AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“आज गर्दी कमी, उद्या येऊया..”; पहलगाम हल्ल्याच्या एक दिवस आधी दहशतवादी काय म्हणाले? जालन्यातील तरुणाचा खुलासा

पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांबद्दल जालन्यातील आदर्श राऊत या तरुणाने मोठा खुलासा केला आहे. आदर्श आणि त्याचे कुटुंबीय काश्मीरला फिरायला गेले होते. हल्ल्याच्या एक दिवस आधी आदर्श बैसरन पठारावर गेला होता. तिथे एका अनोळखी व्यक्तीने त्याच्याशी संवाद साधला होता.

आज गर्दी कमी, उद्या येऊया..; पहलगाम हल्ल्याच्या एक दिवस आधी दहशतवादी काय म्हणाले? जालन्यातील तरुणाचा खुलासा
जालन्यातील तरुणाने सांगितली घटनाImage Credit source: ANI
| Updated on: Apr 30, 2025 | 11:43 AM
Share

जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात जालन्यातील राऊत कुटुंब थोडक्यात वाचलं. जालन्यातील राऊतनगरमध्ये राहणारे संजय राऊत हे त्यांचा मुलगा आदर्श आणि पत्नीसोबत काश्मीरला फिरायला गेले होते. 21 एप्रिल रोजी हे तिघं पहलगाममध्ये होते आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी 22 एप्रिल रोजी बैसरन पठारावर दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला. ज्यादिवशी राऊत कुटुंबीय पहलगाममध्ये होते, तेव्हा एकाने “तू काश्मिरी दिसत नाहीस, हिंदू आहेस का” असा प्रश्न विचारल्याचा दावा आदर्शने केला आहे. विशेष म्हणजे दहशतवादी हल्ल्यानंतर जाहीर करण्यात आलेल्या दहशतवाद्यांपैकी एकाच्या स्केचशी त्याचा चेहरा मिळताजुळता असल्याचंही त्याने म्हटलंय.

21 एप्रिल रोजी आदर्श एकटाच घोडेस्वारी आणि फिरण्यासाठी बैसरनला गेला होता. तिथे एका मॅगीच्या स्टॉलवर तो थांबला असता एका अनोळखी व्यक्तीने त्याच्याशी संवाद साधला होता. त्या व्यक्तीने आदर्शला विचारलं, “तुम्ही काश्मिरी दिसत नाही, तुम्ही हिंदू आहात का?” या प्रश्नावरून आदर्शच्या मनात शंका उपस्थित झाली आणि त्याने फक्त इतकंच उत्तर दिलं की, “मी इथलाच आहे.” तसंच आज गर्दी कमी आहे, उद्या पुन्हा येऊया, अशी त्या अनोळखी व्यक्तीने त्याच्यासोबत असलेल्या दुसऱ्या व्यक्तीसोबत चर्चा केल्याचाही दावा आदर्शने केला आहे. यानंतर तो तिथून निघून गेला आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच 22 एप्रिल रोजी राऊत कुटुंबीय श्रीनगरला पोहोचले होते. तेव्हाच बैसरनमध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केला होता.

ज्या व्यक्तीने आदर्शशी संवाद साधला, ती व्यक्ती दहशतवादी हल्ल्यानंतर जाहीर करण्यात आलेल्या दहशतवाद्यांच्या स्केचशी मिळतीजुळती असल्याचं आदर्शने म्हटलंय. या संशयावरून त्याने थेट NIA ला ई-मेलकरून माहिती दिली आहे. बैसरनमध्ये दहशतवादी 21 एप्रिल रोजीच हल्ला करणार होते, परंतु त्यादिवशी पर्यटकांची गर्दी कमी असल्याने त्यांनी दुसऱ्या दिवशी हल्ला केला. याप्रकरणी प्रतिक्रिया देताना आदर्शचे वडील संजय म्हणाले की, “ज्याठिकाणी हल्ला झाला, तिथे कोणतीच सुरक्षा व्यवस्था नव्हती. जर सुरक्षा व्यवस्था असती तर कदाचित हल्ला टाळता आला असता.”

22 एप्रिल रोजी पहलगाममधील बैसरन याठिकाणी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला, तर 20 हून अधिक जखमी झाले. मृतांमध्ये सहा जण महाराष्ट्रातील रहिवाशी होते.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.