AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येतून देणार महाराष्ट्राला वंदे भारत ट्रेन, भाडे, वेळापत्रक अन् थांबे

Mumbai-Jalna Vande Bharat Express timing | प्रधानमंत्री नरेंद्र मोदी अयोध्यातून महाराष्ट्राला वंदे भारत ट्रेन भेट देणार आहे. महाराष्ट्राला मिळणारी ही सहावी ट्रेन आहे. महाराष्ट्रात पहिली वंदे भारत एक्स्प्रेस मुंबई ते गांधीनगर सुरु झाली होती. त्यानंतर आता मुंबई ते जालना ही ट्रेन सुरु होत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येतून देणार महाराष्ट्राला वंदे भारत ट्रेन, भाडे, वेळापत्रक अन् थांबे
| Updated on: Dec 30, 2023 | 12:21 PM
Share

अयोध्या, मुंबई, दि. 30 डिसेंबर 2023 | प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज अयोध्या दौरा होणार आहेत. पंतप्रधान मोदी या दौऱ्यात अयोध्या धाम रेल्वे स्टेशन आणि अयोध्या एअरपोर्टच्या उद्घाटन करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या एकदिवसीय दौऱ्यात अयोध्येला 15 हजार 700 कोटी रुपयांच्या योजनांची भेट मिळणार आहे. तसेच नरेंद्र मोदी यांच्या या दौऱ्यात देशाला सहा वंदे भारत ट्रेन मिळणार आहे. त्यात महाराष्ट्रातील एक वंदे भारत ट्रेन आहे. पंतप्रधान दोन अमृत भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार आहेकत. महाराष्ट्रातून मुंबई आणि जालना वंदे भारत ट्रेन सुरु होत आहे. राज्यातून सुरु होणारी ही सहावी वंदे भारत ट्रेन आहे. मुंबई जालना ट्रेन एक जानेवारीपासून तर दोन जानेवारीपासून जालना मुंबई ट्रेन सुरु होणार आहे.

कसे असणार वंदे भारतचे शेड्यूल

महाराष्ट्रात पहिली वंदे भारत एक्स्प्रेस मुंबई ते गांधीनगर सुरु झाली होती. त्यानंतर मुंबई ते सोलापूर, मुंबई ते साईनगर शिर्डी, मुंबई ते गोवा आणि नागपूर ते बिलासपूर या पाच मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस धावत आहेत. आता ३० डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई ते जालना या वंदे भारत रेल्वेला हिरवा झेंडा दाखवणार आहे. मुंबई ते जालना वंदे भारत रेल्वे बुधवार वगळता सहा दिवस धावणार आहे. यामुळे मराठवाड्यातून मुंबईला येण्यासाठी कमी कालावधी लागणार आहे. ट्रायल रनमध्ये शंभर किलोमीटर वेगाने ही रेल्वे धावली होती.

कोणत्या स्थानकावर थांबणार

वंदे भारत ट्रेन मुंबईवरुन छत्रपती शिवाजी महाराज ट्रमिनरवरुन सुटणार आहे. त्यानंतर दादार, ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, छत्रपती संभाजीनगर आणि जालना स्टेशनवर थांबणार आहे. नाशिक, मनमाडला ही दुसरी वंदे भारत ट्रेन मिळाली आहे. यापूर्वी धावणारी मुंबई-शिर्डी ट्रेन या मार्गावरुन जात आहे.

वंदे भारत ट्रेनच्या वेळा काय

वंदे भारत ट्रेन मुंबईवरुन दुपारी 1:10 वाजता सुटणार आहे. ती जालन्याला रात्री 8:30 वाजता पोहचणार आहे. तसेच जालन्यावरुन ही ट्रेन सकाळी 5:05 वाजता सुटणार आहे. मुंबईला ही ट्रेन सकाळी 11:55 वाजता पोहचणार आहे. या ट्रेनमध्ये अद्यावत सुविधा देण्यात आली आहे. ट्रेनमध्ये ऑनबोर्ड वाय-फाय इन्फोटेनमेंट, जीपीएस-आधारित प्रवासी माहिती प्रणाली, प्लश इंटीरियर्स, टच-फ्री सुविधांसह बायो-व्हॅक्यूम टॉयलेट, डिफ्यूज्ड एलईडी लाइटिंग, प्रत्येक सीटच्या खाली चार्जिंग पॉइंट्स, वैयक्तिक टच-आधारित रीडिंग लाइट्स दिले आहेत. ट्रेनमधील अतिनील आहेत. वेंटिलेशन आणि वातानुकूलित यंत्रणा उत्तम असेल. इंटेलिजेंट एअर कंडिशनिंग सिस्टीम हवामान परिस्थिती/व्यवसायानुसार कूलिंग समायोजित करते.

काय आहे तिकीट दर

  • जालना-मुंबई ₹1120
  • जालना मुंबई एक्झीकेटीव्ह चेअर कार ₹2125
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.