AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Cow Hug Day : गोमांस खाण्यावरून लोकांच्या हत्या का घडवल्या?; दैनिक ‘सामना’तून भाजपला सवाल

गायीला मिठी मारल्याने अदानींसह सर्व महाघोटाळ्यांचे पाप धुवून निघणार आहे काय? गाय हा उपयुक्त पशू आहे. असं वीर सावरकर म्हणायचे. सावरकरांचे हे विचार भाजप आणि संघ परिवाला मान्य आहे काय?

Cow Hug Day : गोमांस खाण्यावरून लोकांच्या हत्या का घडवल्या?; दैनिक 'सामना'तून भाजपला सवाल
स्वप्नात गाय दिसण्याचा अर्थImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Feb 10, 2023 | 7:03 AM
Share

मुंबई: केंद्र सरकारने काऊ हग डे साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावरून दैनिक ‘सामना’तून जोरदार टीका करण्यात आली आहे. गाईला मिठी मारायला सांगता. मग उधळलेल्या बिग बूलच्या गुन्ह्यांच्या चौकशीचे काय? असा सवाल करतानाच गोमांस खाण्यावरून लोकांच्या हत्या का घडवल्या? त्याचं उत्तर देशवासियांना दिलं पाहिजे, असा सवाल सामनातून करण्यात आला आहे. दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून हा सवाल करण्यात आला आहे.

अदानीविरोधात संसदेत घोषणा सुरू असतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अदानीच्या घोटाळ्यावर लोकसभा आणि राज्यसभेत एक शब्दही उच्चारला नाही. पण अदानी घोटाळ्यावर उतारा म्हणून 14 फेब्रुवारी रोजी गाय अलिंगन दिन साजरा करण्याचे फर्मान सोडलं आहे.

गाय ही भारताच्या संस्कृती आणि अर्थव्यवस्थेचा कणा आहे. गाय कामधेनू आहे. तिला मिठी मारल्याने उन्नती मारा, असे आदेश केंद्राने दिल्याचं दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून म्हटलं आहे.

मिठी सैल करायला तयारच नाही

अदानी घोटाळ्यावर पंतप्रधानांकडून स्पष्टीकरण हवे होते. पण मोदी सरकारने पुन्हा एकदा धर्माच्या गुंगीचे औषध देऊन गप्प केले आहे. मोदी संसदेत अदानीवर बोलले नाही. पण त्यांचे सरकार गायीवर बोलले. अदानी शेअर बाजारातील बिग बुल आहेत. मोदी त्या बिग बुलला मिठी मारून बसले आहेत. ते मिठी जराही सैल करायला तयार नाहीत, असा टोला अग्रलेखातून लगावण्यात आला आहे.

देशाला उत्तर द्या

संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांनी गोमांस खाणाऱ्यांनाही संघाचे दरवाजे उघडे असल्याचं म्हटलं आहे. गोमांस खाऱ्यांना संघाचे दरवाजे उघडे असतील तर मग गोमांस खाण्यावरून हत्या का घडवल्या? याचे उत्तर देशाला मिळायला हवे, असंही म्हटलं आहे.

गायीलाही मान्य असावं ना

गायीला मिठी मारल्याने अदानींसह सर्व महाघोटाळ्यांचे पाप धुवून निघणार आहे काय? गाय हा उपयुक्त पशू आहे. असं वीर सावरकर म्हणायचे. सावरकरांचे हे विचार भाजप आणि संघ परिवाला मान्य आहे काय? गायीला मिठी मारल्याने भावनिक उन्नती होते, असं मानलं तर हा प्रकार गायीलाही मान्य व्हायला हवा ना? असे टोलेही अग्रलेखातून लगावण्यात आले आहेत.

चौकशी करणार आहात काय?

व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी चारा-पाण्याशिवाय हंबरणाऱ्या गाईला मिठी मारल्याने उधळलेल्या बिग बुलच्या गुन्ह्यांची चौकशी मोदी सरकार करणार आहे काय? असा सवालही यावेळी करण्यात आला आहे. त्यामुळे आता भाजप त्यावर काय उत्तर देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.