AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एप्रिल महिन्यात शाळा सुरु ठेवण्यास विरोध, प्रकरण कोर्टात जाणार, काय आहे नेमका दावा?

Maharashtra School Exam: शासनाच्या आदेशानुसार 2 एप्रिल ते 25 एप्रिलपर्यंत परीक्षा घ्यावी लागणार आहे. प्राथमिक शाळा 200 दिवस आणि उच्च प्राथमिक शाळा 220 दिवस घ्यायचा निर्णय झाला आहे. त्यानुसार शाळांचे दिवस पूर्ण झाले आहेत. मग 22 एप्रिलपर्यंत शाळा का सुरू करतात? असा प्रश्न महामंडळाने विचारला आहे.

एप्रिल महिन्यात शाळा सुरु ठेवण्यास विरोध, प्रकरण कोर्टात जाणार, काय आहे नेमका दावा?
प्रातिनिधिक छायाचित्र
| Updated on: Mar 28, 2025 | 2:54 PM
Share

Maharashtra School Exam: राज्यातील सर्व शाळांमध्ये एकाचवेळी वार्षिक परीक्षा व दुसरी संकलित मूल्यमापन चाचणी आयोजित करण्याची सूचना राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत (एससीईआरटी) करण्यात आली होती. त्यावरुन वाद निर्माण झाला आहे. या सूचनेनुसार राज्यातील शाळा एप्रिल महिन्यात सुरु राहणार आहे. परीक्षा 25 एप्रिलपर्यंत घेण्यात येणार आहे. परंतु या निर्णयास महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाने विरोध केला आहे. महामंडळाचे सरचिटणीस रवींद्र फडणवीस यांनी या प्रकरणी कोर्टात जाण्याचा दावा केला.

कोर्टात जाण्याची तयारी

महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाने म्हटले आहे की, विदर्भातील कडक उन्हात 25 एप्रिलपर्यंत प्राथमिक शाळा सुरु ठेवणे चुकीचे आहे. एप्रिल महिन्यात विदर्भात उन्हाचा पारा वाढलेला असतो. त्यामुळे हा प्रकार विद्यार्थ्यांसाठी धोकादायक आहे. आता महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ या विरोधात न्यायालयात जाणार आहे.

शाळा अंतर्गत परीक्षा घेण्याचे अधिकार मुख्याध्यापक आणि शाळा प्रशासनाचे आहेत. पूर्ण एप्रिल महिन्यात शाळा सुरू ठेवायचा आदेश काढला आहे, तो चुकीचा आहे. हा प्रकार धोकादायक आहे. याबाबत शिक्षण मंत्र्यांना वारंवार पत्र पाठवले आहे.

शाळांचे दिवस पूर्ण मग…

शासनाच्या आदेशानुसार 2 एप्रिल ते 25 एप्रिलपर्यंत परीक्षा घ्यावी लागणार आहे. प्राथमिक शाळा 200 दिवस आणि उच्च प्राथमिक शाळा 220 दिवस घ्यायचा निर्णय झाला आहे. त्यानुसार शाळांचे दिवस पूर्ण झाले आहेत. मग 22 एप्रिलपर्यंत शाळा का सुरू करतात? असा प्रश्न महामंडळाने विचारला आहे.

शासनाच्या निर्णयामुळे मोठ्या विद्यार्थ्यांची परीक्षा आधी आणि प्राथमिक शाळेच्या लहान विद्यार्थ्यांची परीक्षा उशिरा संपणार आहे. प्राथमिक शाळेच्या मुलांच्या परीक्षा 25 एप्रिलला संपणार आहेत. परीक्षा संपतील त्याच दिवशी पेपर तपासायचे, असे शिक्षण मंत्र्यांनी सांगितले आहे. लहान क्षमता असलेल्या शाळांमध्ये ठीक आहे. पण मोठ्या शाळांत हे कसे शक्य होणार? असा प्रश्न महामंडळाने विचारला आहे. त्यामुळे या प्रकरणात आता कोर्टात जाण्याशिवाय पर्याय नाही. कोर्टाने याआधी निर्णय दिला आहे की विदर्भातील तापमान पाहता शाळा प्रशासनाने निर्णय घ्यावा. त्यानंतर सरकारने पत्र काढले होते. सरकार स्वतः काढलेले पत्र सरकार विसरले आहे, असे रवींद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.