AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘लेटरबॉम्ब’ कट कसा शिजला?; राष्ट्रवादीच्या युवा नेत्याने केला ‘हा’ दावा

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी लेटरबॉम्ब टाकून महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. (ncp youth leader's tweet on parambir singh's letter bomb)

'लेटरबॉम्ब' कट कसा शिजला?; राष्ट्रवादीच्या युवा नेत्याने केला 'हा' दावा
Parambir Singh
| Updated on: Mar 25, 2021 | 8:36 PM
Share

मुंबई: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी लेटरबॉम्ब टाकून महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. या लेटरबॉम्बवर अनेक तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत. सिंग यांचे बोलविते धनी कुणी आहे का? असा सवालही केले जात आहेत. मात्र,  राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष रविकांत वरपे यांनी नवाच गौप्यस्फोट केल्याने खळबळ उडाली आहे. (ncp youth leader’s tweet on parambir singh’s letter bomb)

रविकांत वरपे यांनी एक ट्विट करून हा गौप्यस्फोट केला आहे. लेटरबॉम्ब कट कसा जन्माला आला? परमबीर सिंगांची पत्नी काही कंपन्यांत भागीदार आहेत. पोलीसांकडून टीआरपी घोटाळ्याची चौकशी सुरू होताच एका कंपनीला ईडीची नोटीस आली. मग विदर्भातील नातेवाईक आमदाराद्वारे सिंगांनी महाराष्ट्र ‘विरोधी’ नेत्याची आणि दिल्ली‘शहां’ची भेट घेतली. तूर्तास एवढेच, बाकी लवकरच!, असं ट्विट वरपे यांनी केलं आहे. त्यामुळे लेटरबॉम्बमागे फार मोठं षडयंत्र असल्याचं दिसून येत आहे.

वरपेंचा रोख नेमका काय?

वरपे यांनी या ट्विटमध्ये थेट कुणाची नावं घेतलेली नाहीत. परंतु त्यांनी समजतील असे संकेत दिले आहेत. त्यामुळे या सर्व खेळीमागे भाजप असल्याचं त्यांना म्हणायचं आहे. परंतु वरपे यांनी भाजपचा थेट उल्लेख केलेला नाही. टीआरपी घोटाळ्याच्या चौकशीला ब्रेक लागण्यासाठी सिंग यांच्या पत्नीला ईडीची नोटीस आली. त्यानंतर राज्य सरकारला बदनाम करण्यासाठी त्यांनी लेटरबॉम्ब टाकला. लेटरबॉम्ब टाकण्यापूर्वी ते दिल्लीतील भाजपच्या आणि महाराष्ट्रातील भाजपच्या बड्या नेत्याला भेटले होते, असे संकेत वरपे यांनी दिले आहेत. त्यामुळे आता राजकारणीच नव्हे तर अधिकाऱ्यांनाही ईडीचा धाक दाखवला जात आहे का? ईडीचा धाक दाखवून अधिकाऱ्यांचा वापर केला जात आहे का? असा सवाल केला जात आहे.

आज काय घडले?

दरम्यान, आज अँटालिया बॉम्बस्फोट प्रकरणी सहायक निरीक्षक सचिन वाझे यांना 3 एप्रिलपर्यंत विशेष एनआयए न्यायालयाने कोठडी सुनावली आहे. वाझेंकडून काही प्रश्नांची उत्तरे हवी असल्याने त्यांची कोठडी देण्याची मागणी एनआयएने कोर्टाला केली होती. यावेळी एनआयएने सचिन वाझे तपासात सहकार्य करत नसल्याचं कोर्टाला सांगितलं. तसेच मनसुख हिरेन हत्या प्रकरणात दोन आरोपींना अटक केली आहे. या दोघांना वाझेंच्या समोर बसवून तपास करायचा आहे. त्यामुळे वाझेंची कोठडी वाढवून द्यावी, अशी मागणी एनआयएने केली आहे. त्याशिवाय वाझेंच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले असून त्याचा रिपोर्ट यायचा बाकी आहे. तसेच वाझेंच्या गाडीतून मिळालेले पुरावे फोरेन्सिक पुराव्याशी पडताळणी करून पाहायचे आहे. डीएनए मॅच करण्यासाठी पाचही गाड्यांचे सँपल घेण्यात आले आहेत. शिवाय आरोपीने सीसीटीव्ही डीव्हीआर गायब केला असून तोही शोधायचा आहे. पंचतारांकित हॉटेलमध्ये रुम बुक करण्यासाठी आरोपीने 12 लाख रूपये दिले होते. त्याचीही माहिती घ्यायची असल्याचं एनआयएने कोर्टात सांगितलं आहे. याशिवाय वाझेंच्या आवाजाचे नमुनेही फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आल्याची माहिती कोर्टाला देण्यात आली आहे. (ncp youth leader’s tweet on parambir singh’s letter bomb)

संबंधित बातम्या:

मनसुख हिरेन-सचिन वाझेंची 17 फेब्रुवारीला भेट, CSMT भागातील सीसीटीव्ही फूटेज समोर

मनसुख हिरेन यांना अर्धमेल्या अवस्थेत खाडीत फेकले; एटीएसच्या हाती मोठा पुरावा

सचिन वाझेंचे DNA सॅम्पल तपासणार, ‘त्या’ कारमध्ये सापडलेल्या साहित्याशी पडताळणी

(ncp youth leader’s tweet on parambir singh’s letter bomb)

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.