Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी ! तर आमचा प्लॅन तयार, नाना पटोले यांचं सूचक विधान; आघाडीत घडतंय बिघडतंय?

रत्नागिरीत सत्तेतील बगलबच्च्यांनी जमिनी घेतल्या आहेत. माझ्याकडे अहवाल आहे. मी बारसूला जाऊन आलो होतो. दोन्हीबाजूची मते ऐकली होती. पर्यावरणाचा ऱ्हास होतोय असं स्थानिकांचं म्हणणं आहे, असं पटोले म्हणाले.

मोठी बातमी ! तर आमचा प्लॅन तयार, नाना पटोले यांचं सूचक विधान; आघाडीत घडतंय बिघडतंय?
nana patoleImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 26, 2023 | 9:52 AM

नागपूर : येत्या 2024मध्ये आघाडी म्हणून लढू की नाही हे आताच कसं सांगू? असा सवाल राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी म्हटलं होतं. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. शरद पवार यांचा हा इशारा कुणाला? असा सवालही केला जात होता. पवार यांच्या विधानावरून आघाडीत बिघाडी असल्याची चर्चाही रंगली होती. पण खुद्द शरद पवार यांनीच आपल्या विधानाचा विपर्यास केल्याचं म्हटलं आणि चर्चांना पूर्णविराम मिळाला. मात्र, ही चर्चा पुरती थांबलेली नाही. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महाविकासा आघाडीत सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा आमचा प्रयत्न आहे. महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढण्याचा आमचा मानस आहे. पण आघाडी नाही झाली तर आमचे सर्व प्लॅन तयार आहेत, असं नाना पटोले म्हणाले. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले टीव्ही9 मराठीशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी काँग्रेसचा दुसरा प्लॅन तयार असल्याचं सांगून महाविकास आघाडीला सूचक इशारा दिला आहे. त्यामुळे पटोले यांच्या या विधानाचे अनेक अर्थ काढले जात आहेत. अजित पवार यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर्स लागले आहेत. त्यावरही नाना पटोले यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. मुख्यमंत्री जनता ठरवते. आम्ही त्यावर भाष्य करणं योग्य नाही. जनतेचे प्रश्न महत्त्वाचे आहेत. आज निवडणुका नाहीत, त्यामुळे मुख्यमंत्रीदावर चर्चा करण्याचं कारण नाही. जेव्हा निवडणुका येतील तेव्हा चर्चा होईल. ज्या पक्षाचे आमदार सर्वाधिक निवडून येतील त्यांचाच मुख्यमंत्री होईल, असं नाना पटोले म्हणाले.

हे सुद्धा वाचा

जनतेची चूक होती

महाराष्ट्रात चुकून लोकांनी भाजपला 105 आमदार दिले. महाराष्ट्रात कधी नव्हे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. भाजपचे आमदार निवडून देणं जनतेची चूक होती. संख्या बळाच्या आधारावर प्यादे चालवण्याचं काम भाजप करत आहे. मात्र हे अधिक काळ चालणार नाही, असं पटोले यांनी सांगितलं.

सरकार असंवैधानिक

राज्यातील सरकार असंवैधानिक आहे. गेल्या वर्षभरात राज्यात गंमतजंमत सुरू आहे. हे सगळं राज्याला लाजवणारं आहे. सीरियस सरकार नाही. जनतेची तिजोरी लुटणारं सरकार आहे. खारघरचं प्रकरण भयानक होतं. उन्हात तळफडत लोकांना मारलं. महाराष्ट्राच्या इतिहासातील काळीमा फासणारी घटना आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी खारघर प्रकरणावर दिली.

राहुल गांधी यांच्या सभा

कर्नाटक निवडणुकीनंतर राज्यात राहुल गांधी यांच्या सात सभा होणार आहेत. मुंबईत राहुल गांधी यांची सभा होणार आहे. प्रियंका आणि राहुल गांधी यांच्या महाराष्ट्रात सभा होतील, असं नाना पटोले यांनी स्पष्ट केलं.

ज्यादा उमेदवार निवडून येणार

कर्नाटकातील निवडणुकीवरही त्यांनी भाष्य केलं. मागच्या काळात निवडणुका झाल्या, त्यातही जनतेने काँग्रेसलाच सत्ता दिली होती. पण मोदी-शाहांनी जनतेचा कौल तोडून सरकार स्थापन केलं होतं. कर्नाटकातील जनतेच्या मनात भाजपच्या विरोधात राग आहे. भाजपच्या उमेदवारांना गावातून हाकलून लावले जात आहे. तानाशाहाच्या विरोधातील हा उद्रेक आहे. काँग्रेसच हा देशातील जनतेला पर्याय आहे. देश उभा करण्याचं काम काँग्रेसने केलं. देशाचं संविधान सांभाळण्याचं काम केलं आहे. पोलच्या आकडेवारीपेक्षा जास्त उमेदवार निवडून येतील, असा दावा त्यांनी केला.

बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप
बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप.
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य.
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत.
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य.
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्...
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्....
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप.
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज.
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार.
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी.