AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

2014लाच शिवसेना संपवण्याचा डाव होता; उद्धव ठाकरे यांचा मोठा दावा

नाशिकच्या अनंत कान्हेरे मैदानातून उद्धव ठाकरे यांची तोफ पुन्हा एकदा धडाडली. उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. यावेळी त्यांनी भाजपवर युती तोडण्याचा आणि शिवसेना फोडण्याचा आरोप केला. शिवसेना फोडण्याचं कारस्थान फार पूर्वीपासून सुरू होतं. एका जबाबदार नेत्यांनेच आपल्याला त्याची माहिती दिली होती, असा दावा उद्धव ठाकरे यांनी करून खळबळ उडवून दिली आहे.

2014लाच शिवसेना संपवण्याचा डाव होता; उद्धव ठाकरे यांचा मोठा दावा
Uddhav ThackerayImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jan 23, 2024 | 9:05 PM
Share

नाशिक | 23 जानेवारी 2024 : दोन वर्षापूर्वी शिवसेना फुटली. त्यामुळे एकच खबळ उडाली. 2022 मध्ये शिवसेना फुटली असली तरी 2014मध्येच शिवसेना फोडण्याचा भाजपचा डाव होता. उद्धव ठाकरे यांच्यात कुवत नसल्याचं भाजपच्या नेत्यांना वाटत होतं. त्यामुळेच त्यांनी शिवसेना फोडण्याचा घाट घातला होता. याच कारणास्तव शिवसेना आणि भाजपची युतीही तुटली होती, असा गौप्यस्फोट उद्धव ठाकरे यांनी केला आहे. नाशिकमधील विराट जनसभेला संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी हा दावा केला आहे.

मी शिवसेनाप्रमुखांचे विचार सोडले असं म्हणत असतील तर 2014 साली शिवसेनेशी युती का तोडली होती? एकनाथ खडसे नाशिमध्येच सांगितलं आहे, 2014च्या मेपर्यंत आ गले लग जा सुरू होतं. मला दिल्लीत बोलावलं होतं, राष्ट्रपतींना पाठिंबा देण्याच्या पत्रावर सही करायला. तोपर्यंत शिवसेना हिंदुत्ववादी होती. नंतर जून ते ऑक्टोबरमध्ये असं काय घडलं की तुम्ही शिवसेनेची युती तोडली, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

पण बाळासाहेब आजही सर्वांच्या मनात

आजही ती व्यक्ती जिवंत आहे. भाजपमधील ती जबाबदार व्यक्ती आहे. 2014मध्ये भाजपने युती तोडली. शिवसेनेने कुणाच्याही मदतीशिवाय 63 आमदार निवडून आणले होते. तेव्हा हेच दाढीवाले बुवा विरोधी पक्षनेते होते. तेव्हा ती व्यक्ती आली आणि म्हणाली, उद्धव मला तुझं अभिनंदन करायचं आहे. म्हटलं का? तर म्हणाले, दिल्लीत अशी चर्चा होती. आता बाळासाहेब राहिले नाही (बघा किती हरामी लोकं आहेत) त्यांना वाटतं बाळासाहेब गेले. पण आजही बाळासाहेब आपल्या मनात आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

असा काय गुन्हा केला होता?

आता बाळासाहेब राहिले नाही. उद्धव ठाकरे काही करू शकत नाहीत आणि शिवसैनिक उद्धव सोबत जाणार नाहीत. आता वेळ आलीय शिवसेनेला संपवायची. शिवसेनेचे पाच किंवा 10 सीट येतील, असा विचार दिल्लीत 2014मध्ये सुरू होता. पण तू कमाल केली. तू 63 जागा जिंकल्या. दिल्ली तुला आता घाबरतेय, असं हा नेता म्हणाला. 2014 साली शिवसेनेला खतम करणारी ही लोकं… काय आम्ही तुमचा गुन्हा केला होता? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.