AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पंतप्रधानांच्या दौऱ्यावरून संजय राऊत यांचा टोला, म्हणाले, पंतप्रधान आपलेच, येतजात…

एक नेहरु-गांधी परिवारातील तरुण... ज्या कुटुंबाने देशासाठी सर्वोच्च बलिदान दिलं. त्या कुटुंबातील मुलगा देशातील द्वेष दूर करण्यासाठी हजारो किलोमीटर चालत जात आहे.

पंतप्रधानांच्या दौऱ्यावरून संजय राऊत यांचा टोला, म्हणाले, पंतप्रधान आपलेच, येतजात...
संजय राऊत Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jan 12, 2023 | 10:59 AM
Share

निखिल चव्हाण, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत येणार आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोसला जाणार नसल्याचं वृत्त आहे. यावरून आता राजकारण सुरू झालं आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी या मुद्द्यावरून शिंदे-फडणवीस यांना चांगलेच चिमटे काढले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपलेच आहेत. ते कधीही येतील. पण गुंतवणूक येणार नाही. पण शिंदे सरकारला गुंतवणुकीचं काहीच पडलं नाही, अशी टीका करतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबई दौरा निव्वळ राजकीय असून मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा दौरा आयोजित करण्यात आला आहे, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला आहे.

गुंतवणुकीबाबत या सरकारला काही घेणंदेणं नाही. पंतप्रधान येत आहे, त्यांचं स्वागत आहे. राज्याचे मंत्री दावोसला जात आहे. गुजरातचे नेतेही जात आहेत. त्यामुळे पंतप्रधानांचा मुंबईतील नियोजित कार्यक्रम रद्द केला पाहिजे. ते पालिका निवडणुकीसाठी येत आहे. पंतप्रधान चांगले आहेत. त्यांना विनंती करा. ते पुढची तारीख देतील. पण दावोसची तारीख मिळणार नाही, असं संजय राऊत म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना केवळ राजकारणाचं पडलं आहे. त्यांना गुंतवणुकीचं काही पडलं नाही. पंतप्रधान येत जात राहतील. ते आपलेच आहेत. पण गुंतवणुकीचं काय? असा सवाल करतानाच महापालिका निवडणुकीसाठी हा दौरा आहे. सर्व काही आम्ही करत आहोत, केंद्र सरकार करत आहे हे दाखवण्यासाठीच हा आटापिटा सुरू आहे, असा हल्ला राऊत यांनी चढवला.

पंतप्रधान एका दिवसासाठी, काही तासासाठी येत आहेत. पंतप्रधानांची तारीख बदलता आली असती. पण यांना गुंतवणुकीपेक्षा पंतप्रधानांचे राजकीय कार्यक्रम महत्त्वाचे आहेत. महापालिका निवडणूक, शिवसेनेला त्रास देणं महत्त्वाचं आहे. त्यांना गुंतवणुकीचं काही पडलं नाही, असंही ते म्हणाले.

राऊत यांनी यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेवरही भाष्य केलं. मी जम्मूकाश्मीरच्या भूमीवर जाणार आहे, राहुल गांधींसोबत राहणार आहे. भारत जोडो यात्रेत जाणार आहे. 20 तारखेला जम्मू पासून या यात्रेत सामील होईल. राहुल गांधी 30 तारखेला काश्मीरला पोहोचणार आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

एक नेहरु-गांधी परिवारातील तरुण… ज्या कुटुंबाने देशासाठी सर्वोच्च बलिदान दिलं. त्या कुटुंबातील मुलगा देशातील द्वेष दूर करण्यासाठी हजारो किलोमीटर चालत जात आहे. लोक त्यांचं स्वागत करत आहेत. तेव्हा पंतप्रधानांनी त्यांचं स्वागत करावं, असं आवाहनही त्यांनी केलं.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.