AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवसेनेतील ‘त्या’ गद्दारांना बाळासाहेबांचे विचार सांगण्याची गरज…उद्धव ठाकरे यांचा शिंदेसेनेवर हल्ला

राज्यातील महाराष्ट्रद्रोही सरकारकडून कारण नसताना हिंदीची सक्ती लादली जात आहे. त्यासाठी सर्व मराठी प्रेमी एकत्र आले आहेत. राज्यात इतर कोणतीही भाषा सक्तीने आम्ही लादून घेणार नाही, असा इशारा शिवसेना उबाठा नेते उद्धव ठाकरे यांनी दिला.

शिवसेनेतील 'त्या' गद्दारांना बाळासाहेबांचे विचार सांगण्याची गरज...उद्धव ठाकरे यांचा शिंदेसेनेवर हल्ला
| Updated on: Jun 26, 2025 | 1:35 PM
Share

शिवसेनेचा जन्म मराठी माणसावर होणाऱ्या अन्यायविरोधात लढण्यासाठी झाला. भूमीपुत्राच्या लढ्यासाठी झाला आहे. महाराष्ट्रात त्यांना हुकुमशाही लादायची आहे. एकाधिकारशाही आणायची आहे. त्यामुळे त्यांना महाराष्ट्रात शिवसेना संपवायची आहे. शिवसेनेतील गद्दार जे मिंधेपणाने त्यांच्यासोबत राहत आहेत. शिवसेनेच्या त्या गद्दरांना बाळासाहेबांचे विचार सांगण्याची गरज आहे. मी मुख्यमंत्री असताना मराठी भाषेसाठी अनेक निर्णय घेतले होते. त्याची अंमलबजावणी झाली नाही. अजित पवार आता गप्पा का?. मराठी भाषा भवनाची एक विट सुद्ध रचली गेली नाही. ती जागाही बिल्डरांना दिली की काय? असा हल्ला शिवसेना उबाठा पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारवर आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर केला.

महाराष्ट्रातील शालेय अभ्यासक्रमात हिंदी भाषेची सक्ती करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्याविरोधात आंदोलन करण्याचा निर्णय उद्धव ठाकरे यांनी जाहीर केला. दीपक पवार यांच्याकडून उभारण्यात येणाऱ्या या आंदोलनास त्यांनी पूर्ण पाठिंबा जाहीर केला.

हिंदी सक्ती मागे घेईपर्यंत आंदोलन सुरुच ठेवणार

पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, राज्यातील महाराष्ट्रद्रोही सरकारकडून कारण नसताना हिंदीची सक्ती लादली जात आहे. त्यासाठी सर्व मराठी प्रेमी एकत्र आले आहेत. राज्यात इतर कोणतीही भाषा सक्तीने आम्ही लादून घेणार नाही. आम्ही सक्ती चालू देणार नाही. हिंदी सक्ती जोपर्यंत मागे घेतली जात नाही, तोपर्यंत आंदोलन सुरु होणार आहे, असे उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले.

राज्यात सर्व सुरळीत असताना हिंदी सक्ती का?

राज्यात सर्व काही सुरळीत सुरु आहे. त्यात हा मीठाचा खडा टाकला गेला आहे. आमचा हिंदीला विरोध नाही. महाराष्ट्रात हिंदी चित्रपटसृष्टी जोपसली गेली. महाराष्ट्रात हिंदी चित्रपट तुफान चालतात. अनेक हिंदी कलाकार महाराष्ट्रात मोठे झाले. महाराष्ट्रात सर्वांना हिंदी येते. मग हिंदी सक्तीची गरज काय? असा प्रश्न उपस्थित करत उद्धव ठाकरे म्हणाले, हिंदी सक्तीमागे त्यांचा छुपा अजेंडा आहे. हिंदी सक्तीची याचा अर्थ कालांतराने एक निशाण, एक विधान म्हणजे मीच असा आहे. जे.पी.नड्डा यांनी त्यासंदर्भात मागे वक्तव्य केले होते. या माध्यमातून एकाधिकारशाहीकडे त्यांची वाटचाल दिसत आहे. मराठी भाषिकांवर आणीबाणी ते लादत आहेत, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.