AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हवा बहोत तेज चल रही है, टोपी उड जायेगी; संजय राऊत यांचा उद्योगमंत्र्यांना इशारा

बारसूमध्ये रिफायनरी प्रकल्प होऊ नये म्हणून स्थानिकांनी विरोध केला आहे. ठाकरे गटानेही बारसूतील स्थानिकांना साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. बारसूकरांचा प्रकल्पाला विरोध असेल तर आम्ही त्यांच्यासोबत आहोत, असं संजय राऊत म्हणाले.

हवा बहोत तेज चल रही है, टोपी उड जायेगी; संजय राऊत यांचा उद्योगमंत्र्यांना इशारा
sanjay raut Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 26, 2023 | 10:48 AM

मुंबई : नाणारमध्ये प्रकल्प होणार होता. त्याविरोधात आंदोलन झालं. त्यानंतर हा प्रकल्प बासनात गुंडाळला. त्यानंतर बारसूची जागा ठरवण्यात आली होती. ती ओसाड जमीन होती. उद्धव ठाकरे यांनी त्याबाबतचा निर्णय घेतला होता. पण आज जर त्या प्रकल्पालाही बारसूतील जनतेचा विरोध असेल तर आम्ही जनतेच्या सोबत आहोत. लोक या प्रकल्पाला विरोध करण्यासाठी छातीवर गोळ्या झेलण्यास तयार असतील तर पहिली गोळी शिवसेना छातीवर झेलेल, असं सांगतानाच हवा बहोत तेज चल रही है, टोपी उड जायेगी… आम्हाला शहाणपणा शिकवू नका; असा इशाराच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांना दिला.

संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधला. लोकांचा विरोध असेल तर शिवसेना त्याला पाठिंबा देणार नाही. मुख्यमंत्री म्हणून त्यांनी पर्यायी जागा सूचवली. तेव्हा हालचाली नव्हती. लोक आता पुढे आली असतील तर त्या पत्राला आमच्या दृष्टीने शून्य किंमत आहे. तो शासकीय कागद आहे. उद्दव ठकारे यांचंही ते म्हणणं आहे. कोणता तरी सरकारी कागद फडकवत उदय सामंत यांनी शहाणपणा करू नये. नाणारला जावं आणि लोकांशी बोलावं, असं संजय राऊत म्हणाले.

हे सुद्धा वाचा

ते प्रकल्प बाहेर का गेले?

बारसूबाबत शिवसेनेने अजिबात दुटप्पी भूमिका घेतलेली नाही. नाणारला पर्याय देण्यासंदर्भात एक भूमिका नक्की घेतली. प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जाऊ नये ही आमची भूमिका आहे. आम्ही उद्योगाचे शत्रू नाही. बाळासाहेबांनी रोजगार राहिला पाहिजे असं सांगितलं होतं. उद्योग आला तर रोजगार वाढेल ही भूमिका कायम आहे. पण एअर बस का बाहेर गेली? फॉस्कॉन वेदांत का बाहेर गेला? तो काय कोकणात होता का? वित्तीय केंद्र गुजरातला गेलं. ते काय कोकणात होतं का? त्यावर उद्योग मंत्र्यांनी तोंड उघडावं. हवा बहोत तेज चल रही है. टोपी उड जायेगी आपकी. ध्यान मे रखना, असा इशारा राऊत यांनी दिला.

पहिली गोळी

राज्यात शिवसेनेला सुपाऱ्या घेण्याची गरज नाही. शिवसेना फोडण्याची सुपारी कोण घेत आहे? सुपाऱ्या घेऊन कोण काम करत आहे? हिंमत असेल तर समोर या. आम्ही फडणवीस बाबत संयमाने विधाने केली आहेत. आमच्या अंगावर आला तर लक्षात घ्या. कागदावर तुम्ही शिवसेना ट्रान्सफर केली असेल. पण लोकं आमच्यासोबत आहे. आम्ही लढू. आम्ही कोकणच्या जनतेसोबत आहोत. बारसूत जर लोकांना हा प्रकल्प नको असेल ते मरायला तयार असतील तर शिवसेना त्यांना मरू देणार नाही. पहिली गोळी शिवसेनेच्या छातीवर असेल, असा इशाराही त्यांनी दिला.

जैसलमेरच्या भटोडा गावात जीवंत स्फोटकं सापडले, नागरिकांमध्ये भिती
जैसलमेरच्या भटोडा गावात जीवंत स्फोटकं सापडले, नागरिकांमध्ये भिती.
भारत - पाकिस्तानच्या डिजीएमओची बैठक, काय होणार चर्चा?
भारत - पाकिस्तानच्या डिजीएमओची बैठक, काय होणार चर्चा?.
शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! भारतात वेळेच्या आधीच पाऊस दाखल होणार
शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! भारतात वेळेच्या आधीच पाऊस दाखल होणार.
जम्मू काश्मीर, जैसलमेर, अमृतसरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर
जम्मू काश्मीर, जैसलमेर, अमृतसरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर.
अटारी बॉर्डरवर तणावपूर्ण शांतता; अमृतसरमध्ये रेड अलर्ट कायम
अटारी बॉर्डरवर तणावपूर्ण शांतता; अमृतसरमध्ये रेड अलर्ट कायम.
काश्मीरवर तोडगा निघणार? डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं मोठं विधान
काश्मीरवर तोडगा निघणार? डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं मोठं विधान.
पाकच्या पंतप्रधानांचं ऐकण्यास मुल्ला मुनिरचा नकार
पाकच्या पंतप्रधानांचं ऐकण्यास मुल्ला मुनिरचा नकार.
अमेरिकाके पापाने वॉर रुकवा दिया क्या?, युद्धबंदीवर राऊतांची विखारी टीक
अमेरिकाके पापाने वॉर रुकवा दिया क्या?, युद्धबंदीवर राऊतांची विखारी टीक.
पाकिस्तान बॅकफूटवर, 5 वाजेपासून युद्धविराम, दोन्ही देशांकडून सहमती अन
पाकिस्तान बॅकफूटवर, 5 वाजेपासून युद्धविराम, दोन्ही देशांकडून सहमती अन.
भारत-पाक तणावादरम्यान मुंबईकरांसाठी मोठी बातमी, आता 9 जूनपर्यंत....
भारत-पाक तणावादरम्यान मुंबईकरांसाठी मोठी बातमी, आता 9 जूनपर्यंत.....