AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO: नगरपरिषदेत शिवसेनेचा धुव्वा उडणार, बढाया मारत नाही; नारायण राणेंनी शिवसेनेला डिवचले

जिल्ह्यातील चारही नगरपरिषदा आमच्या ताब्यात आहेत. त्या आमच्याकडेच राहणार आहेत. या नगरपरिषदांच्या निवडणुकीत शिवसेनेचा धुव्वा उडणार आहे.

VIDEO: नगरपरिषदेत शिवसेनेचा धुव्वा उडणार, बढाया मारत नाही; नारायण राणेंनी शिवसेनेला डिवचले
narayan rane
| Edited By: | Updated on: Dec 19, 2021 | 5:54 PM
Share

वेंगुर्ला: जिल्ह्यातील चारही नगरपरिषदा आमच्या ताब्यात आहेत. त्या आमच्याकडेच राहणार आहेत. या नगरपरिषदांच्या निवडणुकीत शिवसेनेचा धुव्वा उडणार आहे. त्यामुळे आम्ही बढाया मारत नाही. आमची ताकद असून आम्ही चारही नगरपरिषदा जिंकूच, अशा शब्दात केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम विकास मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेला डिवचले.

वेंगुर्ला नगरपरिषदेने आयोजित केलेल्या कार्यक्रमानंतर ते मीडियाशी बोलत होते. जिल्ह्यातील चारही नगरपरिषदा आमच्या ताब्यात आहेत. त्यांनी यावं आणि नगरपरिषदा घेऊन जाव्या असं व्हायला आम्ही काही डोळे मिटून आहोत का?. शिवसेनेची ताकद काय आहे? चारही नगरपरिषदा आमच्या आहेत. आमच्याकडेच राहणार आहेत. या निवडणुकीत शिवसेनेचा धुव्वा उडणार. त्यामुळे आम्ही बढाया मारत नाही. आमची ताकद आहे. चारही नगरपरिषदा आम्ही आमच्या ताब्यात येऊ द्या. या सरकारने जिल्हा परिषद आणि नगरपरिषदांना पैसे कुठे दिले? एवढं नुकसान झालं. पण पाच पैसे दिले नाही. मग मतदारांनी यांना निवडून का द्यावं, असा सवाल त्यांनी केला.

यावेळी झालेल्या कार्यक्रमातही त्यांनी भाषण केलं. आमचे मित्र दिपक केसरकर ऑनलाईन दिसले आता. पण ते असल्या चांगल्या कार्यक्रमात येत नाहीत, असा टोला लगावतनाच आम्ही विकासाच्या कामात राजकारण पाहत नाही, असं ते म्हणाले.

विमानतळाशी तुमचा काय संबंध?

माझा देश भर दौरा सुरू आहे. मात्र अशी इमारत पाहिली नाही. याचं कौतूक व्हायला पाहिजे. चांगल्याला चांगल म्हटलं पाहिजे. आम्ही काम आणि कार्याचं नेहमी कौतुक करतो. मी मुंबईतून सिंधुदुर्गात आल्या नंतर या जिल्ह्यात भयावह परिस्थिती होती. शिक्षण क्षेत्राची तर दयनीय अवस्था होती. निवडून आलो तेव्हाच ठरवलं जिल्ह्याचा विकास करायचा. विमानतळ, चौपदरीकरण आदी कामं मी केली. तुमचा काय संबंध होता? कधी होता तुम्ही? आम्ही भूमिपूजन केलं. त्यालाही यांनी विरोध केला. आता विमानतळ तयार झाल्यावर म्हणतात आम्हीच केलं, असा हल्लाही त्यांनी चढवला.

मोदीं एवढं कुणी काम करतं का?

देश आत्मनिर्भर होण्यासाठी काम करा, असं मला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं. मी त्यांना येस सर म्हणून सांगितलं. देशातील जनतेसाठी मोदी 18-18 तास काम करतात. कोणता नेता एवढे काम करतो का? असा सवालही त्यांनी केला.

संबंधित बातम्या:

काँग्रेसकडून बाबासाहेबांचा त्यांच्या हयातीत आणि नंतरही सातत्याने अपमान, अमित शहांचा काँग्रेसवर हल्लाबोल

मोदी सरकारवर आरएसएसचा रिमोट कंट्रोल आहे का?; मोहन भागवतांनी सांगितली ‘मन की बात’

St. Thomas Church| नाशिकच्या सेंट थॉमस चर्चमध्ये फादरने बिशपसमोर घेतले पेटवून; वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न

BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून..
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून...
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा.
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली.
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल.
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश.
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा.
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी.
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार.
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं..
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं...