AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘त्या’ वादात आता संजय राऊत यांची उडी; उज्ज्वल निकम यांना दिलं मोठं आव्हान

उज्जवल निकम यांच्या नियुक्तीला हायकोर्टात आव्हान देण्यात आलं आहे. राजकीय पक्षाचा व्यक्ती सरकारी वकील कसा राहू शकतो? तो न्यायाची भूमिका कशी घेऊ शकतो? असा सवाल याचिकाकर्त्यांनी केला आहे. त्यावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली असून निकम यांनी माफी मागावी, अशी मागणी केली आहे.

'त्या' वादात आता संजय राऊत यांची उडी; उज्ज्वल निकम यांना दिलं मोठं आव्हान
sanjay rautImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 25, 2024 | 1:10 PM
Share

प्रसिद्ध वकील उज्ज्वल निकम यांना सरकारी वकील म्हणून राज्य सरकारने नियुक्त केलं आहे. निकम यांची नियुक्ती रद्द करण्यासाठी विजय पालांडे यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. निकम हे एका पक्षाचे सदस्य आहेत. ते सरकारी वकील म्हणून काम कसे करू शकतात? असा सवाल या याचिकेतून करण्यात आला आहे. आता या प्रकरणात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उडी घेतली आहे. निकम यांनी निवडणूक लढली आहे. त्यांनी स्वत:वर राजकीय पक्षाचा शिक्का मारला आहे. त्यामुळे त्यांनी माफी मागितली पाहिजे, अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे.

संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना ही मागणी केली आहे. उज्ज्वल निकम हे मोठे वकील आहेत. त्यांनी भाजपकडून निवडणूक लढवली आहे. त्यांनी स्वत:वर राजकीय शिक्का मारला आहे. त्यामुळे त्यंना या प्रश्नांना तोंड द्यावा लागेल. किंवा मला जबरदस्तीने निवडणूक लढण्यास भाग पाडलं हे त्यांना सांगावं लागेल. कसाबला फाशी देण्यात माझा हात असला तरी मला लोकसभा निवडणुकीत फासावर लटकवण्याचा प्रयत्न भाजपने केला हे त्यांना समोर येऊन सांगावं लागेल, असं आव्हान देतानाच नाही तर त्यांना त्यांच्यावर लागलेला भाजप किंवा संघाचा शिक्का पुसता येणं अशक्य आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

माफी मागा

कालपर्यंत तुम्ही भाजपच्या तिकीटावर लढत होता. भाजपचा शिक्का घेऊन फिरत होता. त्यामुळे आता मला माफ करा, असं निकम यांनी म्हटलं पाहिजे, असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

एकत्र निर्णय घेऊ

लोकसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरही त्यांनी भाष्य केलं. लोकसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून इंडिया आघाडीची चर्चा सुरू आहे. मी दिल्लीत जात आहे. काँग्रेच्या वरिष्ठांशी चर्चा होत आहे. लोकशाहीचा रखवालदार लोकसभा अध्यक्ष असतो. त्या पदावर समान न्याय देणारी व्यक्ती बसली पाहिजे. गेल्या दहा वर्षात त्या पदावर ज्या पद्धतीचे लोक बसले आहेत, ते बरोबर नव्हते. विरोधकांशी चर्चा करून नाव ठरंल पाहिजे. कायद्याने उपाध्यक्षपद आम्हाला दिलं पाहिजे. निवडणूक लढायची असेल तर आम्ही सर्व बसून चर्चा करू, असं राऊत म्हणाले.

गृहमंत्री जबाबदार

पुण्यातील ड्रग्स पार्टींवरूनही त्यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. पुणे आणि नाशिक ही दोन शहरं ड्रग्सच्या विळख्यात गेली आहेत. नाशिक आणि पुण्यात हजारो कोटीचे ड्रग्स आहेत. गुजरातमधून हे ड्रग्स येत आहेत. तसं सिद्ध झालंय. गुजरात हे ड्रग्सचं केंद्र आहे. काही पकडलं जातंय, काही वळवलं जातंय. यांना राजकीय संरक्षण कुणाचं आहे? याचा तपास व्हावा. कोणत्या राजकीय पक्षासाठी हा पैसा वापरला गेला? पालकमंत्री कोण होते? पोलीस आयुक्त कोण होतं? हा तपासाचा भाग आहे. पुणे दुर्देवाने गुन्हेगारी आणि अंमलीपदार्थाचे मुख्य केंद्र होत आहे. त्याला गृहमंत्री फडणवीस आणि पालकमंत्री जबाबदार आहेत. पाच वर्षात जे पोलीस आयुक्त आणि पालकमंत्री लाभले ते जबाबदार आहेत, असा आरोप त्यांनी केला.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.