AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Manmad | मनमाडला झालेल्या मुसळधार पावसाने 3 दिवसांपासून वीज पुरवठा खंडीत, नागरिकांचे हाल!

मनमाडला झालेल्या मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका विज पुरवठ्यावर झाला असून नव्याने विकसित झालेल्या भागात तीन दिवसांपासून वीज पुरवठा गायब आहे. विजे अभावी बोअरवेलचे पंप सुरू होत नसल्याने पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. मुरलीधर नगर भागात ट्रान्सफार्मर मोठ्या प्रमाणावर लोड असल्याने ट्रान्सफार्मर सतत जळतो.

Manmad | मनमाडला झालेल्या मुसळधार पावसाने 3 दिवसांपासून वीज पुरवठा खंडीत, नागरिकांचे हाल!
Image Credit source: wallpaperflare.com
| Edited By: | Updated on: Jun 26, 2022 | 9:14 AM
Share

मनमाड : राज्यात गेल्या काही दिवसांपासून मान्सून (Monsoon) सक्रिय झाला आहे. अनेक ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावलीयं. मात्र, या पावसामुळे काही घरांमध्ये पाणी शिरले, पिकांचे देखील मोठे नुकसान (Damage) झाले आहे. मनमाडला झालेल्या मुसळधार पावसाचा फटका नागरिकांना बसला आहे. पावसामुळे तब्बल गेल्या तीन दिवसांपासून मनमाडमधील काही भागांमध्ये वीज पुरवठा खंडीत झाला आहे. यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. रात्र नागरिकांना अंधारात काढण्याची वेळ आलीयं. इतकेच नाही तर लाईट (Light) नसल्याने घरामध्ये पाणी देखील नाहीये.

मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका

मनमाडला झालेल्या मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका वीज पुरवठ्यावर झाला असून नव्याने विकसित झालेल्या भागात तीन दिवसांपासून वीज पुरवठा गायब आहे. विजे अभावी बोअरवेलचे पंप सुरू होत नसल्याने नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. मुरलीधर नगर भागात ट्रान्सफार्मर मोठ्या प्रमाणावर लोड असल्याने ट्रान्सफार्मर सतत जळतो. त्यामुळे माधव नगर ,गणेश नगर शिक्षक कॉलनी, अष्टविनायक नगर,पांडुरंग नगर या भागातील नागरिकांना अंधारात राहावे लागत आहे.

गेल्या तीन दिवसांपासून वीज पुरवठा खंडित

मनमाड येथे गेल्या तीन दिवसांपासून वीज पुरवठा खंडीत झाल्यामुळे नागरिक हवालदिल झाले आहेत. नुकताच मुलांच्या शाळा सुरू झाल्या आहेत, मुले दिवसभर शाळेत असतात. परंतू घरी अभ्यास करण्यासाठी रात्री लाईटच नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे देखील मोठे नुकसान होते आहे. वीज पुरवठा कधी सुरळीत होईल, याबाबत वीज वितरणच्या अधिकाऱ्यांकडून काहीच सांगितले जात नाहीये. वीज कंपनीने वीज पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी आता नागरिक करत आहेत.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.