AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! 40-50 कोटींचा ‘तो’ फटका सरकार दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांकडून वसूल करणार?

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज्य सरकार दहावी-बारावीच्या परीक्षा शुल्कात 30 टक्क्यांनी वाढ करण्याची शक्यता आहे.

मोठी बातमी! 40-50 कोटींचा 'तो' फटका सरकार दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांकडून वसूल करणार?
| Updated on: Dec 21, 2022 | 5:42 PM
Share

योगेश बोरसे, पुणे : इयत्ता दहावी-बारावीचे वर्ष हे प्रत्येक विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट असल्याचं मानलं जातं. दहावीनंतर आपल्याला आगामी काळात कोणत्या क्षेत्रात करियर करायचं, याबाबत विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी निर्णय घेतलेला असतो. तसेच इयत्ता बारावीनंतरदेखील विद्यार्थी आपल्या आयुष्यातील महत्त्वाच्या टप्प्याच्या दिशेला वाटचाल करतात. त्यामुळे दोन्ही इयत्तेच्या विद्यार्थ्यांसाठी ते वर्ष महत्त्वाचं मानलं जातं. विद्यार्थ्यांकडून दहावी-बारावीत चांगले गुण मिळावे यासाठी पालक त्यांना चांगली शाळा आणि ट्युशनमध्ये पाठवतात. त्यामुळे विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा खर्च वाढतो. विशेष म्हणजे दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांच्या याच खर्चात आता आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. कारण राज्य सरकार एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज्य सरकार दहावी-बारावीच्या परीक्षा शुल्कात 30 टक्क्यांनी वाढ करण्याची शक्यता आहे. राज्य शिक्षण मंडळ सध्या आर्थिक तोट्यात आहे. मंडाळाला उत्पन्नाच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात खर्च सोसावा लागतोय. त्यामुळे मंडळाला 40 ते 50 कोटींचा आर्थिक फटका बसलाय.

राज्य शिक्षण मंडळाचं हे नुकसान भरुन काढण्यासाठी, तसेच आर्थिक नियंत्रणासाठी दहावी-बारावीच्या परीक्षा शुल्कात तब्बल 30 टक्क्यांनी वाढवण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्यात आलाय.

आता हा प्रस्ताव राज्य सरकारने मान्य केला तर पुढच्या वर्षापासून विद्यार्थ्यांना शुल्लवाढीस सामोरं जावं लागू शकतं. विद्यार्थ्यांना आजच्या तुलनेत थेट 30 टक्क्यांनी जास्त रक्कम परीक्षा शुल्क मोजावी लागेल.

कोरोना काळात अनेकांवर उपासमारीची वेळ आली होती. अनेकांची नोकरी गेली. त्यामुळे अनेक पालकं आपल्या मुलांच्या शाळेचं शुल्क भरु शकले नव्हते. त्यामुळे काही ठिकाणी शाळांनी विद्यार्थ्यांना शाळेतून कमी करण्याचे किंवा इतर कारवाई करण्याचा प्रयत्न केल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या.

या दरम्यान काही शाळांनी शुल्कवाढ केल्याचीदेखील बातमी समोर आली होती. त्यानंतर आता दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांच्या शुल्कवाढीची बातमी समोर आलीय.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.