AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुण्यात वादळी वाऱ्याने मोठं संकट, होर्डिंग कोसळलं, 8 जण अडकले; पुणेकरांसमोर अडचणींचा डोंगर

एकीकडे उष्णाघाताचे बळी गेले असताना दुसरीकडे पाऊस पडत आहे. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे नागरिकांची तारांबळ उडत असल्याचं चित्र आहे. अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान होत आहे.

पुण्यात वादळी वाऱ्याने मोठं संकट, होर्डिंग कोसळलं, 8 जण अडकले; पुणेकरांसमोर अडचणींचा डोंगर
| Edited By: | Updated on: Apr 17, 2023 | 7:35 PM
Share

पुणे : राज्यात पुढील आठवडाभर मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होईल. तसेच पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. राज्यात १८, १९ आणि २० एप्रिल रोजी बहुतांश ठिकाणी हजेरी लावणार असल्याचाही हवामान खात्याचा अंदाज आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. पुण्याच्या भोरमध्ये तासभर पडलेल्या मुसळधार पावसामुळे गटार अक्षरशः तुंबली. काही भागात गटाराचं पाणी शिरलं. पुणे जिल्ह्यात आंबा उत्पादनाला पावसाचा मोठा फटका बसला. आंब्याचे उत्पादन घटल्याने केवळ ३० टक्केच आंबा बाजारात दाखल झाला. त्यामुळे आंब्याच्या भावात वाढ झाली आहे.

होर्डिंग कोसळून ८ जण अडकले

पिंपरी-चिंचवड शहरातील रावेत भागात होर्डिंग कोसळून ४ ते ५ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. काही वेळापूर्वीच वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला होता. तेव्हा, हा होर्डिंग कोसळून यात ८ जण अडकले होते. पैकी ४ ते ५ जणांचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती रावेत पोलिसांनी दिली आहे.

pimpari 3 n

झाडं उन्मळून पडली

पिंपरी चिंचवड शहरात बहुतांश ठिकाणी वादळी पावसाला सुरुवात झाली. अचानक सुरू झालेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. अनेक ठिकाणी झाड उन्मळून पडलीत. तर, वाऱ्यामुळे गाड्या पडल्याचं चित्र दिसत होतं.

गाड्या खाली कोसळल्या

रावेत भागात रस्त्यावर अनेक ठिकाणी पाणी साचल्याने मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. शहरात रस्त्यांवर लावण्यात आलेले बॅनर टराटरा फाटले. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे स्टँडवर ठेवलेल्या गाड्या खाली कोसळल्या होत्या.

pimpari 2 n

नाशिकमध्ये पिकांचे नुकसान

नाशिकमध्ये अवकाळी पावसाने पिकांचे मोठं नुकसान केलं आहे. आपातग्रस्तांकडून पीक कर्ज वसुली सक्तीने नको. असे आदेश पालकमंत्री दादा भुसे यांनी पीक पाहणीनंतर दिले. नाशिक जिल्ह्यात गेल्या ४५ दिवसांत ४२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. जिल्ह्यातील बळीराजा हवालदील झाला.

साताऱ्यात वाऱ्यासह गारांचा पाऊस

सातारा जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस पडला. पाचगणी परिसरातही गारपिटीसह मुसळधार पावसाने हजेरी लावली. कोल्हापूरच्या वाकरे गावात पावसाने धुमाकूळ घातला. गारांचा मोठा खच जमा झाला होता. सुमारे ३२ हेक्टरवरील पिकांचे अतोनात नुकसान झाले. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथे अवकाळी पावसाने हजेरी लावली. आंबा आणि काजू बागायतदार यांचे नुकसान झाले.

एकीकडे उष्णाघाताचे बळी गेले असताना दुसरीकडे पाऊस पडत आहे. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे नागरिकांची तारांबळ उडत असल्याचं चित्र आहे. अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान होत आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.