AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘त्या’ अधिकाऱ्यांना वरून आदेश येत होते; हसन मुश्रीफ यांच्या मुलाचा गौप्यस्फोट

आम्ही सर्व चौकशीला सामोरे गेलेलो आहोत. चौकशीमध्ये त्यांच्या हाती काहीही लागलेले नसावं. माझं वडिलांशी अद्याप बोलणं झालेलं नाही. चौकशी झाल्यानंतर मी थेट कार्यकर्त्यांसाठी इकडे आलो.

'त्या' अधिकाऱ्यांना वरून आदेश येत होते; हसन मुश्रीफ यांच्या मुलाचा गौप्यस्फोट
'त्या' अधिकाऱ्यांना वरून आदेश येत होते; हसन मुश्रीफ यांच्या मुलाचा गौप्यस्फोटImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Jan 12, 2023 | 7:16 AM
Share

कोल्हापूर: राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर काल ईडी आणि आयकर विभागाच्या धाडी पडल्या. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या धाडी पडल्यानंतर हसन मुश्रीफ यांनी विशिष्ट समाजाच्या लोकांना टार्गेट केलं जात असल्याचा आरोप केला आहे. तर मुश्रीफ यांचे चिरंजीव नाविद मुश्रीफ यांनी अधिकाऱ्यांना वरून आदेश येत होते. त्यानुसारच चौकशी केली जात होती, असा दावा केल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे मुश्रीफ यांच्या घरावरील छापेमारी ही राजकीय हेतूने प्रेरित होती का? असा सवाल केला जात आहे.

हसन मुश्रीफ यांच्या कोल्हापुरातील कागल येथील निवासस्थानी काल पहाटे 6.30 वाजता ही कारवाई करण्यात आली. ईडी आणि आयकर विभागाचे तब्बल 20 अधिकारी मुश्रीफ यांच्या निवासस्थानी दाखल झाले होते. या अधिकाऱ्यांनी मुश्रीफ यांच्या घरातील कागदपत्रे तपासतानाच कुटुंबातील काही लोकांवर प्रश्नांची सरबत्ती केल्याचं सांगितलं जातं.

ईडी आणि आयकर विभागाची ही कारवाई तब्बल 12 तास सुरू होती. 12 तासानंतर हे अधिकारी निघून गेले. या सर्व प्रकारावर हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव नाविद मुश्रीफ यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. चौकशीला आम्ही सहकार्य केलं, चौकशी शांतेत झाली. सगळी उत्तरं आम्ही दिली आहेत. त्या अधिकाऱ्यांना वरुन आदेश दिले जात होते, त्यापद्धतीने चौकशी केली जात होती, असा दावा नाविद यांनी केला आहे.

आम्ही सर्व चौकशीला सामोरे गेलेलो आहोत. चौकशीमध्ये त्यांच्या हाती काहीही लागलेले नसावं. माझं वडिलांशी अद्याप बोलणं झालेलं नाही. चौकशी झाल्यानंतर मी थेट कार्यकर्त्यांसाठी इकडे आलो, असंही त्यांनी सांगितलं.

दरम्यान, हसन मुश्रीफ यांनी या प्रकरणी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आधी नवाब मलिक यांच्यावर कारवाई केली. आता अस्लम शेख यांच्यावर कारवाई होणार असल्याचं किरीट सोमय्या सांगत आहेत. त्यावरून विशिष्ट समुदायाच्या लोकांना टार्गेट केलं जात असल्याचं स्पष्ट होत आहे, असं मुश्रीफ यांनी सांगितलं.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.