AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MSRTC Strike: 22 एप्रिलपर्यंत कामावर न आल्यास एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई करणार; अनिल परब यांचा इशारा

MSRTC Strike: एसटी कामगारांना येत्या 22 एप्रिल पर्यंत कामावर रुजू होण्याचे आदेश दिले आहे. जे कामगार कोर्टाने दिलेल्या मुदतीत कामावर आले नाही तर त्यांच्यावर कारवाई करण्याचा तुम्हाला मार्ग मोकळा आहे, असं कोर्टाने आम्हाला सांगितलं आहे.

MSRTC Strike: 22 एप्रिलपर्यंत कामावर न आल्यास एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई करणार; अनिल परब यांचा इशारा
अनिल परब Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Apr 07, 2022 | 3:51 PM
Share

मुंबई: एसटी कामगारांना (msrtc) येत्या 22 एप्रिल पर्यंत कामावर रुजू होण्याचे आदेश दिले आहे. जे कामगार कोर्टाने (court) दिलेल्या मुदतीत कामावर आले नाही तर त्यांच्यावर कारवाई करण्याचा तुम्हाला मार्ग मोकळा आहे, असं कोर्टाने आम्हाला सांगितलं आहे. त्यामुळे कोर्टाच्या आदेशाप्रमाणे कामगार आले नाही तर आम्ही त्यांच्यावर कारवाई करू. कामगार आले नाही तर त्यांना नोकरीची गरज नाही, असं आम्ही समजू. कामगारांना निलंबित करणं, बडतर्फ करणं आणि नंतर त्यांची सेवा समाप्त करणं ही कारवाई आतापर्यंत केली आहे. तशीच कारवाई यानंतर केली जाईल, असा इशारा परिवहन मंत्री अनिल परब (anil parab) यांनी दिला. कामगारांनी कुणाच्याही नादाला लागू नये. चुकीची माहिती देणाऱ्यांच्या मागे जाऊन स्वत:चे नुकसान करू नये, असं सांगतानाच कामगारांनी कामावर परत यावे, असं आवाहन त्यांनी केलं.

कोर्टाच्या सुनावणीनंतर अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेऊन हा इशारा दिला. त्रिसदस्यी समितीने कर्मचाऱ्यांची विलिनीकरणाची मागणी अमान्य केली. या विषयावर कोर्टात दोन दिवसांपासून सुनावणी सुरू होती. समितीचा अहवाल सादर केला गेला. कोर्टातील आमचं पिटीशन मागे घेण्याची विनंती केली. काल कोर्टाने सर्व कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याचे निर्देश दिले. काल सांगितलं 15 एप्रिलपर्यंत कामावर या. जे कर्मचारी ज्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली होती त्यावर सरकारचं म्हणणं विचारलं होतं. यापूर्वी जनतेला वेठीस धरून कोणत्याही प्रकारचं आंदोलन करू नका. तुमच्या मागण्या मागा, जनतेला वेठीला धरू नका. महामंडळाचे नुकसान करू नका, सर्व कारवाया मागे घेऊ किमान सातवेळा सांगितलं. त्यानंतर काही कामगार आले काही आले नाही, असं परब म्हणाले.

नोकरी शाबूत राहणार

कोर्टाने विचारलं तुम्ही नोकरी जाईल असं काही करू नका. नोकरी शाबूत राहिली पाहिजे. त्यावर आम्ही आमचं म्हणणं मांडलं. कामगारांची नोकरी जावू नये अशीच आमची भूमिका. त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली आणि सात वेळा कामावर येण्याचं आवाहनही केलं. यावेळीही कारवाई करणार नाही अशी आम्ही कोर्टाला हमी दिली. त्यावर कोर्टाने 22 तारखेपर्यंत सर्व कर्मचाऱ्यांनी नोकरीला यावं असे निर्देश दिले, अशी माहिती अनिल परब यांनी दिली.

एसटी पूर्ववत सुरू करा

कोर्टाने ग्रॅच्युटी, पीएफ आणि इतर फंडाबाबत सुतोवाच केलं होतं. ही देणी आम्ही कामगारांना वेळोवेळी देतच आहोत. कोविड काळात परिस्थिती नाजूक होती. त्यामुळे थोडं मागे पुढे झालं. पण देणी नाकारली नव्हती. पीएफ आणि ग्रॅच्युटी सतत देत आहोत. एसटी कर्मचाऱ्यांचा पाच महिने संप होता. कर्मचाऱ्यांचं मोठं नुकसान. एसटीचंही प्रचंड नुकसान. त्यामुळे कामगारांनी कामावर रुजू व्हावं. एसटी पूर्ववत सुरू करा, असं आवाहन त्यांनी केलं.

संबंधित बातम्या:

MSRTC Strike: एसटी कर्मचाऱ्यांना पीएफ आणि निवृत्ती वेतन देण्याचे आदेश, कोर्टात काय घडलं?; अ‍ॅड. सदावर्ते टू द पॉइंट

ST Breaking : एसटी कर्मचाऱ्यांना रुजू होण्यासाठी नवी तारीख, 22 एप्रिलपर्यंत जॉइन व्हा, सरकारचीही हायकोर्टात ग्वाही

Asawari Joshi: “राजकारणात आले तरी राजकारण न करता काम करेन”; राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानंतर आसावरी जोशींचं विधान

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.