AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेवटच्या क्षणी तिकीट, केवळ 13 दिवस प्रचार, 48 मतांनी शिंदे सेनेचा उमेदवार विजयी

Mumbai North West Lok Sabha seat Result: मुंबई उत्तर पश्चिम मतदार संघातून त्यांची उमेदवारी ऐनवेळी घोषित करण्यात आली. मुंबई उत्तर पश्चिम सारख्या मतदार संघात त्यांना प्रचारासाठी केवळ 13 दिवस मिळाले. मतमोजणी सुरु असताना चित्र वारंवार बदलत होते.

शेवटच्या क्षणी तिकीट, केवळ 13 दिवस प्रचार, 48 मतांनी शिंदे सेनेचा उमेदवार विजयी
ravindra waikar eknath shinde udhav thackeray
| Updated on: Jun 05, 2024 | 7:51 AM
Share

लोकसभा निवडणुकीचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळाले नाही. परंतु भाजपच्या नेतृत्वाखाली एनडीएचे सरकार सत्तेवर येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार आहेत. या निवडणुकीत महाराष्ट्रातून सर्वात जास्त धक्का भारतीय जनता पक्षाला बसला आहे. भाजप केवळ 9 जागाच मिळवू शकला आहे. मुंबई, विदर्भ, मराठवाड्यात भाजपचा जवळपास पराभव झाला. या सर्वांमध्ये मुंबई उत्तर पश्चिममधील निवडणुकीची चर्चा रंगली आहे. या ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार रवींद्र वायकर केवळ 48 मतांनी विजयी झाले आहे. महाराष्ट्रात 48 मतदार संघात हा सर्वात कमी फरकाचा विजय आहे.

अशी राहिली लढत

निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, वायकर यांना मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा लोकसभा मतदार संघातून 4,52,644 लाख मते मिळाली. तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांना 4,52,596 मते मिळाली. म्हणेज दोघांमधील मतांचे अंतर केवळ 48 राहिले आहे.

केवळ 13 दिवस प्रचार

मुंबई जोगेश्वरी ईस्टमधील आमदार रवींद्र वायकर यावर्षाच्या सुरुवातीला उद्धव ठाकरे यांची साथ सोडत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आले. मुंबई उत्तर पश्चिम मतदार संघातून त्यांची उमेदवारी ऐनवेळी घोषित करण्यात आली. मुंबई उत्तर पश्चिम सारख्या मतदार संघात त्यांना प्रचारासाठी केवळ 13 दिवस मिळाले. मतमोजणी सुरु असताना चित्र वारंवार बदलत होते. कधी अमोल कीर्तिकर पुढे तर कधी रवींद्र वायकर पुढे असे चुरस सुरु होती. एक प्रसंग आला की, जेव्हा कीर्तिकर फक्त एका मताने पुढे होते. परंतु शेवटी अमोल कीर्तिकर यांचा 48 मतांनी पराभव झाला. आता उद्धव ठाकरे यांनी या निकालात गोंधळ झाल्याचा आरोप केला आहे. या निकालाविरोधात न्यायालयात दाद मागण्याचा विचार ते करत आहेत.

प्रत्येक मताला महत्व

लोकशाहीमध्ये प्रत्येक मताला महत्त्व आहे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार एका मताने पडले होते. मग 48 तर भरपूर आहेत. मी देवाला सांगितले होतं की, माझ्याकडून चांगले काम होईल तरच मला जिंकून आणा. आता मला देशासाठी, महाराष्ट्रासाठी अन् मुंबईसाठी काम करायचे आहे, अशी प्रतिक्रिया रवीद्र वायकर यांनी विजयानंतर दिली.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.