AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘वाढवलेले भाव निवडणुकीच्या तोंडावर कमी करायचे, याला काय अर्थ?’, ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा

ममता बॅनर्जी इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी आज मुंबईत दाखल झाल्या आहेत. ममता मुंबईत आल्यानंतर सर्वात आधी ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या घरी गेल्या. त्यांनी अमिताभ बच्चन यांना राखी बांधली.

'वाढवलेले भाव निवडणुकीच्या तोंडावर कमी करायचे, याला काय अर्थ?', ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
| Updated on: Aug 30, 2023 | 7:00 PM
Share

मुंबई | 30 ऑगस्ट 2023 : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मुंबईत दाखल झाल्या आहेत. मुंबईत 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबरला इंडिया आघाडीची बैठक पार पडणार आहे. या बैठकीसाठी त्या मुंबईत आल्या आहेत. पण ममता बॅनर्जी या बैठकीला हजर राहण्याआधी मुंबईत आल्यानंतर सर्वात आधी अभिनेता अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ निवासस्थानी गेल्या. त्यांनी बच्चन कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी त्यांनी अमिताभ बच्चन यांना राखी बांधली. तसेच त्यांच्यात काही वेळ गप्पा देखील झाल्या. बच्चन कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली.

“बच्चन कुटुंबिय हे खूप चांगले आहेत. अमिताभ बच्चन यांना भारतरत्न पुरस्काराने गौरवायला हवं. केंद्र सरकार अमिताभ बच्चन यांना भारतरत्न पुरस्कार देणार नाहीत तर आम्ही जनतेकडून हा पुरस्कार देतो. अमिताभ बच्चन यांचा आम्ही आदर करतो. त्यांच्या कुटुंबाचा खूप योगदान आहे. आम्ही त्यांना जनतेकडून भारतरत्न पुरस्कार देऊ”, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या.

“आमच्या इथे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव होतो. या महोत्सवला शाहरुख खान, सलमान खान, महेश भट, अनिल कपूर येतात. आम्ही अमिताभ बच्चन यांनाही या कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं”, असं ममता बॅनर्जी यांनी सांगितलं. तसेच “मी आज अमिताभ बच्चन यांना राखी बांधली. आम्ही बहिणीलादेखील राखी बांधतो. कारण स्त्री-पुरुष समानता आहे. स्त्री आणि पुरुषात कोणताही भेट नाही. सर्वांना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो”, अशी प्रतिक्रिया ममता बॅनर्जी यांनी दिली.

ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा

“इंडिया आघाडीत आम्ही सर्व समान आहोत. आम्ही देशाला वाचवण्यासाठी एकत्र आलो आहोत. आघाडीचं नेतृत्व कोण करेल हा दुसरा मुद्दा आहे. आधी देशाला वाचवणं जास्त महत्त्वाचं आहे”, अशी प्रतिक्रिया ममता बॅनर्जी यांनी दिली. यावेळी त्यांनी केंद्र सरकारने गॅस सिलेंडरच्या दराबाबत घेतलेल्या निर्णयावर टीका केली.

“गॅस सिलेंडरचे भाव किती वाढवले आहेत. आधी खूप वाढवायचे, नंतर निवडणुकीच्या वेळेला काहीसे कमी करायचे. गॅस सिलेंडरचा दर 800 किंवा 900 रुपये असला तरी कसं चालेल? आपल्या देशात अनेक गरीब कुटुंब आहेत”, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या.

अमिताभ बच्चन यांना बंगालचे जावई म्हणूनही ओळखले जाते. मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्री जया बच्चन यांनी फार पूर्वीच ममता बॅनर्जी यांना मुंबईत येण्याचं निमंत्रण दिलं होतं. ममता बॅनर्जी यांना आज मुंबईत येण्याची संधी मिळताच त्यांनी विमानतळावरून थेट अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ येथील घरी भेट दिली.

ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार.
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं..
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं...
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?.
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!.
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ.
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम.
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन.
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.