शेवटच्या क्षणी तिकीट, केवळ 13 दिवस प्रचार, 48 मतांनी शिंदे सेनेचा उमेदवार विजयी

Mumbai North West Lok Sabha seat Result: मुंबई उत्तर पश्चिम मतदार संघातून त्यांची उमेदवारी ऐनवेळी घोषित करण्यात आली. मुंबई उत्तर पश्चिम सारख्या मतदार संघात त्यांना प्रचारासाठी केवळ 13 दिवस मिळाले. मतमोजणी सुरु असताना चित्र वारंवार बदलत होते.

शेवटच्या क्षणी तिकीट, केवळ 13 दिवस प्रचार, 48 मतांनी शिंदे सेनेचा उमेदवार विजयी
ravindra waikar eknath shinde udhav thackeray
Follow us
| Updated on: Jun 05, 2024 | 7:51 AM

लोकसभा निवडणुकीचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळाले नाही. परंतु भाजपच्या नेतृत्वाखाली एनडीएचे सरकार सत्तेवर येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार आहेत. या निवडणुकीत महाराष्ट्रातून सर्वात जास्त धक्का भारतीय जनता पक्षाला बसला आहे. भाजप केवळ 9 जागाच मिळवू शकला आहे. मुंबई, विदर्भ, मराठवाड्यात भाजपचा जवळपास पराभव झाला. या सर्वांमध्ये मुंबई उत्तर पश्चिममधील निवडणुकीची चर्चा रंगली आहे. या ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार रवींद्र वायकर केवळ 48 मतांनी विजयी झाले आहे. महाराष्ट्रात 48 मतदार संघात हा सर्वात कमी फरकाचा विजय आहे.

अशी राहिली लढत

निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, वायकर यांना मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा लोकसभा मतदार संघातून 4,52,644 लाख मते मिळाली. तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांना 4,52,596 मते मिळाली. म्हणेज दोघांमधील मतांचे अंतर केवळ 48 राहिले आहे.

केवळ 13 दिवस प्रचार

मुंबई जोगेश्वरी ईस्टमधील आमदार रवींद्र वायकर यावर्षाच्या सुरुवातीला उद्धव ठाकरे यांची साथ सोडत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आले. मुंबई उत्तर पश्चिम मतदार संघातून त्यांची उमेदवारी ऐनवेळी घोषित करण्यात आली. मुंबई उत्तर पश्चिम सारख्या मतदार संघात त्यांना प्रचारासाठी केवळ 13 दिवस मिळाले. मतमोजणी सुरु असताना चित्र वारंवार बदलत होते. कधी अमोल कीर्तिकर पुढे तर कधी रवींद्र वायकर पुढे असे चुरस सुरु होती. एक प्रसंग आला की, जेव्हा कीर्तिकर फक्त एका मताने पुढे होते. परंतु शेवटी अमोल कीर्तिकर यांचा 48 मतांनी पराभव झाला. आता उद्धव ठाकरे यांनी या निकालात गोंधळ झाल्याचा आरोप केला आहे. या निकालाविरोधात न्यायालयात दाद मागण्याचा विचार ते करत आहेत.

हे सुद्धा वाचा

प्रत्येक मताला महत्व

लोकशाहीमध्ये प्रत्येक मताला महत्त्व आहे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार एका मताने पडले होते. मग 48 तर भरपूर आहेत. मी देवाला सांगितले होतं की, माझ्याकडून चांगले काम होईल तरच मला जिंकून आणा. आता मला देशासाठी, महाराष्ट्रासाठी अन् मुंबईसाठी काम करायचे आहे, अशी प्रतिक्रिया रवीद्र वायकर यांनी विजयानंतर दिली.

Non Stop LIVE Update
Hathras : निष्पापांच्या मृत्यूला जबाबदार असणारा भोलेबाबा आहे तरी कोण?
Hathras : निष्पापांच्या मृत्यूला जबाबदार असणारा भोलेबाबा आहे तरी कोण?.
सत्संगात चेंगराचेंगरी, चिमुकले, म्हाताऱ्या-कोताऱ्यांचाही बळी, एकच टाहो
सत्संगात चेंगराचेंगरी, चिमुकले, म्हाताऱ्या-कोताऱ्यांचाही बळी, एकच टाहो.
'या' 8 ठिकाणावर पिकनिकला जाताय? मग ग्रुपने एन्जॉय करता येणार नाही कारण
'या' 8 ठिकाणावर पिकनिकला जाताय? मग ग्रुपने एन्जॉय करता येणार नाही कारण.
'या' महिन्यात महाराष्ट्र चिंब भिजणार, तुमच्या जिल्ह्यात कसा पडणार पाऊस
'या' महिन्यात महाराष्ट्र चिंब भिजणार, तुमच्या जिल्ह्यात कसा पडणार पाऊस.
अंबादास दानवेंच्या 'त्या' शिवीगाळच्या वक्तव्यावरून ठाकरेंकडून माफी
अंबादास दानवेंच्या 'त्या' शिवीगाळच्या वक्तव्यावरून ठाकरेंकडून माफी.
विधान परिषदेच्या 11 जागा अन् 12 जण रिंगणात, कोणाची मतं फुटणार?
विधान परिषदेच्या 11 जागा अन् 12 जण रिंगणात, कोणाची मतं फुटणार?.
लाडकी बहीण योजना, सरकारनं बदलला निर्णय, या कागदपत्रांशिवाय मिळणार 1500
लाडकी बहीण योजना, सरकारनं बदलला निर्णय, या कागदपत्रांशिवाय मिळणार 1500.
संसदेत मोदींना बोलणंही अवघड, विरोधकांचा एकच गोंधळ; सभागृहात काय घडलं?
संसदेत मोदींना बोलणंही अवघड, विरोधकांचा एकच गोंधळ; सभागृहात काय घडलं?.
'जयंतराव तुम्ही नकली वाघांसोबत असली... ', मुख्यमंत्र्यांची थेट ऑफर
'जयंतराव तुम्ही नकली वाघांसोबत असली... ', मुख्यमंत्र्यांची थेट ऑफर.
दिवे घाटातील माऊलींच्या पालखीचं विहंगम दृश्य; ड्रोनमध्ये कैद नजारा
दिवे घाटातील माऊलींच्या पालखीचं विहंगम दृश्य; ड्रोनमध्ये कैद नजारा.