AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO: एनसीबीचे धाडसत्रं, संजय राऊत म्हणतात, याप्रकरणाचे धागेदोरे मुंबईच नव्हे तर दिल्लीपर्यंत

प्रभाकर साईल यांचा व्हिडीओ आल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी मोठं विधान केलं आहे. या प्रकरणाचे धागेदोरे मुंबईच नव्हे तर दिल्लीपर्यंत पोहोचले आहेत. (NCB's raid connection with Delhi, says sanjay raut)

VIDEO: एनसीबीचे धाडसत्रं, संजय राऊत म्हणतात, याप्रकरणाचे धागेदोरे मुंबईच नव्हे तर दिल्लीपर्यंत
sanjay raut
| Edited By: | Updated on: Oct 25, 2021 | 11:10 AM
Share

मुंबई: प्रभाकर साईल यांचा व्हिडीओ आल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी मोठं विधान केलं आहे. या प्रकरणाचे धागेदोरे मुंबईच नव्हे तर दिल्लीपर्यंत पोहोचले आहेत. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करावी, अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे.

संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ही मागणी केली. हे षडयंत्र आहे. पैशाचा खेळ आणि मनी लाँड्रिंग झालीय. ईडीने याची चौकशी करावी. आत बसलेल्या व्यक्ती कोण आहेत? आता हा खेळ सुरू झाला आहे, असं सांगतानाच प्रभाकर साईल या प्रकरणातील साक्षीदार आहे. त्याचा बालही बाका होणार नाही, याचा विश्वास मी तुम्हाला देतो. त्याला त्रास देण्याचा प्रयत्न होईल. पण आम्ही त्याच्या पाठी आहोत. या प्रकरणाचे धागेदोरे मुंबईच नव्हे तर दिल्लीपर्यंत आहेत. या मुलाने मोठं धाडस केलं. त्याने देशावर उपकार केले. मी त्याच्या धाडसाचं कौतुक करतो. हीच खरी देशभक्ती आहे. आता अनेक गोष्टी बाहेर येतील. आता मलिक यांनी काही गोष्टी बाहेर आणल्या. आता इंटरव्हलनंतर बाकीची स्टोरी बाहेर येईल, असं राऊत म्हणाले.

साईलचे देशावर उपकार

साईल हा अत्यंत महत्त्वाचा साक्षीदार आहे. त्याची सुरक्षा केली पाहिजे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांशी बोललो. राज्याला बदनाम करण्याचं षडयंत्रं रचलं गेलं. त्याला काही अधिकाऱ्याने हे बिंग फोडलं. पण या मुलाने बिंग फोडलं. त्याच्या साहसाला मी दाद देतो. त्याने देशावर उपकार केले, असंही त्यांनी सांगितलं.

तथ्य आणि सत्य धक्कादायक

वसुली गँग कुणाच्या होत्या. मी सांगितलं ना. इंटरव्हलपर्यंतची गोष्ट नवाब मलिक यांनी सांगितली आहे, इंटरव्हलनंतरची कथा स्क्रिनप्ले मी तुम्हाला सांगेन, असं सांगतानाच या प्रकरणातील तथ्य आणि सत्य धक्कादायक आहे. देशभक्तीचा मुखवटा पांघरून काय होतं त्याची चौकशी झाली पाहिजे, असं राऊत म्हणाले.

तुमच्या काळजाला वार झाला

भाजपने या संपूर्ण प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. त्यावरही राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. सीबीआयची चौकशी व्हावी. जरुर व्हावी. सीबीआय तुमच्या खिशात आहे ना? तुम्हीही अनेक व्हिडीओ बाहेर आणले. पण तुमच्या काळजाला वार झाला. तुम्ही म्हणताय ना चौकशी करा… करा. अजून दहा व्हिडीओ मी तुम्हाला देतो, करा चौकशी, असं आव्हानच त्यांनी दिलं.

सॅम मनी लाँड्रिंगमध्ये

केपी गोसावी, परमबीर सिंग कुठे हे भाजपला माहीत असेल. गोसावीचा घातपात झाला की नाही हे ज्याने शंका उपस्थित केली. तेच सांगू शकतील. किंवा त्यांचे समर्थक पार्टीच सांगेल, असं ते म्हणाले. या महाराष्ट्राला बदनाम करण्याची एकही संधी त्यांनी सोडली नाही. सॅम डिसोजाचा संदर्भ मनी लॉन्ड्रिंगमध्ये येते. बड्या लोकांचे पैसे तो परदेशात पाठवतो. माझी मागणी आहे या प्रकरणाची चौकशी करावी, असंही त्यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या:

‘समीर दाऊद वानखेडे’, नवाब मलिक म्हणतात, फ्रॉड इथून सुरु होतो, समजून घ्या नेमकं काय?

कोरोनाने भारतीय माणसाचे सरासरी आयुष्य दोन वर्षांनी घटवले, या दाहक निष्कर्षाचे काय, सामनातून सवाल

आई-बहिणीला दिलेल्या त्रासाचा वचपा, पॅरोलवर सुटलेल्या बापाची मुलाकडून हत्या

(NCB’s raid connection with Delhi, says sanjay raut)

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.