AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sachin Ahir : मुंबईसाठी केंद्राच्या पाच योजना दाखवा, मुंबईवरून शिवसेनेवर टीका करणाऱ्या भाजपाला सचिन अहिर यांचं आव्हान

गेल्या दोन वर्षात केंद्राने किती निधी महाराष्ट्राला दिला, असा सवाल अहिर यांनी भाजपाला केला आहे. पुण्यात त्यांची सत्ता म्हणून स्मार्ट सिटी लागू केली. आता तिथे भकास झाले आहे, असे सचिन अहिर म्हणाले.

Sachin Ahir : मुंबईसाठी केंद्राच्या पाच योजना दाखवा, मुंबईवरून शिवसेनेवर टीका करणाऱ्या भाजपाला सचिन अहिर यांचं आव्हान
सचिन अहिरImage Credit source: Twitter
| Edited By: | Updated on: Aug 20, 2022 | 4:58 PM
Share

मुंबई : आमच्या कामांची चर्चा जगात झाली आहे. डायलॉगबाजी करून निवडणुका जिंकता आल्या असत्या तर अनेक डायलॉग आहेत, असा टोला शिवसेनेचे नेते सचिन अहिर (Sachin Ahir) यांनी भाजपाला लगावला आहे. शिवसेनेच्या उपनेत्यांची तसेच संपर्क प्रमुखांची आज बैठक झाली. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, की उपनेते प्रामाणिकपणे काम करत आहेत. अनेक विषयांवर चर्चा झाली, पक्षाचे प्रवक्ते यासंदर्भात माहिती देतील. काही उपनेत्यांना अधिकची जबाबदारी दिली आहे. लवकरच मुंबईतील गटप्रमुखांचा मेळावा घेण्याचे प्रयत्न सुरू झाल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले. भाजपाने मुंबई महापालिका निवडणुकीच्या (BMC election 2022) पार्श्वभूमीवर शिवसेनेला लक्ष्य केले. आज झालेल्या भाजपाच्या मेळाव्यातही आशिष शेलार, देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर (Shivsena) टीका केली होती. त्याचा सचिन अहिर यांनी समाचार घेतला.

‘आशिष शेलारांची लाइन रोज बदलत आहे’

आशिष शेलारांची लाइन रोज बदलत चालली आहे. आधी ते बांद्रा येथे उभे राहायचे. आता ते वरळीत आलेत. मुद्दे काय असणार, नसणार ही चर्चा गेल्या वर्षभरापासून आहे. जे काम केले ते आम्ही लोकांसमोर ठेवले आहे, असे सचिन अहिर म्हणाले.

‘गेल्या दोन वर्षात किती निधी दिला?’

गेल्या दोन वर्षात केंद्राने किती निधी महाराष्ट्राला दिला, असा सवाल अहिर यांनी भाजपाला केला आहे. पुण्यात त्यांची सत्ता म्हणून स्मार्ट सिटी लागू केली. आता तिथे भकास झाले आहे, असे ते म्हणाले. बुलेट ट्रेनने मुंबईचा विकास होणार आहे का? केंद्राच्या पाच योजना मुंबईसाठी दाखवा, असे आव्हानही त्यांनी यावेळी दिले.

‘जांबोरी मैदानाची दुरवस्था करणाऱ्यांविरोधात बीएमसीला निवेदन देणार’

कोट्यवधी रुपये खर्च करून जांबोरी मैदानाचे सुशोभिकरण केले. स्थानिक नागरिकांचे म्हणणे होते, की इथे कार्यक्रम नको. मात्र भाजपाने त्याठिकाणी कार्यक्रम केला. आता जांबोरी मैदानाची दुरवस्था ज्यांनी केली त्यांच्याकडून भरपाई करून घेतली पाहिजे यासाठी आम्ही पालिकेला निवेदन देणार आहोत, असे सचिन अहिर यांनी सांगितले.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.