AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Palghar Accident : पालघरमध्ये भरधाव ट्रकने दोन बालकांसह तिघांना चिरडले, एकाची प्रकृती चिंताजनक

जव्हार नाशिक रस्त्याला मोखाडा तालुक्यातील मोरचोंडी गाव हे मुख्य रस्त्यावर आहे. महामार्ग असल्यामुळे या ठिकाणी वाहने भरधाव ये जा करीत असतात. दुपारी  जव्हारहून नाशिकच्या दिशेने हा ट्रक जात होता. ट्रकचा चालक नशेत होता. त्याने वाहन हयगयीने चालवीत विरुद्ध दिशेने, तेथे खेळत असलेल्या बालकांना तथा प्रवाशांना चिरडत झाडाला धडक दिली.

Palghar Accident : पालघरमध्ये भरधाव ट्रकने दोन बालकांसह तिघांना चिरडले, एकाची प्रकृती चिंताजनक
महावितरणचा भोंगळ कारभार दोन भावंडांच्या जीवावर बेतलाImage Credit source: tv9
| Edited By: | Updated on: Mar 05, 2022 | 6:27 PM
Share

पालघर : मोखाडा तालुक्यातील नाशिक जव्हार महामार्गावर असलेल्या मोरचुंडी येथे दुपारी एका भरधाव ट्रक (Truck)ने विरुद्ध दिशेने उभ्या असलेल्या प्रवाशांना चिरडत झाडाला धडक दिल्याची खळबळजनक घटना घडली आहे. यात दोन बालकां (Two Children)चा समावेश असून त्यांचा जागीच मृत्यू (Death) झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमी व्यक्तीला उपाचारासाठी मोखाडा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. संतप्त जमावाने ट्रक पेटवून दिला. आरोही नकुल सोनार (5), पायल भालचंद्र वारघडे (9) अशी अपघातात ठार झालेल्या चिमुरड्यांची नावे आहेत. (In Palghar, a truck crushed three people including two children, The condition of one is serious)

जव्हार नाशिक रस्त्याला मोखाडा तालुक्यातील मोरचोंडी गाव हे मुख्य रस्त्यावर आहे. महामार्ग असल्यामुळे या ठिकाणी वाहने भरधाव ये जा करीत असतात. दुपारी  जव्हारहून नाशिकच्या दिशेने हा ट्रक जात होता. ट्रकचा चालक नशेत होता. त्याने वाहन हयगयीने चालवीत विरुद्ध दिशेने, तेथे खेळत असलेल्या बालकांना तथा प्रवाशांना चिरडत झाडाला धडक दिली. चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, मोखाडा पोलिस ठाण्यात आरोपी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील कार्यवाही मोखाडा पोलिस करीत आहेत.

धुळ्यात अज्ञात वाहनाच्या धडकेत पिता-पुत्राचा मृत्यू

नातेवाईकांच्या साखरपुड्यासाठी लहान मुलाला सोबत घेऊन मोटरसायकलने जात असताना अज्ञात वाहनाचा आणि मोटरसायकलचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली. यात मोटरसायकलस्वार पिता पुत्राचा मृत्यू झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की यात मोटरसायकलस्वाराचे धड वेगळे आणि शिर वेगळे झाले आहे. प्राथमिक माहितीनुसार शिंदखेडा तालुक्यातील विखरण या गावातील विनोद राजपूत हे नातेवाईकांच्या साखरपुड्यासाठी आपल्या लहान मुलाला घेऊन विक्रीतून चिमठाणे मोटरसायकलने जात होते. यावेळी भडणे फाट्याजवळ भडगाव येथे अज्ञात वाहनाने मोटरसायकलला धडक दिल्याने त्यांचा अपघात झाला. यात विनोद राजपूत यांचा जागीच मृत्यू झाला तर मुलगा गंभीर जखमी झाला आहे. (In Palghar, a truck crushed three people including two children, The condition of one is serious)

इतर बातम्या

Missing Girl : बोरिवली येथून हरवलेली मुलगी इगतपुरी रेल्वे स्थानकात सापडली, पोलिसांनी पालकांकडे केले सुपूर्द

Video: गॅरंटी, असं महाकाय जनावर वळवळत जाताना तुम्ही पाहिलं नसेल, कमजोर दिलवाले ना देखे

दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?.
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!.
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?.
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?.
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.