AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Big Breaking : सरकारचं डेथ वॉरंट निघालं… फिनिश… पुष्पचक्र अर्पण करा, सरकार कधी पडणार?; संजय राऊत यांनी दिवसच सांगितले

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज जळगावच्या पाचोरा येथे सभा आहे. या सभेला राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेही उपस्थित राहणार आहेत. संजय राऊत यांनी आज सभेच्या तयारीचा आढावा घेतला.

Big Breaking : सरकारचं डेथ वॉरंट निघालं... फिनिश... पुष्पचक्र अर्पण करा, सरकार कधी पडणार?; संजय राऊत यांनी दिवसच सांगितले
sanjay rautImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Apr 23, 2023 | 10:19 AM
Share

जळगाव : ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांना डिवचले आहे. गुलाबराव पाटील यांची गुलाबो गँग असल्याचं सांगतानाच आज पाटील यांचे भ्रष्टाचार बाहेर काढणार असल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं. कोरोना काळात गुलाबराव पाटील यांनी कसा भ्रष्टाचार केला याची माहितीच संजय राऊत यांनी दिली. तसेच गुलाबराव पाटील यांच्या पाणीखात्यात प्रचंड भ्रष्टाचार झाल्याचा दावा करतानाच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस गप्प का आहेत? ते काय भ्रष्टाचाऱ्यांची टोळी चालवत आहेत काय? असा सवाल संजय राऊत यांनी केला. तसेच शिंदे-फडणवीस सरकारचं डेथ वॉरंट निघालं आहे. येत्या 15 ते 20 दिवसात शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार असल्याची भविष्यवाणी संजय राऊत यांनी केली आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे.

जळगावच्या पाचोऱ्यात आज ठाकरे गटाची महासभा आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या सभेला संबोधित करणार आहेत. या सभेची संपूर्ण तयारी झाली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत दोन दिवसांपासून जळगावात असून सभेच्या तयारीचा आढावा घेत आहेत. आजही त्यांनी मीडियाशी संवाद साधला. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी राजकारणात काहीही होऊ शकतं. अजित पवार मुख्यमंत्रीपदासाठीचा आकडा जमवू शकतात, असं म्हटलं होतं. त्यावर संजय राऊत यांना विचारण्यात आलं. त्यावर त्यांनी मोठं भाकीत केलं.

पुष्पचक्र अर्पण करा

प्रत्येकजण आपआपली गणितं मांडत असतात. आम्ही निकालाची वाट पाहत आहोत. सध्याचे मुख्यमंत्री आणि 40 लोकांचे राज्य आहे. ते पुढच्या 15 ते 20 दिवसात गडगडल्याशिवाय राहणार नाही. मी मागे एकदा सांगितलं होतं. फेब्रुवारीपर्यंत सरकार पडेल. पण न्यायालयाचा निकाल उशिरा लागतोय. हे सरकार टिकत नाही. या सरकारचा मृत्यू लेख लिहिला गेला आहे. डेथ वॉरंट निघालं आहे. आता फक्त सही कधी आणि कुणी करायची हेच बाकी आहे. या सरकारचं डेथ वॉरंट निघालेलं आहे. फिनिश. पुष्पचक्र अर्पण करा, असं संजय राऊत म्हणाले.

त्यांना घेणार नाही?

शिवसेनेशी गद्दारी करून जे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले त्यांना पुन्हा पक्षात घेणार का? असा सवाल संजय राऊत यांना करण्यात आला. त्यावर त्यांनी नाही असं सांगितलं. आम्ही पक्षातून गेलेल्यांना परत घेणार नाही. त्यांनी पक्षाशी गद्दारी केली. पक्षाच्या विचाराशी गद्दारी केली आहे, असं संजय राऊत म्हणाले. जो गये, वो भगवान को प्यारे हो गये, असंही ते म्हणाले. त्यामुळे शिंदे गटातील आमदारांना आता ठाकरे गटात येण्याचे दरवाजे बंद झाल्याची चर्चा आहे.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.