AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अख्ख्या महाराष्ट्रात अशी रंगपंचमी नसेल; गाढवावरुन काढली जाते जावयाची मिरवणूक; ‘त्या’ पाठीमागे हे आहे कारण

रंगपंचमीच्या दिवशी गाढवावरुन जावयाची मिरवणूक काढण्याची परंपरा सिन्नर तालुक्यातील वडांगळी या गावात अनेक वर्षापासून चालत आली आहे. यावेळी वडांगळी गावाचे जे जावई असतात त्यांची गाढवावर बसवून सुपाचे बाशिंग, कांदा लसणाच्या मंडोळ्या, गळ्यात चपलांचा हार याप्रकारे सजवून जावयाची गाढवावर बसवून सगळ्या गावातून मिरवणून काढली जाते.

अख्ख्या महाराष्ट्रात अशी रंगपंचमी नसेल; गाढवावरुन काढली जाते जावयाची मिरवणूक; 'त्या' पाठीमागे हे आहे कारण
Nashik Wadganli SinnarImage Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Mar 22, 2022 | 10:48 PM
Share

नाशिकः आपल्या देशात अनेक पद्धतीने सण समारंभ साजरे केले जातात. अनेक रूढी परंपरा इतिहासही सण समारंभामध्ये सांगितला जातो. तसेच वेगवेगळ्या गोष्टींसाठीही आपले सण समारंभ विशेष ठरतात कारण प्रदेशानुसार आणि गावानुसार विविध पद्धतीनेही सण साजरे केले जातात. अशीच एक पद्धत नाशिक जिल्ह्यातील (Nashik) सिन्नर तालुक्यातही आहे. वडांगळी (Wadngali) गावात आगळीवेगळी असणारी ही पद्धत अनोखी ठरते ती रंगपंचमीच्या दिवशी गाढवावरुन जावयाची मिरवणूक काढली जाते म्हणून. अख्या महाराष्ट्रात ही रंगपंचमी (Rangpanchmi) रंगतदार होते ती जावई आणि गाढवावरुन निघणाऱ्या धिंडीमुळे.

रंगपंचमीच्या दिवशी गाढवावरुन जावयाची मिरवणूक काढण्याची परंपरा सिन्नर तालुक्यातील वडांगळी या गावात अनेक वर्षापासून चालत आली आहे. यावेळी वडांगळी गावाचे जे जावई असतात त्यांची गाढवावर बसवून सुपाचे बाशिंग, कांदा लसणाच्या मंडोळ्या, गळ्यात चपलांचा हार याप्रकारे सजवून जावयाची गाढवावर बसवून सगळ्या गावातून मिरवणून काढली जाते.

दर रंगपंचमीची ही परंपरा

गाढवावरुन मिरवणूक काढली जाते त्यापाठीमागे एक लोकपरंपरा आणि लोककथाही आहे. या पद्धतीने जर जावयाची मिरवणूक गाढवावरुन काढली तर पाऊस चांगल्या प्रकारे पडतो. त्यामुळेच या गावात कित्येक वर्षे दर रंगपंचमीला जावयाची गाढवावरुन मिरवणूक काढण्याची परंपरा जपण्यात आली आहे.

गाढवावर बसवूनच मिरवणूक

वडांगळी गावाच्या जावयाची फक्त गाढवावर बसवूनच मिरवणूक काढली जाते असे नाही तर त्या मिरवणुकीनंतर असतो खरा मानाचा कार्यक्रम. गाढवावर बसणं ही सन्मानाची आणि गौरवाची गोष्ट मानली जात नसली तरी वडांगळी गावात मात्र गाढवावर बसून जावयाची मिरवणूक काढली तरी त्यानंतर त्याचा मानपानासह त्याचा मान राखला जातो. गाढवावरुन मिरवणूक काढून झाली की, जावायला अंघोळ घातली जाते, त्याला नवीन कपडे देऊन त्याचा मानसन्मानही ठेवला जातो, आणि चांगला पाऊस पडवा म्हणून निसर्गाकडे मागणीही केली जाते.

संबंधित बातमी

‘आगे आगे देखो होता है क्या’, नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंना थेट इशारा; चोराच्या उलट्या बोंबा सुरु असल्याचाही आरोप

School : दप्तराचं ओझं होणार आणखी कमी, सर्व धडे एकाच पुस्तकात, काय आहे शिक्षण विभागाचा नवा निर्णय?

ED Raid Shridhar Patankar : मुख्यमंत्र्यांच्या मेहुण्यावर ईडीची कारवाई! महाविकास आघाडी आणि भाजप नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.