AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पळून जाऊन लग्न करण्याचे फॅड, विवाहित महिलांनीही थाटला दुसरा संसार

Pune News | पुणे जिल्ह्यातील भोरमध्ये लग्नसंदर्भात आश्चर्यकारक आकडेवारी समोर आली आहे. या आकडेवारीमुळे पालकवर्गात चिंता निर्माण झाली आहे. भोर तालुक्यात पळून जाऊन लग्न करण्याचे प्रमाण वाढले असल्याचे पोलिसांच्या तपासातून स्पष्ट झाले आहे.

पळून जाऊन लग्न करण्याचे फॅड, विवाहित महिलांनीही थाटला दुसरा संसार
| Updated on: Jan 02, 2024 | 2:22 PM
Share

विनय जगताप, भोर, पुणे, दि. 2 जानेवारी 2024 | भारतीय संस्कृतीत लग्न म्हणजे दोन जिवांचे मिलन म्हटले जाते. लग्नासाठी शास्त्रोक्त पद्धत भारतीय परंपरेत आहे. परंतु काळाप्रमाणे बऱ्याच गोष्टी बदलत आहेत. कॉलेज किंवा इतर ठिकाणी ‘नजरे से नरज मिली’ असे होऊन प्रेम झाले अन् नंतर लग्न झाले, असे होत आहे. पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील आश्चर्यकारक आकडेवारी समोर आली आहे. भोर तालुक्यात पळून जाऊन लग्न करण्याचे प्रमाण वाढले आहे. या पद्धतीने लग्न करण्यात विवाहित महिलाही आहे. प्रेम प्रकरणाच्या वाढलेल्या या प्रकारामुळे पालक वर्ग चिंतेत आहे.

विवाहित महिलांनी थाटला दुसरा संसार

पुण्याच्या भोर तालुक्यातल्या राजगड पोलीस स्टेशनच्या हद्दीत वर्षभरात 55 जणांनी पलायन केल्याची आकडेवारी समोर आली आहे. यात 17 तरुण आहेत. त्यात विवाहित महिलांचा समावेश आहे. तरुण मुलींसह 41 महिला पळून गेल्या आहेत. तालुक्यातील प्रेमवीरांच्या या घटनांमुळे पालकवर्ग चिंतेत आहे. गेल्या वर्षभरात पळून जाऊन लग्न करण्याचा सपाटा सुरू असल्याबद्दल समाजातही चिंता व्यक्त केली जात आहे. अल्पवयीन मुलांना फूस लावून पळवण्याचे प्रकार समोर आले आहे.

नोंद नसणाऱ्यांची संख्या

पळून जाऊन लग्न करणाऱ्यांमध्ये नोंद नसणाऱ्यांची संख्या जास्त आहे. पोलिसांकडील आकडेवारीनुसार 31 डिसेंबरपर्यंत 15 पुरुष, 18 वर्षापुढील 22 तरुणी, विवाहित असलेल्या 19 महिला घरातून निघून गेल्या होत्या. तसेच 6 अल्पवयीन मुलींचे अपहरण झाले होते. राजगड पोलिसांना बेपत्ता झालेल्या जवळपास सर्वच व्यक्तींना शोधण्यात यश आले आहे. यामध्ये प्रेम प्रकरणातून पळून जाणाऱ्या तरुण – तरुणींची संख्या अधिक असल्याचे स्पष्ट झाले आहे.

पळून जाऊन लग्न करण्याचे प्रकार चित्रपट आणि मालिकांमुळे वाढत असल्याचा आरोप समाजातील लोकांकडून केला जात आहे. मुले-मुली एकच समाजाचे असतील तर या लग्नास विरोध होत नाही, परंतु दोन वेगळ्या समाजातील युवक-युवती असतील तर यामुळे तणाव निर्माण होतो.

मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?.
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!.
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ.
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम.
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन.
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.