् रडत राऊत...', चित्रा वाघ यांची राऊतांवर जहरी टीका.
कुणाल कामराने पुन्हा एकदा सरकारला डिवचलं, 'त्या' ट्वीटची चर्चा
कुणाल कामराने पुन्हा एकदा सरकारला डिवचलं, 'त्या' ट्वीटची चर्चा.
'धनंजय मुंडे माझ्या घरी आले अन्...', अंजली दमानियांचा मोठा गौप्यस्फोट
'धनंजय मुंडे माझ्या घरी आले अन्...', अंजली दमानियांचा मोठा गौप्यस्फोट.
2 दिवस महिलेच्या मृतदेहासोबतच राहीला, मृतदेहा शेजारी बसून जेवणही केलं
2 दिवस महिलेच्या मृतदेहासोबतच राहीला, मृतदेहा शेजारी बसून जेवणही केलं.
धनंजय देशमुख आज केज पोलिसांना भेटणार; जेल प्रशासनावर उपस्थित केली शंका
धनंजय देशमुख आज केज पोलिसांना भेटणार; जेल प्रशासनावर उपस्थित केली शंका.
31 एप्रिलला कामराकडून पलावा पुलाचे उद्घाटन',मनसे नेत्याचा सरकारला टोला
31 एप्रिलला कामराकडून पलावा पुलाचे उद्घाटन',मनसे नेत्याचा सरकारला टोला.
हत्येच्या कटाचे धसांचे गंभीर आरोप; मुंडेंची प्रतिक्रिया
हत्येच्या कटाचे धसांचे गंभीर आरोप; मुंडेंची प्रतिक्रिया.
दम नाही, त्यांनी हिंदी सिनेमे पाहणं कमी करावं, दमानियांचा धसांना सल्ला
दम नाही, त्यांनी हिंदी सिनेमे पाहणं कमी करावं, दमानियांचा धसांना सल्ला.