AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India Alliance Protest | मुंबईत तणाव वाढला, पोलीस आणि आंदोलक आमनेसामने, नेमकं काय घडतंय?

इंडिया आघाडीकडून मुंबईत गांधी जयंतीच्या निमित्ताने पदयात्रा काढण्यात आली आहे. मैं भी गाधी असं नाव या पदयात्रेला देण्यात आलं आहे. या पदयात्रेत इंडिया आघाडीचे कार्यकर्ते आणि पोलीस आमनेसामने आले आहेत.

India Alliance Protest | मुंबईत तणाव वाढला, पोलीस आणि आंदोलक आमनेसामने, नेमकं काय घडतंय?
| Updated on: Oct 02, 2023 | 3:30 PM
Share

मुंबई | 2 ऑक्टोबर 2023 : इंडिया आघाडीकडून मुंबईत महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या निमित्ताने पदयात्रा काढण्यात आली आहे. ‘मैं भी गांधी’ असं नाव या पदयात्रेला देण्यात आलं आहे. या पदयात्रेत इंडिया आघाडीचे कार्यकर्ते आणि पोलीस आमनेसामने आले आहेत. शेकडो कार्यकर्त्यांचा मोठा जमाव या पदयात्रेच्या निमित्ताने रस्त्यावर उतरला आहे. दुसरीकडे पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त आहे. पोलिसांकडून कार्यकर्त्यांची धरपकड सुरु झालीय. पण कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. पोलीस आणि कार्यकर्ते यांच्यात धुमश्चक्री बघायला मिळत आहे. त्यामुळे परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झालीय.

मुंबईच्या मेट्रो सिनेमापासून पुढे कार्यकर्ते पदयात्रेसाठी चालायला लागले. फॅशन स्ट्रीटजवळ सर्व कार्यकर्ते पोहोचले. पोलीस इंडिया आघाडीच्या नेत्यांसोबत बोलण्याचे प्रयत्न करत आहेत. पण कार्यकर्ते ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाहीत. पोलीस कार्यकर्ते आणि नेत्यांशी बोलण्याचा प्रयत्न करत आहेत. या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकरली होती. पण तरीसुद्धा हा मोर्चा निघाला. या मोर्चामध्ये शेकडो कार्यकर्ते जमा झाले आहेत. काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड, काँग्रेस नेते अस्लम शेख यांच्यासह अनेक नेते या रॅलीत सहभागी झाले.

गांधीजींचा पुतळा रस्त्यावर ठेवून भजन सुरु

या सगळ्या गदारोळादरम्यान रस्त्यातच महात्मा गांधी यांचा पुतळा बसवण्यात आला. त्यानंतर ‘रघुपती राघव राजाराम’ हे भजन सुरु करण्यात आलं. यावेळी वर्षा गायकवाड या देखील कार्यकर्त्यांसोबत रस्त्यावर बसल्या आहेत. काँग्रेस नेत्या विद्या चव्हाण या देखील इथे आहेत. त्यांच्यासह अनेक दिग्गज नेते या रॅलीत आहेत. ही रॅली सुरुवातीला मंत्रालयाच्या दिशेला निघाली होती. यावेळी पोलिसांनी रॅली अडवली.

“राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त इंडिया आघाडीने आयोजित केलेल्या पदयात्रेआधीच पोलिसांनी दंडेलशाही सुरू केली असून आम आदमी पक्षाच्या १०० कार्यकर्त्यांची धरपकड केली आहे. पूर्णपणे शांततेने होणार असलेल्या या कार्यक्रमाला कोणत्याही कारणाविना मज्जाव करण्यात येत असून हा सगळा प्रकार ब्रिटिशराजची आठवण करून देणारा आहे”, अशी भावना मुंबई कॅांग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केली.

“ब्रिटिशांच्या क्रूर आणि अन्यायकारक राजवटीत बापूंच्या आंदोलनात सहभागी होणाऱ्यांची अशीच धरपकड व्हायची. आज स्वातंत्र्यानंतर ७५ वर्षांनी महात्मा गांधींच्या जयंतीनिमित्त शांततापूर्व पदयात्रेतही पोलिसांची दंडेलशाही सुरू आहे. हे नेमकं कोणाचं राज्य सुरू आहे, भारतात लोकशाही असताना शांततेच्या मार्गाने होणाऱ्या पदयात्रेत दंडेलशाही करण्याचा आदेश पोलिसांना कोणी दिला?”, असा संतप्त सवाल वर्षा गायकवाड यांनी केला.

“सरकारची ही कारवाई ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीची आठवण करून देणारीच आहे. या उन्मत्त सरकारला आम्ही गांधीजींच्या मार्गानेच विरोध करू”, असंही वर्षा गायकवाड यावेळी म्हणाल्या.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.