AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

72 तास रेस्क्यू ऑपरेशन… 27 जणांचा मृत्यू… 78 लोक अजूनही गायब; इर्शाळवाडीतील माता बहिणींचे अश्रू थांबता थांबेना

इर्शाळवाडीत एकूण 43 घरे होते. या गावातील लोकसंख्या 229 होती. त्यातील 27 जणांचे मृतदेह सापडले आहेत. अजून 78 बेपत्ता आहेत. हे लोक ढिगाऱ्याखाली दबलेले असण्याची शक्यता आहे.

72 तास रेस्क्यू ऑपरेशन... 27 जणांचा मृत्यू... 78 लोक अजूनही गायब; इर्शाळवाडीतील माता बहिणींचे अश्रू थांबता थांबेना
Irshalwadi landslideImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 23, 2023 | 7:10 AM
Share

खालापूर | 23 जुलै 2023 : इर्शाळवाडीत दरड कोसळल्यानंतर गेल्या तीन दिवसापासून रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. गेल्या 72 तासांपासून एनडीआरएफची टीम ढिगारे उपसण्याचं काम करत आहेत. या दुर्घटनेतील मृतांची संख्या 27 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 78 लोक गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता आहेत. त्यामुळे येथील नागरिक भयभीत झाले आहेत. आपल्या घरातील लोक सापडत नसल्याने येथील ग्रामस्थांचे रडून रडून हाल झाले आहेत. प्रत्येकजण आपल्या कुटुंबीयांचा शोध घेताना दिसत आहे. पाऊस, चिखल आणि अपुऱ्या सुविधांमुळे रेस्क्यू ऑपरेशन करण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे अजून आठ दिवस हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू राहणार असल्याचं सांगितलं जात आहे.

इर्शाळगड दुर्घटनेतील 119 जणांना आतापर्यंत वाचवण्यात आलं आहे. अजूनही 78 लोक अजूनही बेपत्ता आहेत. या सर्वच्या सर्व 78 जणांचा आजही शोध घेतला जाणार आहे. अजून आठ दिवस ही शोध मोहीम सुरू राहणार असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, हे सर्च ऑपरेशन किती दिवस सुरू ठेवायचं? सुरू ठेवायचं की नाही हे जिल्हा प्रशासन ठरवेल. त्यांचे आदेश येईपर्यंत आम्ही आमचं काम सुरूच ठेवू, असं एनडीआरएफने म्हटलं आहे. इर्शाळवाडीत गेल्या तीन दिवसांपासून एनडीआरएफच्या चार टीम तळ ठोकून आहेत. दरम्यान, ज्या लोकांचे मृतदेह सापडले आहेत, त्यांच्यावर सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.

बाहेरच्या लोकांना मज्जाव

इर्शाळवाडीत युद्धपातळीवर रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. पाऊस, चिखल, चिंचोळा रस्ता आणि वाहने नेता येत नसल्याने या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये अडथळे येत आहेत. त्यामुळे या परिसरात विनाकारण गर्दी होऊ नये, तसेच कोणतीही दुर्घटना घडू नये म्हणून बाहेरचे लोक, पर्यटक आणि ट्रॅकरला या परिसरात येण्यास बंदी घालण्यात आली आहे. फक्त प्रशासकीय यंत्रणांशी संबंधित लोकांनाच या ठिकाणी प्रवेश दिला जात आहे. या परिसरात कलम 144 लागू करण्यात आलं आहे.

229 लोकसंख्येचं गाव

इर्शाळवाडीत एकूण 43 घरे होते. या गावातील लोकसंख्या 229 होती. त्यातील 27 जणांचे मृतदेह सापडले आहेत. अजून 78 बेपत्ता आहेत. हे लोक ढिगाऱ्याखाली दबलेले असण्याची शक्यता आहे. ज्या लोकांचे मृतदेह सापडले आहेत, ते डोंगराच्या खाली आणता येत नाहीये. कारण मृतदेह खाली आणण्याची व्यवस्थाच नाहीये. वरच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. त्यामुळे कुटुंबीयांनाही आपल्या नातेवाईकांचं शेवटचं दर्शन घेता येत नाहीये.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.